शहरं
Join us  
Trending Stories
1
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत देशाचे नेतृत्व करावे, आजवर असा नेता पाहिला नाही..." - मुकेश अंबानी
2
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
3
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
4
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
5
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
6
VIRAL : 'थार' घेऊन डिलिव्हरी बॉय पार्सल द्यायला आला, बघणारा प्रत्येकजण अवाक् झाला! व्हिडीओ होतोय व्हायरल
7
"बाप्पा तुम्ही खूप भाग्यवान, नांगरलं कुणी, पेरलं कुणी अन्..."; पंकजा मुंडेंचा खासदार बजरंग सोनवणेंना टोला
8
आमिर खानला नाही आवडली दादासाहेब फाळकेंवरील सिनेमाची स्क्रिप्ट, नक्की कारण काय?
9
ऑनलाइन मागवलेल्या बिर्याणीत झुरळ, घटनेने उडाली खळबळ; कुठे घडला 'हा' किळसवाणा प्रकार?
10
टाटा-इन्फोसिससह 'या' शेअर्समध्ये वाढ! सलग दुसऱ्या दिवशी सेन्सेक्स-निफ्टी वधारले, कुठे झाली घसरण?
11
World Athletics Championships 2025 : नीरज चोप्राची फायनलमध्ये धडक; इथंही IND vs PAK महामुकाबला?
12
२५,००० रुपयांच्या पगारात आलिशान कार अन् फ्लॅट शक्य आहे! तज्ज्ञांनी सांगितलं गुंतवणुकीचं सूत्र
13
याला म्हणतात नशीब! आदिवासी महिलेला सापडले ३ मौल्यवान हिरे; रातोरात झाली लखपती
14
GST कपाती नंतर मध्यमवर्गींना आणखी एक भेट मिळणार? ऑक्टोबरमध्ये RBI घेणार मोठा निर्णय
15
'या' कंपनीनं अचानक बंद केला आपला व्यवसाय, आता शेअर विकण्यासाठी रांगा; ₹१३१ वर आला भाव
16
एटापल्लीच्या जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांत जोरदार चकमक, दोन महिला माओवाद्यांना मारण्यात यश
17
पितृपक्ष २०२५ गुरुपुष्यामृत योग: लक्ष्मी-स्वामींची कायम कृपा, ५ गोष्टी करा, लाभ-पुण्य मिळवा!
18
टेस्लाने जे मॉडेल भारतात लाँच केले, त्याच्या काचा फोडून बाहेर पडतायत अमेरिकेतील लोक...
19
देशभरात तपासणी अन् औषधे मोफत; पीएम मोदींच्या हस्ते ‘स्वस्थ नारी योजने’चा शुभारंभ
20
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात मृत्यू येणे चांगले, पण अंत्यविधिला गेल्यावर स्मशानात काढू नका 'हे' शब्द

अर्जुना नदीत भराव टाकल्याने प्रवाह बदलण्याचा धाेका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:23 IST

राजापूर : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणामध्ये अर्जुना नदीवर उभारण्यात आलेल्या पुलाच्या बांधकामासाठी नदीपात्रामध्ये मातीचा मोठ्याप्रमाणात भराव टाकण्यात आला होता. त्यातून ...

राजापूर : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणामध्ये अर्जुना नदीवर उभारण्यात आलेल्या पुलाच्या बांधकामासाठी नदीपात्रामध्ये मातीचा मोठ्याप्रमाणात भराव टाकण्यात आला होता. त्यातून नदीच्या पाण्याचा प्रवाह बदलल्याने त्या परिसरामध्ये शीळ-गोठणेदोनिवडे-चिखलगाव रस्त्याला धोका निर्माण झाला आहे. मात्र, त्या ठिकाणी रिटेलिंग वॉल (संरक्षण भिंत) बांधण्याचे चौपदरीकरण करणाऱ्या ठेकेदार कंपनीने गतवर्षी दिलेले आश्‍वासन अद्यापही पूर्ण झालेले नाही.

गोठणेदोनिवडे पंचक्रोशीतील गावांना जोडण्यासाठी शीळ-गोठणेदोनिवडे-चिखलगाव-सौंदळ रस्ता महत्त्वाचा आहे़. हा रस्ता पुढे कोल्हापूर भागाला जोडला जात असल्याने घाटमाथ्यावरून येण्या-जाण्यासाठी ‘शॉर्टकट’ मार्ग म्हणून उपयुक्त ठरत आहे. मात्र, दरवर्षी पावसाळ्यामध्ये अर्जुना नदीला पूर येऊन नदीच्या वाढणाऱ्या पाण्याखाली हा रस्ता सातत्याने राहतो. त्यातून, पंचक्रोशीतील गावांचा पावसाळ्यामध्ये अनेकवेळा संपर्क तुटतो. शासकीय कामांसह वैद्यकीय उपचारांसाठी शहरामध्ये येणे मुश्किल होते. दरम्यान, मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणामध्ये अर्जुना नदीवर बांधण्यात येत असलेल्या पुलाच्या बांधकामासाठी नदीपात्रामध्ये मोठ्याप्रमाणात भराव टाकण्यात आला आहे. या भरावामुळे नदीच्या पाण्याचा प्रवाह बदलला असून, त्याचा फटका त्या परिसरातील या रस्त्याला बसला आहे.

दरम्यान, गतवर्षी पंचक्रोशी ग्रामविकास समितीने या रस्त्याच्या धोक्याकडे लक्ष वेधल्यानंतर त्याची लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि ठेकेदार कंपनीचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीमध्ये पाहणी झाली होती. या पाहणीवेळी पुलाच्या बांधकामाच्या परिसरामध्ये नदीच्या बाजूने रिटेलिंग वॉल वा संरक्षण भिंत बांधून देण्याचे पुलाचे बांधकाम करणाऱ्या ठेकेदार कंपनीने आश्‍वासित केले होते. यावर्षीच्या पावसाळ्यापूर्वी त्याचे बांधकाम होण्याचे अपेक्षित होते. मात्र, यावर्षीचा पावसाळा सुरू झाला तरी, अद्यापही त्या संरक्षण भिंतीचा पत्ता दिसत नाही. त्याबद्दल लोकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.