शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना सुनावले खडेबोल  
2
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
3
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
4
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
5
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
6
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
7
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
8
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
9
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
10
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
11
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
12
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
13
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
14
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
15
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
16
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
17
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
18
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
19
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
20
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video

शालेय पोषण आहाराचा माल कालबाह्य का...

By admin | Updated: March 3, 2015 00:34 IST

ऐरणीवरचा प्रश्न : पोषण आहाराबाबत सतर्क असणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त

रत्नागिरी : विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शालेय पोषण आहाराच्या मालाच्या पॅकिंगवर उत्पादनाची व कालमर्यादेची तारीख नमूद करण्यात येत नसल्याने कालबाह्य मालाचा पुरवठा केला जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. निकृष्ट दर्जाच्या धान्याचा यापूर्वी अनेकदा पुरवठा करण्यात आल्याचे समोर येऊनही त्यात बदल झालेला नाही.गरीब असलेल्या अनेक विद्यार्थ्यांना दुपारचे जेवण मिळत नाही. विद्यार्थ्यांना दुपारचे सकस अन्न मिळावे, यासाठी शासनाने माध्यान्ह शालेय पोषण आहार सुरु केला. त्यासाठी सुरुवातीला विद्यार्थ्यांना दर्जेदार धान्य देण्यात येत होते. त्यामध्ये घोटाळा होत असल्याचे अनेक प्रकार उघडकीस आल्याने आता विद्यार्थ्यांना दुपारचे जेवण देण्यात येते. त्यामुळे बहुतांश विद्यार्थी दुपारचे जेवण शाळेतच करतात. शालेय पोषण आहाराच्या मालाचा ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये वेळेवर पुरवठा होत नसल्याची ओरड सुरु होती. शालेय पोषण आहाराबाबत मध्यंतरी अनेक तक्रारी वाढल्या होत्या. मात्र, त्याकडे पुरवठादाराकडून गांभीर्याने पाहिले जात नसल्याचीही ओरड सुरु आहे.दोन महिन्यांपूर्वी पुरवठादाराकडून काही प्राथमिक शाळांना तुरडाळ पुरवठा करण्यात आली होती. ती तुरडाळ शिजत नव्हती. ती डाळ आदल्या दिवशी पाण्यात भिजत घालावी लागत होती. त्यामुळे तुरडाळीच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. कीड लागलेले कडधान्य व हरभऱ्याचा पुरवठा करण्यात आला होता. शिक्षण समितीच्या सभेत तुरडाळ खराब असल्याचा आरोप करण्यात आला होता. पोषण आहाराबाबत नेहमीच ओरड करण्यात असते. या आहारासाठी पुरवठा करण्यात येणारा माल कालबाह्य असल्याची ओरड सुरु आहे. या मालावर मॅन्युफॅक्चर डेट आणि एक्सपायरी डेट असणे आवश्यक आहे. मात्र, पोषण आहाराच्या मालांच्या पाकिटावर या दोन्ही तारखांची कोठेही नोंद केलेली नसते. ही नोंद नसल्याने सदर माल निकृष्ट दर्जाचा पुरवठा करण्यात येत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. तसेच अशा प्रकारचा मालाचा वापर करणे शाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्यास धोकादायक ठरु शकते, याची दखल संबंधित यंत्रणांनी घेणे आवश्यक आहे. (शहर वार्ताहर)$$्निरत्नागिरी जिल्ह्यात विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहाराच्या मालाच्या पॅकिंगवर मुदत नमूद करण्यात येत नसल्याने हा पोषण आहार कालबाह्य झाला असल्याची शक्यता अनेक भागातून व्यक्त केली. दुपारचे अन्न सकस मिळावे, यासाठी प्रयत्न सुरू असताना अशा प्रकाराने विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची शंकाही अनेकांनी व्यक्त केली आहे.