शहरं
Join us  
Trending Stories
1
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
2
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
3
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
4
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
5
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
6
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
7
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
8
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
9
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
10
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
11
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
12
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
13
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
14
सोयाबीन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र
15
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
16
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले
17
“ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत, विजय मिळवणार”: छगन भुजबळ
18
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
19
“CM फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून भरीव पॅकेज घेऊनच यावे, अन्यथा तेथेच थांबावे”: सपकाळ
20
PPF, SSY आणि SCSS च्या व्याजदरांमध्ये वाढ होणार? कोट्यवधी अल्पबचतधारकांना उत्सुकता

१ तारखेला पगार होईना

By admin | Updated: December 5, 2015 00:24 IST

शिक्षकांमध्ये नाराजी : शासन निर्णयाला अजूनही हरताळच

आनंद त्रिपाठी -- वाटूळ--राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय शिक्षकांचे वेतन एक तारखेला जमा करावे असा शासन निर्णय होऊन तीन महिने उलटले. १ तारखेला पगार न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्याचे निर्देशही परिपत्रकामध्ये आहेत. परंतु, रत्नागिरी जिल्ह््यात शहरी भागातील काही शाळा सोडल्या तर अनेक शाळांमधील वेतन हे ५ किंवा ६ तारखेला होत असल्याने शासनाच्या परिपत्रकालाच हरताळ फासला जात आहे.शासनाकडून कोषागार कार्यालयाकडे वेळेत बिले सादर केली जात असून, १ तारखेलाच प्रत्येक विभागातील रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेमध्ये आॅनलाईन वेतनाची रक्कम गेले तीन महिने जमा होत आहे. परंतु, संबंधित शाळेतील शिक्षकांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होण्यास ५ ते ६ दिवसांचा कालावधी लागत असल्याने १ तारखेला जमा झालेली पगाराची रक्कम कर्मचाऱ्यांना ५ किंवा ६ तारखेला मिळत आहे. या विलंबाला केवळ जिल्हा मध्यवर्ती बँक हीच कारणीभूत असल्याने जिल्ह््यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांचे वेतन राष्ट्रीयकृत बँकेमार्फत व्हावे, अशी मागणी शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष रमेश जाधव यांनी केली आहे.शासनाने केवळ निर्णय घेतला मात्र त्याच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्षच केले जात असल्याने संताप व्यक्त होत आहे.वेतनाची रक्कम ही आॅनलाईन जमा होते. परंतु, प्रत्येक शाळेची पे बिले जिल्हा बँकेच्या प्रधान शाखेतून पोष्टाने संबंधित सर्व शाखांना पाठवली जात असल्याने ही पे बिले मिळेपर्यंत खात्यावरील जमा रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करता येत नसल्याने पगाराला विलंब होत आहेत. जर टपालाद्वारेच पे बिले पाठवली जात असतील तर मग आॅनलाईन प्रक्रियेचा उपयोग काय? असा सवाल शिक्षकवर्गातून केला जात आहे.जिल्हा बँक जबाबदार : पाच तारखेनंतरच वेतन१ तारखेला वेतनाची रक्कम जमा होऊनदेखील कर्मचाऱ्यांना ५ तारखेनंतरच वेतन मिळत आहे. हे वेतन विलंबाने मिळण्याला जिल्हा बँक जबाबदार आहे. यासाठी पे बिले जिल्हा बँकेच्या संबंधित शाखांमध्ये १ तारखेला कशी जमा होतील याबाबत नियोजन होणे आवश्यक आहे.- रमेश जाधव, जिल्हाध्यक्ष, शिक्षक परिषदगांभीर्यच नाहीरत्नागिरी जिल्ह्यातील शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न गेले कित्येक दिवस तसाच प्रलंबित आहे. मध्यंतरी तर हा प्रश्न खूपच गंभीर बनला होता. मात्र, त्याकडे अद्यापही गांभीर्याने पाहिले नसल्याचे दिसून येत आहे.जिल्हा बँकेमुळे शिक्षकांना वेतन मिळण्यास विलंब.राष्ट्रीयकृत बँकेमध्येच वेतन मिळावे, शिक्षक परिषदेने केली मागणी.