शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण?
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
6
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
7
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
8
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
9
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
10
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
11
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

शाळा लखलखणार सौर ऊर्जेन

By admin | Updated: March 3, 2015 22:18 IST

जिल्हा परिषद : वीज बिलाची कटकट कायमची संपणारे

रत्नागिरी : जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना वीज बिलांचा प्रश्न कायम सतावतो. त्यासाठी ग्रामीण भागातील प्राथमिक शाळांना सौर होम लाईट सेट देण्यात येणार आहे. त्यामुळे प्राथमिक शाळांचा वीजेचा प्रश्न कायमचा सुटणार आहे.रत्नागिरी जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागामध्ये २७८६ प्राथमिक शाळा आहेत. यातील अनेक शाळा ग्रामीण व डोंगरळ, दुर्गम भागामध्ये आहे. काही शाळा अति दुर्गम वाड्या-वस्त्यांमध्ये असल्याने त्या शाळा विद्युतीकरणापासून अजूनही दूर आहेत. कारण त्यांना महावितरणकडून अजूनही वीज पुरवठा करण्यात आलेली नाही. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांना वीज बिल भरण्याचा प्रश्न आजही भेडसावत आहे. कारण, ४ टक्के सादिलच्या रक्कमेतून वीज बिले भरण्याचा खर्च करण्याचा शासनाकडून कोणताही आदेश किंवा परिपत्रक नसल्याने शाळांसमोर वीज बिलांचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांकडून प्रशासनाला कोणताही आर्थिक लाभ मिळत नाही. वीज वाणिज्यीक दराने यावी, अशी मागणी अनेकदा करण्यात आली आहे. याबाबत जिल्हा परिषद आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांशी चर्चा झाली. तसेच महावितरणाला शाळांचे वीज बिल घरगुती दराने देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र, त्याबाबबत महावितरणने सकारात्मक भूमिका घेतलेली नाही. वीज बिल थकीत असलेल्या प्राथमिक शाळांविरोधात महावितरणने मध्यंतरी शाळांचे वीज पुरवठा खंडित करण्याचा सपाटाच चालविला होता. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शिक्षण समिती, स्थायी समिती आणि सर्वसाधारण सभा यांच्यामध्ये जोरदार चर्चा झाली होती. आतापर्यंत महावितरणने सुमारे २१३ प्राथमिक शाळांचा वीज पुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे आजही या शाळा आंधारात आहेत. प्राथमिक शाळांमधील वीजेचा प्रश्न कायमचा सुटावा, यासाठी जिल्हा परिषद शिक्षण समितीने त्यावर तोडगा काढण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाकडून येणाऱ्या ४ टक्के सादिलमधून जिल्हा स्तरावरुन खर्च करून शाळांसाठी सौर होम लाईट सेट पुरविण्याचा निर्णय घेतला. त्याला मान्यताही मागील सभेत देण्यात आली होती. त्यामुळे भविष्यात शाळा महावितरणवर अवलंबून राहणार नाहीत. कारण जिल्हा परिषदेतील बहुतांश शाळांमध्ये सौर होम लाईट सेट पुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे शाळांचा वीजेचा प्रश्नही कायमचा सुटणार आहे. वीज बिलाचीही कटकट राहणार नाही. (शहर वार्ताहर)सभेत मिळाली मान्यता...४ टक्के सादिल अनुदानापैकी जिल्हास्तरावर खर्च करणार.जिल्ह्यात आजही अनेक शाळा विद्युतीकरणापासून वंचित.आजही २१३ शाळांचा वीज पुरवठा महावितरणकडून खंडीत.जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागामध्ये २७८६ प्राथमिक शाळा.सौर ऊर्जा शाळांना पुरवण्याच्या कामाला मागील सभेत मिळाली मान्यता.