शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
3
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
4
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
5
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
6
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
7
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
8
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
9
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
10
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
11
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
12
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
13
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
14
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
15
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
16
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
17
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
18
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
19
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
20
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड

पिकांच्या संरक्षणासाठी पडद्याच्या शेतीचा उपाय

By admin | Updated: December 5, 2015 23:37 IST

गुहागर तालुका : शेती वाचविण्यासाठी साड्यांचे, कापडांचे कुंपण करून शेतीभोवती तटबंदी

जावेद शेख / शृंगारतळी गुहागर तालुक्यात वन्यजीवांपासून होणारे पिकाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी पडद्याची शेती करण्यास सुरूवात केली आहे. शेतातील पिकाचे संरक्षण करण्यासाठी पडद्याची तटबंदी उभी करून वन्यप्राण्यांना चकवा देण्याचा प्रयत्न या कल्पनेतून केला जात आहे. मात्र, तरीही वानर प्रजाती या तटबंदीला सहज भेदतानाचे चित्र दिसत आहे. त्यामुळे शेतीचे नुकसान अजूनही होतच आहे. तालुक्यात सध्या फळे व पालेभाज्यांचे उत्पादन घेण्याकडे प्रयोगशील शेतकऱ्यांचा कल दिसत आहे. यामध्ये कलिंगड उत्पादनाबरोबरच विविध पालेभाज्या घेण्याचा प्रयत्न येथील शेतकरी करताना दिसत आहेत. यासाठी कृषी विभाचेही मार्गदर्शन लाभत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. वांगी, लाल माठ, भेंडी, पावटा, पालक, मुळा, पडवळ, हिरवी मिरची, केळी याचे उत्पादन घेण्याचा प्रयोग शेतकऱ्यांनी यशस्वी करून दाखवला आहे. मात्र, सर्वात अधिक उत्पन्न हे कलिंगड शेतीतून होत असल्याने हे पीक घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल दिसत आहे. या शेतीतून रोजगार निर्मिती बरोबरच हातात पैसा खेळू लागला असल्याने शेतकरीवर्ग वेगवेगळे प्रयोग करू लागला आहे. मात्र, शेतकऱ्यांना पाण्याची कमतरता, कीडरोग या समस्यानांही तोंड द्यावे लागत आहे. यामध्ये वन्यजीवांची प्रमुख समस्या शेतकऱ्यांना भेडसावताना दिसत आहे. रानडुक्कर, गवा रेडा, मोकाट जनावरे आणि वानरांमुळे शेतीतील पिकांचे नुकसान होत आहे. वानर रोप ओरबाडून खात असल्याने खाण्यापेक्षा अधिक नुकसानच जास्त करत आहेत. मोठे शेतकरी यावर उपाय म्हणून नायलॉन धाग्याचा पडदा संरक्षक भिंत म्हणून वापर करत आहेत. तर लहान शेतकरी घरातील जुन्या साडया वापरून शेतीला तटबंदी करत आहेत. शेतातील हिरवे पीक वन्यप्राण्यांच्या नजरेला पडू नये यासाठी शेतकरी प्रयत्न करत आहेत. शेती वाचविण्यासाठी ठिकठिकाणी साडयांचे व कापडाचे कुंपण तयार करून तटबंदी करत शेती वाचविण्याची धडपड शेतकरी करताना दिसत आहेत.