शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
2
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
3
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
4
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
5
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
6
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
7
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
8
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
9
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
10
शाम्पू, लोशन आणि बॉडी सोपमध्ये असतात कॅन्सर होणारे केमिकल्स; धडकी भरवणारा रिसर्च
11
जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी
12
'हा भारताचा स्पष्ट विजय', जगातील सर्वात प्रतिष्ठित संरक्षण तज्ज्ञाने पाकिस्तानला दाखवला आरसा
13
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं
14
Recruitment: भारतीय लष्करात भरती होण्याची संधी; नेमकं काम काय? कोण करू शकतं अप्लाय? कधी? आणि कसं?... इथे वाचा!
15
जुन्या भांडणावरुन बाप-लेकाचा चाकू अन् लोखंडी पाईपने खून, बदनापूरमधील धक्कादायक घटना
16
BJP District President: ६ विभागात ५८ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; भाजपानं दिली नव्या चेहऱ्यांना संधी, वाचा यादी
17
युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित
18
बाबा वेंगा यांची पाकिस्तानबाबत धक्कादायक भविष्यवाणी! ६ वर्षापूर्वी अभ्यासात उल्लेख होता
19
पाकिस्तानला काही सुधरेना! सिंधू जल करारावरून परराष्ट्र मंत्र्यांची दर्पोक्ती; म्हणे, तर युद्धविराम भंग होऊ शकतो!
20
Mumbai Metro 3: तुम्हाला माहित्येय का? सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनला आहेत एकूण 7 Entry-Exit मार्ग, जाणून घ्या...

वाशिष्ठी नदीपात्रातील गाळासंदर्भात जयंत पाटील यांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:38 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : वाशिष्ठी नदीपात्रातील गाळ उपसून नदीपात्र मोकळे करण्यासाठी जलसंपदा विभागाकडून तातडीने कार्यवाही व्हावी, यासाठी आमदार ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

चिपळूण : वाशिष्ठी नदीपात्रातील गाळ उपसून नदीपात्र मोकळे करण्यासाठी जलसंपदा विभागाकडून तातडीने कार्यवाही व्हावी, यासाठी आमदार शेखर निकम यांनी मुंबई येथे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची गुरुवारी भेट घेऊन चर्चा केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांसह लवकरच याविषयी बैठक घेऊन निर्णय घेऊ तसेच आपण स्वतः चिपळूणमध्ये येऊन पाहणी करू, असे आश्वासन पाटील यांनी दिले. चिपळूण पूरमुक्तीच्या दिशेने आमदार निकम यांनी टाकलेले हे महत्त्वपूर्ण पाऊल ठरले आहे.

२२ जुलै रोजी चिपळूणमध्ये महापूर आला आणि अख्खे चिपळूण उद्ध्वस्त झाले. त्याची विविध कारणे असली तरी वाशिष्ठी नदीपात्रात साचलेला भयंकर गाळ हे देखील एक प्रमुख कारण ठरले आहे. कोळकेवाडी ते चिपळूण शहर या दरम्यानचा नदीपात्रातील गाळ काढल्यास चिपळूण काही प्रमाणात पूरमुक्त होऊ शकतो. त्याचा पूर्ण अभ्यास आणि आराखडा तयार करून आमदार निकम यांनी थेट राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची गुरुवारी मुंबई येथे भेट घेतली. यावेळी त्यांच्याबरोबर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन कदम, अभियंता शहनवाज शहा, उद्योजक राम रेडीज उपस्थित होते.

गाळ काढण्यासंदर्भात यावेळी चर्चा करण्यात आली. कोळकेवाडीपासून चिपळूण शहरापर्यंत कसा आणि कोणत्या ठिकाणी नदीपात्र खोल करणे आवश्यक याबाबत संपूर्ण माहिती यावेळी देण्यात आली. तसेच त्यासाठी जलसंपदा विभागाच्या यांत्रिकी विभागाकडून अद्यावत यंत्रणा आवश्यक असून, ती उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावर पाटील यांनी सर्व माहिती घेत याबाबत लवकरच वरिष्ठ पातळीवर बैठक घेऊन निर्णय घेऊ तसेच चिपळूणमध्ये ५ किंवा ६ ऑगस्ट दरम्यान आयोजित महापूर परिषदेला आपण स्वतः उपस्थित राहणार आहे. त्यावेळी पाहणी करून पुढील कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन उपस्थितांना दिले आहे.