शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
5
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
6
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
7
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
8
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
9
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
10
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
11
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
12
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
13
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
14
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
15
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
16
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
17
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
18
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
19
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
20
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

अर्जुना नदीत भराव टाकल्याने प्रवाह बदलण्याचा धाेका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:23 IST

राजापूर : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणामध्ये अर्जुना नदीवर उभारण्यात आलेल्या पुलाच्या बांधकामासाठी नदीपात्रामध्ये मातीचा मोठ्याप्रमाणात भराव टाकण्यात आला होता. त्यातून ...

राजापूर : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणामध्ये अर्जुना नदीवर उभारण्यात आलेल्या पुलाच्या बांधकामासाठी नदीपात्रामध्ये मातीचा मोठ्याप्रमाणात भराव टाकण्यात आला होता. त्यातून नदीच्या पाण्याचा प्रवाह बदलल्याने त्या परिसरामध्ये शीळ-गोठणेदोनिवडे-चिखलगाव रस्त्याला धोका निर्माण झाला आहे. मात्र, त्या ठिकाणी रिटेलिंग वॉल (संरक्षण भिंत) बांधण्याचे चौपदरीकरण करणाऱ्या ठेकेदार कंपनीने गतवर्षी दिलेले आश्‍वासन अद्यापही पूर्ण झालेले नाही.

गोठणेदोनिवडे पंचक्रोशीतील गावांना जोडण्यासाठी शीळ-गोठणेदोनिवडे-चिखलगाव-सौंदळ रस्ता महत्त्वाचा आहे़. हा रस्ता पुढे कोल्हापूर भागाला जोडला जात असल्याने घाटमाथ्यावरून येण्या-जाण्यासाठी ‘शॉर्टकट’ मार्ग म्हणून उपयुक्त ठरत आहे. मात्र, दरवर्षी पावसाळ्यामध्ये अर्जुना नदीला पूर येऊन नदीच्या वाढणाऱ्या पाण्याखाली हा रस्ता सातत्याने राहतो. त्यातून, पंचक्रोशीतील गावांचा पावसाळ्यामध्ये अनेकवेळा संपर्क तुटतो. शासकीय कामांसह वैद्यकीय उपचारांसाठी शहरामध्ये येणे मुश्किल होते. दरम्यान, मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणामध्ये अर्जुना नदीवर बांधण्यात येत असलेल्या पुलाच्या बांधकामासाठी नदीपात्रामध्ये मोठ्याप्रमाणात भराव टाकण्यात आला आहे. या भरावामुळे नदीच्या पाण्याचा प्रवाह बदलला असून, त्याचा फटका त्या परिसरातील या रस्त्याला बसला आहे.

दरम्यान, गतवर्षी पंचक्रोशी ग्रामविकास समितीने या रस्त्याच्या धोक्याकडे लक्ष वेधल्यानंतर त्याची लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि ठेकेदार कंपनीचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीमध्ये पाहणी झाली होती. या पाहणीवेळी पुलाच्या बांधकामाच्या परिसरामध्ये नदीच्या बाजूने रिटेलिंग वॉल वा संरक्षण भिंत बांधून देण्याचे पुलाचे बांधकाम करणाऱ्या ठेकेदार कंपनीने आश्‍वासित केले होते. यावर्षीच्या पावसाळ्यापूर्वी त्याचे बांधकाम होण्याचे अपेक्षित होते. मात्र, यावर्षीचा पावसाळा सुरू झाला तरी, अद्यापही त्या संरक्षण भिंतीचा पत्ता दिसत नाही. त्याबद्दल लोकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.