शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
2
जगातील ५० इस्लामिक देश एकटवणार; पहिल्यांदाच 'असं' काही घडणार, अमेरिकेची चिंता वाढली
3
Video: "इरफान... प्रामाणिक राहा..."; IND vs PAK सामन्यानंतर गौतम गंभीर कॅमेऱ्यासमोर असं का बोलला?
4
अनंत अंबानी यांच्या वनताराला क्लीनचिट; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?
5
हवाई दलात इंजिनिअर लोकेश बहिणीच्या घरी आला आणि अचानक २४व्या मजल्यावरून मारली उडी
6
सत्तापालटाच्या अवघ्या ३ दिवसांत नेपाळच्या Gen Z आंदोलकांमध्ये असंतोष; सुशीला कार्कींच्या घराबाहेर निदर्शने!
7
पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर सूर्यकुमार यादवचं पत्नीसोबत जंगी सेलिब्रेशन, पाहा खास फोटो
8
Astro Tips: घर, प्लॉट विक्रीसाठी सगळे उपाय करून पाहिले? तरी निराशा? करा 'हा' प्रभावी तोडगा!
9
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
10
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
11
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
12
घाव भर गया है! परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'वर भाष्य, दिग्दर्शकासोबतचं नातं बिघडलं? म्हणाले...
13
४०% पार्ट्स होणार स्वस्त! सर्व्हिसिंगच्या बिलातही दिलासा; GST कपातीनंतर सोपा होणार कार-बाईकचा मेंटेनन्स
14
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
15
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप
16
शुक्र गोचर २०२५: शुक्रादित्य राजयोग; 'या' ६ राशी हात लावतील तिथे सोनं करतील!
17
ITR भरण्याची अंतिम मुदत वाढणार? सोशल मीडियावर चर्चा; आयकर विभागाने केलं स्पष्ट
18
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
19
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
20
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...

रत्नागिरीत १८ ग्रामपंचायतींमध्ये विलगीकरण कक्ष उभारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील दोन हजारपेक्षा जास्त लोकवस्ती असलेल्या ४५पैकी १८ ग्रामपंचायतींमध्ये कोरोना ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील दोन हजारपेक्षा जास्त लोकवस्ती असलेल्या ४५पैकी १८ ग्रामपंचायतींमध्ये कोरोना रुग्णांसाठी विलगीकरण कक्ष उभारण्यात आले आहेत. या विलगीकरण कक्षांमध्ये सुमारे ५७० रुग्णांची सोय करण्यात येणार आहे. या विलगीकरण कक्षांमध्ये कोरोना रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.

कोरोना रुग्णांना गृह अलगीकरणात ठेवू नये, असा निर्णय शासनाने जाहीर केला होता. त्यानंतर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी जिल्ह्यातील दोन हजार लोकवस्ती असलेल्या ग्रामपंचायतींनी कोरोना रुग्णांसाठी विलगीकरण कक्ष उभारावेत, असे आवाहन केले होते. त्याला रत्नागिरी तालुक्यातील ग्रामपंचायतींनी चांगला प्रतिसाद दिला आहे. रत्नागिरी तालुक्यामध्ये ९४ ग्रामपंचायती आहेत, त्यापैकी दोन हजार लोकवस्ती असलेेल्या ४५ ग्रामपंचायती असून, त्यातील १८ ग्रामपंचायतींनी विलगीकरण कक्ष उभारले आहेत. या विलगीकरण कक्षांमध्ये ग्रामपंचायतींकडून रुग्णांसाठी सोय करण्यात आली आहे. याठिकाणी रुग्णांसाठी चहा, नाष्टा, जेवणाची सोय ग्रामपंचायतींकडून करण्यात आली आहे.

या विलगीकरण कक्षात कोरोना रुग्णांना १४ दिवस ठेवण्यात येणार आहे. तालुक्यातील वाटदमध्ये २५ रुग्ण, कोतवडेमध्ये १० रुग्ण, चांदोरमध्ये १३ आणि गणपतीपुळे येथे २५ रुग्णांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी हे दिवसातून दोनदा या विलगीकरण कक्षांना भेट देत आहेत. यावेळी रुग्णांची ऑक्सिजनची पातळी आणि तापमानाची तपासणी केली जात असून, त्यांच्यावर औषधोपचारही करत आहेत.

या कक्षांची जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष उदय बने, पंचायत समिती सभापती संजना माने, उपसभापती उत्तम सावंत, गटविकास अधिकारी तुकाराम जाधव, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. महेंद्र गावडे, विस्तार अधिकारी नरेंद्र पराते तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांनी पाहणी केली. त्याचबरोबर खासदार विनायक राऊत यांनीही गणपतीपुळे, वाटद, कोतवडे, नेवरे येथील विलगीकरण कक्षांना भेट दिली.

.....................

प्रशासनाने घेतल्या १७० इमारती ताब्यात

रत्नागिरी तालुक्यातील प्राथमिक, माध्यमिक शाळा अशा १७० इमारती प्रशासनाने ताब्यात घेतल्या आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता जास्त आहे. त्यादृष्टाने आरोग्य विभाग आणि रत्नागिरी पंचायत समितीने तयारी केली आहे.

....................

कोरोनाचे एकूण रुग्ण - ११,५२९

बरे झालेले रुग्ण - १०,०९६

ॲक्टिव्ह रुग्ण - १,४३३

मृत्यू - ३८८

दोन हजार लोकवस्ती असलेल्या ग्रामपंचायती - ४५

विलगीकरण कक्ष उभारलेल्या ग्रामपंचायती - १८

किती रुग्णांची सोय होणार - ५७०

विलगीकरण कक्ष उभारलेल्या ग्रामपंचायती

नाचणे, शिरगाव, पावस, कुवारबाव, नेवरे, कोतवडे, वाटद, नांदिवडे, मिऱ्या, वरवडे, चांदोर, मिरजोळे, गोळप, कर्ला, करबुडे, जयगड, पूर्णगड, गणपतीपुळे.