शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

रिफायनरी समर्थनार्थ आता जनतेबरोबर शिवसेना पदाधिकारीही अग्रेसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:21 IST

- शिवसैनिकांसह पदाधिकारीही प्रकल्पाच्या बाजूने लाेकमत न्यूज नेटवर्क राजापूर : विकासात्मक भूमिका न घेता कायमच सोयीचे राजकारण करत आपली ...

- शिवसैनिकांसह पदाधिकारीही प्रकल्पाच्या बाजूने

लाेकमत न्यूज नेटवर्क

राजापूर : विकासात्मक भूमिका न घेता कायमच सोयीचे राजकारण करत आपली राजकीय पोळी भाजणाऱ्या शिवसेनेच्या रिफायनरी प्रकल्पविरोधी भूमिकेविरोधात आता शिवसैनिकांबरोबरच तालुक्यातील जनतेतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान, साेलगाव - बारसू भागात रिफायनरी हाेण्यासाठी समर्थन वाढले असून, शिवसैनिकांसह पदाधिकारीही प्रकल्पाच्या बाजूने येऊ लागले आहेत. त्यामुळे आता शिवसेनेविराेधातच अनेकांनी बंड पुकारण्याचा निर्णय घेतला आहे.

तब्बल साडेआठ हजार एकरच्या जमीन मालकांनी नाणारलगतच्या गावांत ४ लाख कोटी रूपयांचा रिफायनरी प्रकल्प व्हावा, यासाठी पुढे येऊन संमतीपत्रे दिलेली असतानाच केवळ शिवसेनेच्या मंत्री आणि खासदार यांच्या हेकेखोर भूमिकेमुळे रत्नागिरी रिफायनरी कंपनीने हा प्रकल्प नाणार परिसरातून हलविण्याचा निर्णय घेतला आहे. स्थानिकांचा विरोध अशा कारणांचे तुणतुणे शिवसेनेने वाजवत ठेवून नाणारमध्ये नकाराचे ढोल बडवले होते. प्रत्यक्षात मात्र साडेआठ हजार एकर जागेची संमती देणारे हे स्थानिकच होते, याचा शिवसेनेला विसर पडला आहे. आता या प्रकल्पासाठी पर्याय असलेल्या बारसू-सोलगाव परिसरात कंपनीकडून प्रकल्पासाठी जागा मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याला स्थानिक शेतकरी, बागायतदार आणि शिवसेनेच्याच काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी याठिकाणी प्रकल्पाच्या स्वागताची भूमिका घेतली आहे.

मात्र, तरीही तालुक्यात मोठ्या संख्येने असलेल्या कुणबी समाजबांधवांचे नेते राजापूर तालुक्याच्या विकासाच्या व प्रकल्पातून होणाऱ्या समाजातील युवकांच्या विकासाच्या दृष्टीने या प्रकल्पाकडे कसे पाहतात, हे देखील पाहावे लागणार आहे. नाणार भागात तर तेथील शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मी शिवलकर यांनी जनमताचा कौल घेत रिफायनरी प्रकल्पाचे उघड समर्थन केले होते. त्यांच्या जोडीलाच विभागप्रमुख राजा काजवे यांनीही प्रकल्पाला समर्थन करत आपल्याच पक्षातील लोकभावना शिवसेना नेत्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला.

राजापूर नगर परिषदेसह पाचल व अन्य ग्रामपंचायतींनी समर्थनाचे ठराव केले आहेत. हजारो बेरोजगार तरूण हा प्रकल्प यावा आणि आमचे भवितव्य उज्ज्वल व्हावे, यासाठी पुढाकार घेत आहेत. मात्र, सत्ता आणि पदाच्या माध्यमातून आपल्याच उत्कर्षाचा ध्यास घेऊन काम करणाऱ्या शिवसेनेच्या मंत्री, खासदार आणि आमदारांना बेरोजगार तरूणांची ही तडफड दिसत नाही का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.