शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक भारतीय संतापलाय..."; पंतप्रधान मोदी यांचा CJI गवईंना फोन, हल्ल्याचा केला निषेध
2
अभिनेता विजय देवरकोंडा याच्या कारला अपघात, दुसऱ्या कारने मागून दिली धडक
3
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामना, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
4
हनिट्रॅप, शारीरिक संबंध आणि पैशांची मागणी, निवृत्त अधिकाऱ्यांना जाळ्यात अडकवणारी सुंदरी अशी सापडली
5
न्यूझीलंड विरुद्ध तझमिनची विक्रमी सेंच्युरी; स्मृती पडली मागे! दक्षिण आफ्रिकेचा पहिला विजय
6
तुमचा मित्र कुठे आहे? सहज शोधू शकाल, इन्स्टाग्रामने आणलं खास फिचर, मिळेल अशी माहिती
7
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
8
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
9
‘मेट्रो  ९ मार्गिका १५ डिसेंबरपर्यंत आणि मेट्रो ४ मार्गिका ३१ डिसेंबर पर्यंत सुरू करा’, परिवहन मंत्र्यांचे आदेश 
10
भारताविरूद्ध 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानच्या महिला फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा
11
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
12
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
13
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
14
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
15
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
16
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
17
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
18
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
19
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
20
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम

रिफायनरी समर्थनार्थ आता जनतेबरोबर शिवसेना पदाधिकारीही अग्रेसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:21 IST

- शिवसैनिकांसह पदाधिकारीही प्रकल्पाच्या बाजूने लाेकमत न्यूज नेटवर्क राजापूर : विकासात्मक भूमिका न घेता कायमच सोयीचे राजकारण करत आपली ...

- शिवसैनिकांसह पदाधिकारीही प्रकल्पाच्या बाजूने

लाेकमत न्यूज नेटवर्क

राजापूर : विकासात्मक भूमिका न घेता कायमच सोयीचे राजकारण करत आपली राजकीय पोळी भाजणाऱ्या शिवसेनेच्या रिफायनरी प्रकल्पविरोधी भूमिकेविरोधात आता शिवसैनिकांबरोबरच तालुक्यातील जनतेतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान, साेलगाव - बारसू भागात रिफायनरी हाेण्यासाठी समर्थन वाढले असून, शिवसैनिकांसह पदाधिकारीही प्रकल्पाच्या बाजूने येऊ लागले आहेत. त्यामुळे आता शिवसेनेविराेधातच अनेकांनी बंड पुकारण्याचा निर्णय घेतला आहे.

तब्बल साडेआठ हजार एकरच्या जमीन मालकांनी नाणारलगतच्या गावांत ४ लाख कोटी रूपयांचा रिफायनरी प्रकल्प व्हावा, यासाठी पुढे येऊन संमतीपत्रे दिलेली असतानाच केवळ शिवसेनेच्या मंत्री आणि खासदार यांच्या हेकेखोर भूमिकेमुळे रत्नागिरी रिफायनरी कंपनीने हा प्रकल्प नाणार परिसरातून हलविण्याचा निर्णय घेतला आहे. स्थानिकांचा विरोध अशा कारणांचे तुणतुणे शिवसेनेने वाजवत ठेवून नाणारमध्ये नकाराचे ढोल बडवले होते. प्रत्यक्षात मात्र साडेआठ हजार एकर जागेची संमती देणारे हे स्थानिकच होते, याचा शिवसेनेला विसर पडला आहे. आता या प्रकल्पासाठी पर्याय असलेल्या बारसू-सोलगाव परिसरात कंपनीकडून प्रकल्पासाठी जागा मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याला स्थानिक शेतकरी, बागायतदार आणि शिवसेनेच्याच काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी याठिकाणी प्रकल्पाच्या स्वागताची भूमिका घेतली आहे.

मात्र, तरीही तालुक्यात मोठ्या संख्येने असलेल्या कुणबी समाजबांधवांचे नेते राजापूर तालुक्याच्या विकासाच्या व प्रकल्पातून होणाऱ्या समाजातील युवकांच्या विकासाच्या दृष्टीने या प्रकल्पाकडे कसे पाहतात, हे देखील पाहावे लागणार आहे. नाणार भागात तर तेथील शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मी शिवलकर यांनी जनमताचा कौल घेत रिफायनरी प्रकल्पाचे उघड समर्थन केले होते. त्यांच्या जोडीलाच विभागप्रमुख राजा काजवे यांनीही प्रकल्पाला समर्थन करत आपल्याच पक्षातील लोकभावना शिवसेना नेत्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला.

राजापूर नगर परिषदेसह पाचल व अन्य ग्रामपंचायतींनी समर्थनाचे ठराव केले आहेत. हजारो बेरोजगार तरूण हा प्रकल्प यावा आणि आमचे भवितव्य उज्ज्वल व्हावे, यासाठी पुढाकार घेत आहेत. मात्र, सत्ता आणि पदाच्या माध्यमातून आपल्याच उत्कर्षाचा ध्यास घेऊन काम करणाऱ्या शिवसेनेच्या मंत्री, खासदार आणि आमदारांना बेरोजगार तरूणांची ही तडफड दिसत नाही का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.