शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

शाळेची छप्परदुरुस्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:41 IST

कार्यालयांचे निर्जंतुकीकरण साखरपा : साखरपा ग्रामपंचायतीतर्फे गावातील सर्व शासकीय इमारतींचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी विविध उपाययोजना ...

कार्यालयांचे निर्जंतुकीकरण

साखरपा : साखरपा ग्रामपंचायतीतर्फे गावातील सर्व शासकीय इमारतींचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी विविध उपाययोजना ग्रामपंचायतीतर्फे राबविण्यात येत आहेत. त्या अंतर्गत शासकीय कार्यालयांतून सॅनिटायझरची फवारणी करण्यात आली.

शोभिवंत झाडांची लागवड

दापोली : नगरपंचायतीच्या हद्दीत मुख्य रस्त्याच्या दुतर्फा शोभिवंत झाडांची रोपे लावून सुशोभीकरण करण्यात आले. स्वच्छ दापोली, सुंदर दापोली अंतर्गत विविध शोभिवंत झाडे लावण्यात येत आहे. उपजिल्हा रुग्णालयाजवळ तसेच शासकीय गोडाउन आदी ठिकाणी ही झाडे लावण्यात आली.

कार्यक्षम यंत्रणा हवी

चिपळूण : पिकांच्या हमीभावात वाढ करून मोदी सरकारने शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी पाऊल उचलले आहे. त्यामुळे आघाडी सरकारने कापूस, धान, तूर आदी पिकांच्या खरेदीसाठी कार्यक्षम यंत्रणा तयार करावी, अशी मागणी भाजपचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू यांनी केली आहे.

परकार यांची निवड

चिपळूण : शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक शहराध्यक्षपदी कादीर परकार यांची निवड करण्यात आली. आमदार शेखर निकम यांच्या हस्ते परकार यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले आहे. यावेळी अल्पसंख्याक चिपळूण तालुकाध्यक्ष समीर काझी, सावर्ड्याचे उपसरपंच जमीर मुल्लाजी उपस्थित होते.

नावीन्यपूर्ण लागवड

चिपळूण : तालुक्यात खरीप हंगामात नावीन्यपूर्ण शेतीचे प्रयोग राबविले जाणार आहेत. लोकसहभागातून काळ्या व लाल भाताचे उत्पादन घेण्यात येणार आहे. तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत शेतक-यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. लाल भाताचे अडीचशे किलो बियाणे व काळ्या भाताचे १०० किलो बियाणे वाटप करण्यात आले.

विमा संरक्षणाची मागणी

रत्नागिरी : सध्या ग्रामपंचायतस्तरावर विलगीकरण कक्ष उभारण्यात येत आहे. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी विविध उपाययोजना राबविणा-या ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, कर्मचारी प्रयत्नशील आहेत. कोविडच्या अनुषंगाने त्यांना फ्रंटलाइन वर्कर्स घोषित करून विमा संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

संरक्षक भिंतींची मागणी

राजापूर : राजापूर-शीळ गोठणे, दोनिवडे, सौंदळ रस्त्याला धोका निर्माण झाला आहे. संरक्षक भिंत रस्त्यालगत घालून देण्याचे आश्वासन न पाळल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे शीळ पंचक्रोशी समितीतर्फे संरक्षक भिंत बांधण्याची मागणी करण्यात आली आहे. यासाठी निवेदनही देण्यात आले आहे.

लसीकरणाची मागणी

आरवली : कोंडिवरे येथील ग्रामस्थांसाठी लसीकरणाची व्यवस्था ग्रामपंचायत कार्यालयात करण्यात यावी, अशी मागणी ग्रामपंचायतीकडून होत आहे. माखजन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात सध्या प्रत्येक उपकेंद्रानुसार लसीकरण सुरू आहे. मात्र, वाहतुकीची सुविधा उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांची गैरसोय होत आहे.

प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन

रत्नागिरी : दहावी-बारावीच्या खेळाडूंना राखीव गुण मिळणार आहेत. त्यासाठी बोर्डाने शाळांना प्रस्ताव पाठविण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. २१ जूनपर्यंत जिल्हा क्रीडाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठविणे गरजेचे आहे. विभागीय मंडळाकडे २५ जूनपर्यंत क्रीडाधिका-यांनी प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन केले आहे.