शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
2
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
3
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
4
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
5
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
6
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
7
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
8
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
9
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
10
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
11
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
12
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
13
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
14
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
15
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
16
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
17
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
18
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
19
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
20
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...

सेनेच्या नगराध्यक्ष उमेदवारीचा तिढा सुटेना

By admin | Updated: October 27, 2016 00:03 IST

रत्नागिरी नगरपरिषद निवडणूक : ‘मातोश्री’वर बैठक; चिठ्ठी टाकून ठरणार उमेदवार

रत्नागिरी : रत्नागिरी नगराध्यक्षपदाची सेनेची उमेदवारी निश्चित करण्याचा ‘मातोश्री’ बंगल्यावरील दुसरा मुहूर्तही फोल ठरला आहे. बुधवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर तिघेही इच्छुक आग्रही राहिल्याने चिठ्ठ्या टाकून उमेदवार ठरविला जाणार आहे. आज, गुरुवारी किंवा उद्या, शुक्रवारी ही निवड जाहीर होणार आहे. रत्नागिरीतून सेनेतर्फे नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी बंड्या साळवी, मिलिंद कीर व राहुल पंडित हे तिघेजण इच्छुक आहेत. हे सर्व विद्यमान नगरसेवक असून, कीर हे माजी नगराध्यक्ष आहेत, तर साळवी व पंडित हे दोन्ही माजी उपनगराध्यक्ष आहेत. चार दिवसांपूर्वीच या तिघांना नगराध्यक्ष उमेदवारीबाबत एकमत करण्यासाठी पक्षप्रमुख ठाकरे यांनी ‘मातोश्री’वर बोलावले होते. त्यावेळी केवळ दोन मिनिटांची भेट झाली. तीनही उमेदवारांनी पुढील चार दिवसांत एकाच नावावर मतैक्य घडवून आणावे, असे उद्धव ठाकरे यांनी तिघांनाही सांगितले आणि उमेदवारी निश्चितीचा चेंडू इच्छुकांच्याच कोर्टात टाकला होता.मात्र, तिघेही इच्छुक उमेदवारीसाठी आग्रही राहिले. मतैक्य होत नसल्याचे स्पष्ट झाल्याने तिघांनाही पुन्हा ‘मातोश्री’वरून बुधवारच्या भेटीचे निमंत्रण देण्यात आले. त्यानुसार तिघेही इच्छुक बुधवारी ‘मातोश्री’वर दाखल झाले. सकाळपासून तिष्ठत असलेल्या इच्छुकांना दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास उद्धव ठाकरे यांनी भेटीस बोलावले. पाच मिनिटे चर्चा झाली. मतैक्य होत नसल्याचे त्यावेळीही स्पष्ट झाले. त्यामुळे चिठ्ठ्या टाकून नगराध्यक्षपदाचा उमेदवार ठरविला जाईल हे मान्य आहे काय, अशी विचारणा ठाकरे यांनी केली. त्याला तीनही इच्छुकांनी अनुकूलता दर्शवली. त्यामुळे आज किंवा उद्या नावांच्या चिठ्ठ्या टाकून नगराध्यक्षपदाचा उमेदवार ठरविला जाईल, असे पक्षप्रमुख ठाकरे यांनी इच्छुकांना सांगितले आहे. यानंतर तीनही इच्छुक ‘मातोश्री’वरून रत्नागिरीकडे रवाना झाले. (प्रतिनिधी)वावड्यांना ऊत...सेनेच्या रत्नागिरी नगराध्यक्ष उमेदवारीबाबत ‘मातोश्री’ बंगल्यावर सुरू असलेल्या घडामोडींकडे रत्नागिरीकरांचे सातत्यपूर्ण लक्ष होते. उमेदवारी मिळाली, जाहीर झाली, अशा वावड्याही उठविल्या जात होत्या. मात्र, दुपारी ३ वाजल्यानंतर याबाबतचे चित्र स्पष्ट झाले. तिढा तसाच राहिल्याने आता या उमेदवारीची लॉटरी कोणाला लागणार? याकडे रत्नागिरीकरांचे लक्ष लागले आहे.उमेदवार निश्चित?चिठ्ठ्यांद्वारे उमेदवार निश्चिती होणार, असे स्पष्ट झाल्यानंतरही सेनेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराचे नाव आधीच नक्की झाले आहे, असे शहरात अनेक ठिकाणी ठामपणे सांगितले जात होते. त्यामुळे चिठ्ठ्यांआधी उमेदवार निश्चिती की चिठ्ठ्यांनंतर उमेदवार निश्चिती, अशी चर्चाही राजकीय वर्तुळात रंगली होती.