शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

रिफायनरी समर्थनार्थ आता जनतेबरोबर शिवसेना पदाधिकारीही अग्रेसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:21 IST

- शिवसैनिकांसह पदाधिकारीही प्रकल्पाच्या बाजूने लाेकमत न्यूज नेटवर्क राजापूर : विकासात्मक भूमिका न घेता कायमच सोयीचे राजकारण करत आपली ...

- शिवसैनिकांसह पदाधिकारीही प्रकल्पाच्या बाजूने

लाेकमत न्यूज नेटवर्क

राजापूर : विकासात्मक भूमिका न घेता कायमच सोयीचे राजकारण करत आपली राजकीय पोळी भाजणाऱ्या शिवसेनेच्या रिफायनरी प्रकल्पविरोधी भूमिकेविरोधात आता शिवसैनिकांबरोबरच तालुक्यातील जनतेतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान, साेलगाव - बारसू भागात रिफायनरी हाेण्यासाठी समर्थन वाढले असून, शिवसैनिकांसह पदाधिकारीही प्रकल्पाच्या बाजूने येऊ लागले आहेत. त्यामुळे आता शिवसेनेविराेधातच अनेकांनी बंड पुकारण्याचा निर्णय घेतला आहे.

तब्बल साडेआठ हजार एकरच्या जमीन मालकांनी नाणारलगतच्या गावांत ४ लाख कोटी रूपयांचा रिफायनरी प्रकल्प व्हावा, यासाठी पुढे येऊन संमतीपत्रे दिलेली असतानाच केवळ शिवसेनेच्या मंत्री आणि खासदार यांच्या हेकेखोर भूमिकेमुळे रत्नागिरी रिफायनरी कंपनीने हा प्रकल्प नाणार परिसरातून हलविण्याचा निर्णय घेतला आहे. स्थानिकांचा विरोध अशा कारणांचे तुणतुणे शिवसेनेने वाजवत ठेवून नाणारमध्ये नकाराचे ढोल बडवले होते. प्रत्यक्षात मात्र साडेआठ हजार एकर जागेची संमती देणारे हे स्थानिकच होते, याचा शिवसेनेला विसर पडला आहे. आता या प्रकल्पासाठी पर्याय असलेल्या बारसू-सोलगाव परिसरात कंपनीकडून प्रकल्पासाठी जागा मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याला स्थानिक शेतकरी, बागायतदार आणि शिवसेनेच्याच काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी याठिकाणी प्रकल्पाच्या स्वागताची भूमिका घेतली आहे.

मात्र, तरीही तालुक्यात मोठ्या संख्येने असलेल्या कुणबी समाजबांधवांचे नेते राजापूर तालुक्याच्या विकासाच्या व प्रकल्पातून होणाऱ्या समाजातील युवकांच्या विकासाच्या दृष्टीने या प्रकल्पाकडे कसे पाहतात, हे देखील पाहावे लागणार आहे. नाणार भागात तर तेथील शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मी शिवलकर यांनी जनमताचा कौल घेत रिफायनरी प्रकल्पाचे उघड समर्थन केले होते. त्यांच्या जोडीलाच विभागप्रमुख राजा काजवे यांनीही प्रकल्पाला समर्थन करत आपल्याच पक्षातील लोकभावना शिवसेना नेत्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला.

राजापूर नगर परिषदेसह पाचल व अन्य ग्रामपंचायतींनी समर्थनाचे ठराव केले आहेत. हजारो बेरोजगार तरूण हा प्रकल्प यावा आणि आमचे भवितव्य उज्ज्वल व्हावे, यासाठी पुढाकार घेत आहेत. मात्र, सत्ता आणि पदाच्या माध्यमातून आपल्याच उत्कर्षाचा ध्यास घेऊन काम करणाऱ्या शिवसेनेच्या मंत्री, खासदार आणि आमदारांना बेरोजगार तरूणांची ही तडफड दिसत नाही का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.