शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
4
Vat Purnima 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
5
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
6
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
7
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
8
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
9
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
10
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
11
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
12
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
13
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
14
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
15
'रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?' मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
16
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
17
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
18
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
19
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट

अजित गोरुले यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:51 IST

संदीप माळवदेचे यश देवरुख : येथील श्री सदगुरू लोकमान्य वाचनालयातर्फे आयोजित ऑनलाईन सामान्यज्ञान स्पर्धेत संदीप दत्तात्रय माळवदे याने प्रथम ...

संदीप माळवदेचे यश

देवरुख : येथील श्री सदगुरू लोकमान्य वाचनालयातर्फे आयोजित ऑनलाईन सामान्यज्ञान स्पर्धेत संदीप दत्तात्रय माळवदे याने प्रथम क्रमांक पटकावला आहे. रमेश गोपाळ यांनी द्वितीय, अर्चना मांगले यांनी तृतीय क्रमांक मिळविला. सृजल टाकळे, माधुरी जोशी, वैष्णवी पारकर, अशोक रनवरे आदींना उत्तेजनार्थ क्रमांक मिळाला आहे.

डांबरीकरण मागणीला यश

रत्नागिरी : डोर्ले खोतमळा रस्ता डांबरीकरण करण्याची मागणी ग्रामस्थ, ग्रामपंचायतीकडून गेली अनेक वर्षे करण्यात येत आहे. मागणीला यश आले असून रस्ता डांबरीकरणासाठी जनसुविधेंतर्गत साडेतीन लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. लवकरच रस्त्याचे काम मार्गी लागणार आहे.

रस्ता दुरुस्तीची प्रतीक्षाच

रत्नागिरी : तालुक्यातील नेवरे गावातील रस्ते निकृष्ट झाले आहेत. ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. रस्ता दुरुस्तीसाठी निधी मंजूर झाला असला तरी प्रत्यक्षात काम केव्हा सुरू होणार याबाबत ग्रामस्थांना प्रतीक्षा लागली आहे. पावसाळ्यापूर्वी रस्ता दुरूस्ती करण्याची मागणी होत आहे.

विद्यार्थी, पालकात संभ्रम

रत्नागिरी : शासनाने दहावीच्या परीक्षा रद्द केल्या असल्या तरी बारावीच्या परीक्षा ऑफलाईन घेण्यात येणार आहेत; मात्र याबाबत अद्याप तारखा व वेळापत्रक जाहीर केलेले नसल्याने पालक, विद्यार्थ्यांमध्ये परीक्षेबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. शासनाच्या सूचनेकडे लक्ष लागून राहिले आहे.

विक्रेत्यांवर संक्रांत

रत्नागिरी : कोकणी मेवा महामार्गावर बसून विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर संक्रांत आली आहे. आंबे, काजूसह, फणस, करवंदे, जांभळे, जाम विक्री करून उदरनिर्वाह करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. लाॅकडाऊनमुळे सर्वत्र शांतता आहे. गतवर्षीप्रमाणे यावर्षीही विक्रेत्यांवर आर्थिक संकट ओढावले आहे.

माकडांचा उपद्रव

रत्नागिरी : तालुक्यातील टेभ्ये, चांदेराई, हरचेरी परिसरात माकडांचा उपद्रव वाढला आहे. नारळी, आंबा बागायतीसह भाजीपाला पिकांची नासाडी करीत आहेत. काैलारू घरात शिरुन अन्नपदार्थ खाऊन फस्त करीत आहेत. ग्रामस्थ हैराण झाले आहेत.

फळांना मागणी

रत्नागिरी : रमजान सुरू असल्याने फळांना वाढती मागणी होत आहे. केळी, सफरचंद, चिकू, पेरू, डाळिंब, अननस, पपई, कलिंगड तसेच आंब्यासाठी मागणी होत आहे. रविवारी फळांसाठी मागणी आणखी वाढणार असल्याने विक्रेत्यांनी आधीच स्टाॅक जमा केला आहे.

भूमिगत वाहिनीच्या कामाला वेग

रत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्पांतर्गत आडी ते परटवणे तसेच शहरातील काही भागात भूमिगत वाहिनीचे काम सुरू आहे. सध्या परटवणे ते गांजुर्डे पर्यंत काम जोरात सुरू असल्याने वाहन चालकांना वाहन खबरदारी घेत चालवावे लागत आहे. लाॅकडाऊनमुळे रस्त्यावरील वर्दळ कमी असल्याने कामाला गती प्राप्त झाली आहे.

मार्गदर्शक सूचनांची प्रतीक्षा

रत्नागिरी : शासनाने कोरोनामुळे दहावीच्या परीक्षा तर रद्द केल्या आहेत. अकरावी परीक्षेसाठी प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे; मात्र त्यासाठी शासनाकडून मार्गदर्शक सूचना अद्याप प्राप्त झालेल्या नाहीत. शासनाने याबाबत स्पष्ट सूचना जाहीर करण्याची मागणी विद्यार्थी, पालकांमधून होत आहे.