शहरं
Join us  
Trending Stories
1
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
2
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
3
“प्रशांत जगतापांनी अनेक पक्षांची ऑफर धुडकावून विचारासाठी काँग्रेस मार्ग पत्करला”: वडेट्टीवार
4
"अल्पसंख्याकांवरील अत्याचार खपवून घेणार नाही" २,९०० हून अधिक हल्ल्यांचा पुरावा; भारताचा बांगलादेशला गंभीर इशारा
5
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
6
भाजपा आमदारांच्या ‘ब्राह्मण भोजना’मुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ, भाजपामध्ये चाललंय काय? 
7
Shehnaaz Gill : "इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा
8
उद्धव ठाकरेंच्या भेटीत काय ठरले? जागावाटपाबाबत बैठकीत चर्चा झाली का?; जयंत पाटील म्हणाले...
9
अडीच वर्षातील काम जनता विसरणार नाही; शिवसेनेत येताच प्रकाश महाजनांचे शिंदेंबाबत कौतुकोद्गार
10
रिपल इफेक्ट : ग्राहकांच्या सवयी बाजाराच्या हालचालींवर कशा परिणाम करतात?
11
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
12
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
13
कन्या राशीसाठी नवीन वर्ष 2026 बदलांचे आणि आत्मशोधाचे वर्ष; संघर्षातून गवसणार यशाचा मार्ग!
14
'लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात, पण जगताप यांनी वैचारिक लढ्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केला', हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं कौतुक 
15
सिंह राशीसाठी नवीन वर्ष 2026 स्वप्नपूर्तीचे वर्ष; आश्चर्याचे धक्के आणि परदेश प्रवासाचे योग!
16
नगरसेविकेच्या पतीच्या हत्येनंतर खोपोलीत पोलीस ठाण्याला घेराव, पोलीस निरीक्षकावर गंभीर आरोप, मागणी काय?
17
अदानी ग्रुपकडून मिळाली ₹3400 कोटींची ऑर्डर, झटक्यात ५% नं वधारला शेअर; आता खरेदीसाठी उडाली लोकांची झुंबड
18
MNS: गणपती बाप्पा सांताक्लॉजच्या वेशात? जाहिरातीवर मनसेचा संताप; केंद्र सरकारवर केली टीका!
19
गृहकर्जाचा हप्ता वाढलाय? 'लोन ट्रान्सफर'ने वाचवा लाखो रुपये; कमी व्याजासाठी बँक कशी बदलावी?
20
ठाकरे-शिंदेंनी प्रयत्न केले, पण अखेर काँग्रेसमध्ये गेले; प्रशांत जगताप यांची राजकीय कारकीर्द
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीत १८ ग्रामपंचायतींमध्ये विलगीकरण कक्ष उभारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील दोन हजारपेक्षा जास्त लोकवस्ती असलेल्या ४५पैकी १८ ग्रामपंचायतींमध्ये कोरोना ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील दोन हजारपेक्षा जास्त लोकवस्ती असलेल्या ४५पैकी १८ ग्रामपंचायतींमध्ये कोरोना रुग्णांसाठी विलगीकरण कक्ष उभारण्यात आले आहेत. या विलगीकरण कक्षांमध्ये सुमारे ५७० रुग्णांची सोय करण्यात येणार आहे. या विलगीकरण कक्षांमध्ये कोरोना रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.

कोरोना रुग्णांना गृह अलगीकरणात ठेवू नये, असा निर्णय शासनाने जाहीर केला होता. त्यानंतर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी जिल्ह्यातील दोन हजार लोकवस्ती असलेल्या ग्रामपंचायतींनी कोरोना रुग्णांसाठी विलगीकरण कक्ष उभारावेत, असे आवाहन केले होते. त्याला रत्नागिरी तालुक्यातील ग्रामपंचायतींनी चांगला प्रतिसाद दिला आहे. रत्नागिरी तालुक्यामध्ये ९४ ग्रामपंचायती आहेत, त्यापैकी दोन हजार लोकवस्ती असलेेल्या ४५ ग्रामपंचायती असून, त्यातील १८ ग्रामपंचायतींनी विलगीकरण कक्ष उभारले आहेत. या विलगीकरण कक्षांमध्ये ग्रामपंचायतींकडून रुग्णांसाठी सोय करण्यात आली आहे. याठिकाणी रुग्णांसाठी चहा, नाष्टा, जेवणाची सोय ग्रामपंचायतींकडून करण्यात आली आहे.

या विलगीकरण कक्षात कोरोना रुग्णांना १४ दिवस ठेवण्यात येणार आहे. तालुक्यातील वाटदमध्ये २५ रुग्ण, कोतवडेमध्ये १० रुग्ण, चांदोरमध्ये १३ आणि गणपतीपुळे येथे २५ रुग्णांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी हे दिवसातून दोनदा या विलगीकरण कक्षांना भेट देत आहेत. यावेळी रुग्णांची ऑक्सिजनची पातळी आणि तापमानाची तपासणी केली जात असून, त्यांच्यावर औषधोपचारही करत आहेत.

या कक्षांची जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष उदय बने, पंचायत समिती सभापती संजना माने, उपसभापती उत्तम सावंत, गटविकास अधिकारी तुकाराम जाधव, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. महेंद्र गावडे, विस्तार अधिकारी नरेंद्र पराते तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांनी पाहणी केली. त्याचबरोबर खासदार विनायक राऊत यांनीही गणपतीपुळे, वाटद, कोतवडे, नेवरे येथील विलगीकरण कक्षांना भेट दिली.

.....................

प्रशासनाने घेतल्या १७० इमारती ताब्यात

रत्नागिरी तालुक्यातील प्राथमिक, माध्यमिक शाळा अशा १७० इमारती प्रशासनाने ताब्यात घेतल्या आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता जास्त आहे. त्यादृष्टाने आरोग्य विभाग आणि रत्नागिरी पंचायत समितीने तयारी केली आहे.

....................

कोरोनाचे एकूण रुग्ण - ११,५२९

बरे झालेले रुग्ण - १०,०९६

ॲक्टिव्ह रुग्ण - १,४३३

मृत्यू - ३८८

दोन हजार लोकवस्ती असलेल्या ग्रामपंचायती - ४५

विलगीकरण कक्ष उभारलेल्या ग्रामपंचायती - १८

किती रुग्णांची सोय होणार - ५७०

विलगीकरण कक्ष उभारलेल्या ग्रामपंचायती

नाचणे, शिरगाव, पावस, कुवारबाव, नेवरे, कोतवडे, वाटद, नांदिवडे, मिऱ्या, वरवडे, चांदोर, मिरजोळे, गोळप, कर्ला, करबुडे, जयगड, पूर्णगड, गणपतीपुळे.