शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
5
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
6
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
7
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
8
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
9
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
10
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
11
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
12
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
13
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
14
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
15
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
16
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
17
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
18
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
19
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
20
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य

संगमेश्वरालाही पावसाने झोपडल

By admin | Updated: March 3, 2015 22:19 IST

बागायतदार हवालदिल : आंबा, काजूवर मोठा परिणाम शक्य

मार्लेश्वर : संगमेश्वर तालुक्यात गेले दोन दिवस मुसळधार कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे आंबा व काजू पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे आंबा व काजू बागायतदार धास्तावला आहे. अवकाळी पावसामुळे आंबा व काजू पिकाचा मोहोर गळून पडला आहे. परिणामी बागायतदारांची चिंता वाढली आहे.तालुक्यात गेले अनेक दिवस उन्हाच्या तडाख्याने नागरिक हैराण झाले होते. त्यातच ढगाळ व मळभी वातावरण असल्याने पावसाची शक्यता होती. अखेर शनिवारी व रविवारी अवकाळी पावसाने आपले जोरदार आगमन करीत दाणादाण उडवून दिली. अचानक कोसळलेल्या पावसामुळे नागरिकांची एकच धांदल उडाली, तर प्रचंड उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना एक प्रकारचा दिलासा मिळाला.दुसरीकडे आंबा व काजू पिकाला पोषक वातावरण असल्याने आंबा व काजूला चांगला मोहोर धरला होता. मोहोरामुळे आंबा व काजूची कलमे अक्षरश: फुलून गेली होती. यावर्षी मोठ्या प्रमाणावर मोहोर धरल्याने तालुक्यातील आंबा व काजू बागायतदार यंदा चांगले उत्पन्न मिळेल या आशेने आनंदात होते. मात्र, गेले दोन दिवस झालेल्या मुसळधार अवकाळी पावसामुळे आंबा व काजू पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. पावसामुळे मोहोर गळून पडल्याने आंबा व काजू बागायतदार चिंताग्रस्त बनला आहे. अवकाळी पावसाने बागायतदारांच्या आशेवर जणू विरजण टाकले आहे. अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याने आंबा व काजू बागायतदारांचा पुरता अपेक्षाभंग झाला आहे.संगमेश्वर तालुक्यात गेले दोन दिवस मुसळधार कोसळलेल्या ्अवकाळी पावसामुळे शेतकरी, बागायतदारांचे नुकसान होत ्आहे. तालुक्यात गेले अनेक महिने हे वातावरण असून त्याबाबत शेतकऱ्यांनी वेळोवेळी कृषिअधिकाऱ्यांकडे संपर्क साधला होता. मात्र, आता अधिक लक्ष देण्याची गरज आहे.(वार्ताहर)काजू पिकाला पोषक वातावरण असल्यामुळे यावर्षी चांगला मोहोर आला होता. काजू पिकातून चांगले उत्पन्न मिळेल, अशी आशा होती. गेले दोन दिवस झालेल्या मुसळधार अवकाळी पावसामुळे काजू पिकाचा मोहोर संपूर्ण गळून पडला असून, काजू पिकाचे प्रचंड मोठे नुकसान झालेले आहे. बागायतदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ आली आहे.- अशोक अणेराव,आंगवली, काजू बागायतदार