शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी निवृत्तीवेतनापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:37 IST

राजापूर : महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागातून सेवानिवृत्त झालेल्या जिल्ह्यातील सेवानिवृत्तधारकांना गेल्या आठ महिन्यांपासून निवृत्तीवेतनच मिळालेले नाही. ...

राजापूर : महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागातून सेवानिवृत्त झालेल्या जिल्ह्यातील सेवानिवृत्तधारकांना गेल्या आठ महिन्यांपासून निवृत्तीवेतनच मिळालेले नाही. त्यामुळे ऐन वार्धक्याच्या कालखंडात त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेकडून जाणीवपूर्वक ज्येष्ठ नागरिकांना निवृत्तीवेतनासाठी वेठीस धरण्यात येत असल्याचा आरोप सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी केला आहे.

महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागात अठ्ठावीस ते बत्तीस वर्षे सेवा करून निवृत्त झाले आहेत. हे कर्मचारी सध्या सेवानिवृत्तीचे जीवन जगत आहेत. यातील अनेकांनी आता वयाची ६५ वर्षे पूर्ण केली आहेत. अशा वृद्धापकाळात आजारपण आणि जीवन जगण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. या काळात त्यांच्यासाठी निवृत्तीवेतन आधार बनलेला असताे. वृद्धापकाळात औषधांसाठी निवृत्तीवेतन उपयाेगी ठरते. पण, सध्या निवृत्तीवेतनच मिळत नसल्याने जगायचे कसे, असा प्रश्न त्यांच्यासमाेर पडलेला आहे. रत्नागिरी जिल्हा परिषद सेवानिवृत्तीवेतनाबाबत संवेदनशील नसल्याचे सेवानिवृत्तांचे म्हणणे आहे.

रखडलेल्या सेवानिवृत्त वेतनाबाबत रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून थातूरमातूर उत्तरे देऊन बोळवण केली जात असल्याचे सेवानिवृत्तधारकांचे म्हणणे आहे. सध्या वृद्धापकाळामुळे शासनदरबारी फेऱ्या मारणे, ही प्रकृतीच्या कारणास्तव शक्य नाही. त्यामुळे सेवानिवृत्तांची निवृत्तवेतनासाठीची ससेहोलपट थांबवावी, अशी मागणी करण्यात येत आहे.