शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
5
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
6
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
7
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
8
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
9
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
10
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
11
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
12
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
13
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
14
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
15
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
16
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
17
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
18
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
19
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
20
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी

ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी निवृत्तीवेतनापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:37 IST

राजापूर : महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागातून सेवानिवृत्त झालेल्या जिल्ह्यातील सेवानिवृत्तधारकांना गेल्या आठ महिन्यांपासून निवृत्तीवेतनच मिळालेले नाही. ...

राजापूर : महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागातून सेवानिवृत्त झालेल्या जिल्ह्यातील सेवानिवृत्तधारकांना गेल्या आठ महिन्यांपासून निवृत्तीवेतनच मिळालेले नाही. त्यामुळे ऐन वार्धक्याच्या कालखंडात त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेकडून जाणीवपूर्वक ज्येष्ठ नागरिकांना निवृत्तीवेतनासाठी वेठीस धरण्यात येत असल्याचा आरोप सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी केला आहे.

महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागात अठ्ठावीस ते बत्तीस वर्षे सेवा करून निवृत्त झाले आहेत. हे कर्मचारी सध्या सेवानिवृत्तीचे जीवन जगत आहेत. यातील अनेकांनी आता वयाची ६५ वर्षे पूर्ण केली आहेत. अशा वृद्धापकाळात आजारपण आणि जीवन जगण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. या काळात त्यांच्यासाठी निवृत्तीवेतन आधार बनलेला असताे. वृद्धापकाळात औषधांसाठी निवृत्तीवेतन उपयाेगी ठरते. पण, सध्या निवृत्तीवेतनच मिळत नसल्याने जगायचे कसे, असा प्रश्न त्यांच्यासमाेर पडलेला आहे. रत्नागिरी जिल्हा परिषद सेवानिवृत्तीवेतनाबाबत संवेदनशील नसल्याचे सेवानिवृत्तांचे म्हणणे आहे.

रखडलेल्या सेवानिवृत्त वेतनाबाबत रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून थातूरमातूर उत्तरे देऊन बोळवण केली जात असल्याचे सेवानिवृत्तधारकांचे म्हणणे आहे. सध्या वृद्धापकाळामुळे शासनदरबारी फेऱ्या मारणे, ही प्रकृतीच्या कारणास्तव शक्य नाही. त्यामुळे सेवानिवृत्तांची निवृत्तवेतनासाठीची ससेहोलपट थांबवावी, अशी मागणी करण्यात येत आहे.