शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
2
Donald Trump Tariffs: 'चीनवरील टॅरिफ कमी करण्यास तयार, कारण...'; डोनाल्ड ट्रम्प यांची अचानक नरमाईची भूमिका
3
VIDEO: दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या तरुणाने पोलिसांपासून वाचण्यासाठी नदीत उडी मारली; इम्तियाजचा मृतदेह सापडल्याने खळबळ
4
लोकप्रिय 'पंचायत' सीरिजला सचिवजी देणार होते नकार? जितेंद्र कुमार म्हणाला, "मला वाटलं..."
5
"बॉलिवूड चोर आहे!" नवाजुद्दीन सिद्दीकीचं मोठं विधान, म्हणाला- "लोक या गोष्टींना कंटाळतात..."
6
Samsung ला ४४००००००००० रुपयांचा टॅक्स भरण्याचे आदेश; कंपनीने लावला Reliance Jio वर आरोप, प्रकरण काय?
7
Mumbai Fire: मुंबईत कपड्याच्या शोरुममध्ये अग्नितांडव! पाच मजली इमारतीत अडकलेले लहान मुलांसह १९ लोक
8
पाकिस्तान सुधारत नाही! सलग ११ व्या दिवशी युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय सैनिकांनी धडा शिकवला
9
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी
10
Video: चिनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
11
FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील
12
मिचमिच डोळे, रडारचे कान...! एमजी अ‍ॅस्टरमधून पुण्यात आणि गावखेड्यात भटकंती, कशी वाटली एसयुव्ही...
13
"२ वर्ष अख्खं जग थांबलं होतं तेव्हा माझं घर यांच्यामुळे चाललं", प्रसाद ओकने कोणाला दिलं श्रेय?
14
'पाकिस्तान भारताविरुद्ध ४ दिवसही टीकू शकत नाही, कराची अन् लाहोरमध्ये गुरुकुल उघडणार'; बाबा रामदेव यांनी सुनावले
15
Maharashtra HSC Result 2025: बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
16
अनैतिक संबंधातून वाद, जळगावात भररस्त्यात घडला थरार; पाठलाग करत युवकाला कायमचं संपवलं
17
...म्हणून बाबिलने अर्जुन कपूर, अनन्या पांडेचं नाव घेतलं; अभिनेत्याच्या 'त्या' व्हिडिओनंतर टीमकडून स्पष्टीकरण
18
दूत पाठवले म्हणून अजितदादांची शिंदेंवर नाराजी, पुढे काय?
19
India Pakistan: युद्धाचे ढग गडद होताच मध्यस्थीसाठी मुस्लिम देश आला पुढे, 'हा' नेता येणार भारत दौऱ्यावर
20
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू

शिवसेनेला मिळाला धडा राष्ट्रवादीला सत्तेचा घडा

By admin | Updated: May 8, 2015 00:15 IST

ऐन अर्ज भरण्याच्या काळात राष्ट्रवादीच्याच रमेश कदम यांनी जिल्हा बँकेवर विशेषत: डॉ. तानाजी चोरगे यांच्यावर भ्रष्टाचारचे आरोप केले. त्यामुळे शिवसेनेला प्रचार करण्यासाठी मैदान मोकळेच झाले. मात्र

