शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
2
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
3
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
4
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
5
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
6
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
7
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
8
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
9
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
10
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
11
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
12
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
13
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
14
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
15
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
16
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
17
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
18
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
19
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
20
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने नैराश्येच्या गर्तेत ढकलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेने सर्वच वयोगटात चिंतेचे आणि नैराश्येचे वातावरण निर्माण केले ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेने सर्वच वयोगटात चिंतेचे आणि नैराश्येचे वातावरण निर्माण केले आहे. रुग्णांबरोबरच इतरांमध्येही डिप्रेशन निर्माण केले आहे. त्यामुळे आता कोरोनावर उपचार करण्याबरोबरच डिप्रेशनसाठीही उपचार करण्याची गरज भासू लागल्याने आता या औषधांची विक्रीही वाढली आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत लोकांना लॉकडाऊनच्या काळात आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागले. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. ही परिस्थिती बऱ्यापैकी रुळावर येत असतानाच, कोरोनाची दुसरी लाट धडकली. पहिल्या लाटेत शहरांमध्येच बाधित होणाऱ्यांचे प्रमाण अधिक होते. मात्र, दुसऱ्या लाटेत तर गावांमध्येही मोठ्या प्रमाणावर संसर्ग पसरला. मृत्यूचे जणू काही तांडवच सुरू झाले. त्यामुळे कोरोना झालेल्यांना आपण यातून बरे होऊना, ही पराकोटीची भीती वाटू लागली आहे. अनेक मृत्यू या भीतीतूनच झाले आहेत. जे आतापर्यंत कोरोनापासून सुरक्षित राहिले आहेत, त्यांना आपण बाधित झालो तर? ही भीती सतावत आहे. अनेकांनी आपल्या आप्तांचा मृत्यू पाहिल्याने त्यांना कमालीचे नैराश्य आले आहे. त्यातच आता तिसऱ्या लाटेचा धोका सतावतो आहे. सध्या सर्वच वयोगटात नैराश्य निर्माण झाल्याने यातून सावरण्यासाठी औषधेही जास्त प्रमाणात घेत आहेत.

डिप्रेशन का वाढले?

कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी लोकांना कोरोना महिन्या - दोन महिन्यांनी जाणार आहे, हे माहीत होते. त्यामुळे सर्व नियमांचे पालन केल्याने त्याचा संसर्ग तितकासा वाढला नाही.

पहिल्या लाटेत विस्कळीत झालेली आर्थिक घडी सुरळीत होत असतानाच पुन्हा कोरोनाची दुसरी लाट आली. त्यामुळे अनेकांचे व्यवसाय पुन्हा ठप्प झाले.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा संसर्ग ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणावर झाला. अगदी जवळच्या व्यक्तींच्या मृत्यूमुळे नैराश्य पराकोटीचे पसरले आहे. जगण्यावरील विश्वास उडाला आहे.

आता तिसरी लाट येणार असून तिचा बालकांना धोका असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे डिप्रेशन अधिकच वाढले.

औषध विक्री दुपटीने वाढली...

रुग्ण पॉझिटिव्ह आल्यानंतर तो प्रचंड भीतीखाली राहतोच. पण आपण पॉझिटिव्ह आलो तर काय होईल, ही भीती आज प्रत्येकाच्या मनात सावलीसारखी वावरत आहे. यातूनच अनेक अगदी मृत्यूच्या दारात जात आहेत. कोरोनाच्या भीतीतून मोठ्या प्रमाणावर डिप्रेशन येत आहे. त्यामुळेच त्यांना या मानसिक स्थितीतून सावरण्यासाठी कोरोनाबरोबरच इतर औषधांची गरज भासत असल्याचे रत्नागिरीतील औषध विक्रेत्याने सांगितले.

सद्यस्थितीत प्रत्येकानेच धीराने घ्यायला हवं. कुठलीही टोकाची भूमिका न घेता, ही परिस्थितीही बदलेल, अशी आशा बाळगायला हवी. महत्त्वाचे म्हणजे कोरोनाला दूर ठेवण्यासाठी खबरदारी घेतानाच योग्य आहार, व्यायाम आणि मन शांत राहण्यासाठी योगा किंवा प्राणायाम करायला हवा.

- डॉ. अतुल ढगे, मानसोपचार तज्ज्ञ, रत्नागिरी

अनेकांचे आप्त गेलेत. कुणाचे जॉब गेलेत. त्यामुळे पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत सर्वच वयोगटात चिंतेचे आणि नैराश्येचे वातावरण मोठ्या प्रमाणावर आहे. सध्याची परिस्थिती पाहता, कुटुंबात एकत्र राहून एकमेकांना आधार देणे, सावरणे गरजेचे आहे. हेही दिवस जातील, ही सकारात्मकताच यातून तारेल.

- डॉ. श्रुतिका कोतकुंडे, मानसोपचार तज्ज्ञ, चिपळूण

हे टाळण्यासाठी काय कराल?

कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी जसा संयम दाखविला, तशा संयमाची आताही गरज आहे. ही परिस्थितीही बदलणार आहे, मात्र, त्यासाठी थोडा कालावधी जाणार आहे, ही वस्तुस्थिती आपण सर्वांनीच स्वीकारायला हवी.

सध्या कोरोना मोठ्या प्रमाणावर फैलावला आहे. या महामारीत अगदी जवळच्या आप्तांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे नैराश्य आले आहे. परंतु खचून न जाता धीराने सामना करायला हवा. कोरोनाची खबरदारी घेऊन मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करायलाच हवे.

आपण योग्यप्रकारे कोरोनाच्या नियमांचे पालन करतोय, तर आपण नक्कीच सुरक्षित राहू, असा सकारात्मक विचार करायला हवा. मन संतुलित राहावे यासाठी मेडिटेशन आणि व्यायाम करायला हवा.

सद्यपरिस्थितीत आपण आपले शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य सांभाळणे गरजेचे आहे. त्यासाठी परिपूर्ण आहार घेणे गरजेचे असून बाहेरचा आहार टाळायला हवा. फळे, कडधान्ये याचा समावेश आहारात हवा करायला हवा.