शहरं
Join us  
Trending Stories
1
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
2
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
3
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
4
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
5
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
6
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
7
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
8
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
10
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
11
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
12
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
13
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
14
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
15
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
16
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
17
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
18
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
19
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
20
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले

अर्जुना नदीत भराव टाकल्याने प्रवाह बदलण्याचा धाेका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:23 IST

राजापूर : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणामध्ये अर्जुना नदीवर उभारण्यात आलेल्या पुलाच्या बांधकामासाठी नदीपात्रामध्ये मातीचा मोठ्याप्रमाणात भराव टाकण्यात आला होता. त्यातून ...

राजापूर : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणामध्ये अर्जुना नदीवर उभारण्यात आलेल्या पुलाच्या बांधकामासाठी नदीपात्रामध्ये मातीचा मोठ्याप्रमाणात भराव टाकण्यात आला होता. त्यातून नदीच्या पाण्याचा प्रवाह बदलल्याने त्या परिसरामध्ये शीळ-गोठणेदोनिवडे-चिखलगाव रस्त्याला धोका निर्माण झाला आहे. मात्र, त्या ठिकाणी रिटेलिंग वॉल (संरक्षण भिंत) बांधण्याचे चौपदरीकरण करणाऱ्या ठेकेदार कंपनीने गतवर्षी दिलेले आश्‍वासन अद्यापही पूर्ण झालेले नाही.

गोठणेदोनिवडे पंचक्रोशीतील गावांना जोडण्यासाठी शीळ-गोठणेदोनिवडे-चिखलगाव-सौंदळ रस्ता महत्त्वाचा आहे़. हा रस्ता पुढे कोल्हापूर भागाला जोडला जात असल्याने घाटमाथ्यावरून येण्या-जाण्यासाठी ‘शॉर्टकट’ मार्ग म्हणून उपयुक्त ठरत आहे. मात्र, दरवर्षी पावसाळ्यामध्ये अर्जुना नदीला पूर येऊन नदीच्या वाढणाऱ्या पाण्याखाली हा रस्ता सातत्याने राहतो. त्यातून, पंचक्रोशीतील गावांचा पावसाळ्यामध्ये अनेकवेळा संपर्क तुटतो. शासकीय कामांसह वैद्यकीय उपचारांसाठी शहरामध्ये येणे मुश्किल होते. दरम्यान, मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणामध्ये अर्जुना नदीवर बांधण्यात येत असलेल्या पुलाच्या बांधकामासाठी नदीपात्रामध्ये मोठ्याप्रमाणात भराव टाकण्यात आला आहे. या भरावामुळे नदीच्या पाण्याचा प्रवाह बदलला असून, त्याचा फटका त्या परिसरातील या रस्त्याला बसला आहे.

दरम्यान, गतवर्षी पंचक्रोशी ग्रामविकास समितीने या रस्त्याच्या धोक्याकडे लक्ष वेधल्यानंतर त्याची लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि ठेकेदार कंपनीचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीमध्ये पाहणी झाली होती. या पाहणीवेळी पुलाच्या बांधकामाच्या परिसरामध्ये नदीच्या बाजूने रिटेलिंग वॉल वा संरक्षण भिंत बांधून देण्याचे पुलाचे बांधकाम करणाऱ्या ठेकेदार कंपनीने आश्‍वासित केले होते. यावर्षीच्या पावसाळ्यापूर्वी त्याचे बांधकाम होण्याचे अपेक्षित होते. मात्र, यावर्षीचा पावसाळा सुरू झाला तरी, अद्यापही त्या संरक्षण भिंतीचा पत्ता दिसत नाही. त्याबद्दल लोकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.