रत्नागिरी : निवडणुकीचे अर्ज भरताना स्वबळ आजमावण्याची घोषणा करणाऱ्या शिवसेनेने जिल्हा मध्यवर्ती बँकेत पाच जागा जिंकल्या असल्या तरी शिवसेनेची प्रचाराची केलेली तयारी आणि त्यांना असलेली मोठ्या यशाची अपेक्षा पाहता हे यश फारसे उजवे नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जबरदस्त ताकद असलेल्या शिवसेनेला सहकारात मात्र धडा मिळाला आहे. त्यातुलनेत स्वकियांकडून अनेक आरोप होऊनही राष्ट्रवादी, काँग्रेस आणि भाजपच्या सहकार पॅनेलने मिळालेले निर्विवाद वर्चस्व उल्लेखनीय आहे.रत्नागिरी जिल्ह्यात मुळातच सहकाराची मुळं खोलवर रूजलेली नाहीत. अत्यंत अल्प सहकारी संस्था उल्लेखनीय काम करत आहेत. उर्वरित संस्था या केवळ नावापुरत्याच स्थापन झाल्या आहेत. त्यातही ज्या संस्था आहेत, त्यावर पूर्वापार काँग्रेसचेच वर्चस्व आहे. स्व. गोविंदराव निकम यांच्या पुढाकारातून स्थापन झालेल्या संस्थांची संख्या अधिक आहे. त्यामुळे साहजिकच पूर्वीच्या काँग्रेसचे आणि आताच्या राष्ट्रवादीचे त्यावर मोठे वर्चस्व आहे.गेल्या दोन निवडणुकांप्रमाणेच याहीवेळी शिवसेनेने निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी केली ती निवडणुकीचे अर्ज भरण्याची मुदत सुरू झाल्यानंतरच. त्याआधी सहकार पॅनेलकडून डॉ. तानाजी चोरगे यांनी बिनविरोध निवडणुकीचा प्रस्ताव शिवसेनेसमोर ठेवला होता. मात्र अधिक जागांची अपेक्षा असलेल्या शिवसेनेने तो फेटाळला.ऐन अर्ज भरण्याच्या काळात राष्ट्रवादीच्याच रमेश कदम यांनी जिल्हा बँकेवर विशेषत: डॉ. तानाजी चोरगे यांच्यावर भ्रष्टाचारचे आरोप केले. त्यामुळे शिवसेनेला प्रचार करण्यासाठी मैदान मोकळेच झाले. मात्र ज्या चिपळुणात रमेश कदम यांनी डॉ. चोरगे यांच्यावर आरोप केले, त्याच चिपळूण तालुक्यात डॉ. चोरगे यांना ३४ मते मिळाली तर त्यांच्याविरोधी अनंत तेटांबे यांना केवळ सात मते मिळाली. यावरूनच सहकारावर राष्ट्रवादीचा पगडा किती आहे, हे दिसून येते.शिवसेनेने खरे तर आपली बरीच ताकद या निवडणुकीत पणाला लावली होती. आतापर्यंत निवडणुकांचे आणि प्रचाराचे व्यवस्थापन पडद्यामागून पाहणारे रत्नागिरीतील उद्योजक किरण सामंत यावेळी पहिल्यांदाच पडद्यामागून पुढे आले. त्यांनी दाखवलेले व्यवस्थापन कौशल्य ही शिवसेनेला जमेची बाजू ठरली. शिवसेनेच्या खासदार, आमदारांनी या निवडणुकीत लक्ष घालण्याची ही पहिलीच वेळ. त्या अर्थाने शिवसेनेने यापूर्वीच्या निवडणुकांपेक्षा जास्त प्रचार केला, हे स्पष्ट होते. त्यामुळेच गतवेळी दोन संचालक असलेल्या शिवसेनेचे यावेळी पाच संचालक झाले आहेत. पण या पाच संचालकांपैकी गणेश लाखण, आदेश आंबोळकर आणि किरण सामंत हे आत्ता शिवसेनेचे असले तरी आधी ते शिवसेनेत नव्हते. त्यामुळे शिवसेनेला अधिक जागा मिळाल्या असल्या तरी ते शिवसेनेचे इतर निवडणुकांसारखे दणदणीत यश नाही. त्या तुलनेत स्वकियांनी केलेल्या आरोपांनंतरही सहकार पॅनेलने मिळवलेले यश महत्त्वाचे आहे.गत निवडणुकीत शिवसेनेचे दोन आणि तीन बंडखोर उमेदवार संचालक झाले होते. त्यामुळे सहकार पॅनेलला फार मोठा धक्का बसलेला नाही. रत्नागिरीतील नाना मयेकर आणि लांजातील सुरेश साळुंखे या दोन जागांवरील सहकार पॅनेलचे अपयश वगळता उर्वरित निकाल त्या पॅनेलला अपेक्षितच लागले आहेत. (प्रतिनिधी)