शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
3
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
4
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
5
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
6
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
7
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
8
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
9
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
10
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
11
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
12
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
13
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
14
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
15
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
16
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
17
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
18
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
19
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
20
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?

ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी निवृत्तीवेतनापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:37 IST

राजापूर : महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागातून सेवानिवृत्त झालेल्या जिल्ह्यातील सेवानिवृत्तधारकांना गेल्या आठ महिन्यांपासून निवृत्तीवेतनच मिळालेले नाही. ...

राजापूर : महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागातून सेवानिवृत्त झालेल्या जिल्ह्यातील सेवानिवृत्तधारकांना गेल्या आठ महिन्यांपासून निवृत्तीवेतनच मिळालेले नाही. त्यामुळे ऐन वार्धक्याच्या कालखंडात त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेकडून जाणीवपूर्वक ज्येष्ठ नागरिकांना निवृत्तीवेतनासाठी वेठीस धरण्यात येत असल्याचा आरोप सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी केला आहे.

महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागात अठ्ठावीस ते बत्तीस वर्षे सेवा करून निवृत्त झाले आहेत. हे कर्मचारी सध्या सेवानिवृत्तीचे जीवन जगत आहेत. यातील अनेकांनी आता वयाची ६५ वर्षे पूर्ण केली आहेत. अशा वृद्धापकाळात आजारपण आणि जीवन जगण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. या काळात त्यांच्यासाठी निवृत्तीवेतन आधार बनलेला असताे. वृद्धापकाळात औषधांसाठी निवृत्तीवेतन उपयाेगी ठरते. पण, सध्या निवृत्तीवेतनच मिळत नसल्याने जगायचे कसे, असा प्रश्न त्यांच्यासमाेर पडलेला आहे. रत्नागिरी जिल्हा परिषद सेवानिवृत्तीवेतनाबाबत संवेदनशील नसल्याचे सेवानिवृत्तांचे म्हणणे आहे.

रखडलेल्या सेवानिवृत्त वेतनाबाबत रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून थातूरमातूर उत्तरे देऊन बोळवण केली जात असल्याचे सेवानिवृत्तधारकांचे म्हणणे आहे. सध्या वृद्धापकाळामुळे शासनदरबारी फेऱ्या मारणे, ही प्रकृतीच्या कारणास्तव शक्य नाही. त्यामुळे सेवानिवृत्तांची निवृत्तवेतनासाठीची ससेहोलपट थांबवावी, अशी मागणी करण्यात येत आहे.