शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
2
फडणवीसांबद्दल अपशब्द वापरल्यास जीभ हासडून हातात देऊ; मंत्री नितेश राणेंचा मनोज जरांगेंना इशारा
3
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
4
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
5
Shakib Al Hasan World Record : ५०० विकेट्स अन् ७००० धावा! पठ्ठ्यानं वर्ल्ड रेकॉर्डसह केली हवा
6
वडील सोडून गेले, चारित्र्यावर झाली चिखलफेक, जीवे मारण्याच्या धमक्या; अभिनेत्रीने केला संघर्ष
7
Hartalika Teeja 2025: हरितालिका व्रत केल्याने केवळ सौभाग्य नाही, तर 'हे'देखील लाभ होतात!
8
TCS-इन्फोसिस ठरले हिरो! आयटी शेअर्समुळे बाजारात तेजी; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; पण, 'या' क्षेत्रात दबाव
9
Mumbai Crime: मरीन ड्राईव्हच्या समुद्रात आढळला तरुणीचा मृतदेह; चेहऱ्यावर जखमा
10
"तीच लोक डोक्यावर पाय देऊन गद्दारांच्या टोळीत सामील झाले"; मनसे नेते राजू पाटलांना संताप अनावर
11
५ वर्षात १ लाख रुपयांचे झाले १९ लाख! डिफेन्स शेअरची जोरदार उसळी, ६ महिन्यांत १००% परतावा!
12
स्मशानभूमीला पाणीपट्टीचे बिल पाठवले, १० टक्के सवलतही दिली; महापालिकेचा अजब पराक्रम!
13
जगदीप धनखड नजरकैदेत? अमित शाहांच्या उत्तरावर जयराम रमेश यांची टीका; म्हणाले- 'रहस्य...'
14
'माय फ्रेंड गणेशा' मधला छोटासा मुलगा आता आहे प्रसिद्ध अभिनेत्री, पाहा कशी दिसते? (Photos)
15
Jio IPO ची प्रतीक्षा आता संपणार! शुक्रवारी मुकेश अंबानी देणार सरप्राईज?
16
व्हिएतनाममधील ५.८ लाख लोकांना आपली घरं सोडावी लागणार! नेमकं कारण तरी काय?
17
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
18
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
19
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
20
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती

ग्रामीण भागातील जलस्रोत संकटात

By admin | Updated: April 11, 2016 00:55 IST

खेड तालुका : पाणीटंचाईची दाहकता अधिक; आजही ३२ गावांमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष्य

श्रीकांत चाळके --खेड तालुक्यातील खेड्यापाड्यात आजही पाण्याची चणचण मोठ्या प्रमाणात भासते़ विविध जलस्रोत उपलब्ध असतानाही निम्म्याहून अधिक जलस्रोत पूर्णपणे गाळात रूतले आहेत़ याकडे लक्ष देण्यास प्रशासनासह लोकप्रतिनिधींकडेही वेळ नसल्याने सारे जलस्रोतच संकटात आले आहेत. तालुक्यातील ग्रामीण भागात आणि विशेषत: धनगरवाड्यांमध्ये आजही पाणी दुष्काळाचा सामना करावा लागत आहे़खेड तालुक्यातील ३२ गावांमध्ये आजही पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवते. डोंगरदऱ्यांमध्ये वसलेल्या गावांमध्ये तर ही समस्या अधिकच जटील झाली आहे़ तालुक्यात नदी, ओढे, नाले यासारखे नैसर्गिक जलस्रोत उपलब्ध आहेत़ यातील बरेच जलस्रोत हे गाळांनी भरले आहेत. प्रशासनासह लोकप्रतिनिधिंनीही या जलस्रोतांकडे दुर्लक्ष्य केल्यामुळे ते विकसित झालेले नाहीत़ पाणीटंचाई असलेल्या गावांमध्ये व वाड्यांमध्ये नळ पाणीपुरवठा योजना आणि विहिरींच्या कामासाठी निधी उपलब्ध करून देण्याकडेच लोकप्रतिनिधींचा जास्त कल आहे. जुन्या योजना दुरूस्त करुन वेळ मारून न्यायचे काम प्रशासन व लोकप्रतिनिधी करत आहेत. शासनाकडून तालुक्यात ठिकठिकाणी बंधारे बांधण्यात आले आहेत़ मात्र, या बंधाऱ्यांमध्येही पाण्याचा खडखडाटच आहे. या बंधाऱ्यांचा समावेश टंचाईग्रस्त गावांमध्ये करण्यात आला असल्याने या गावांनाही पाणीपुरवठा करावा लागणार आहे. गेल्या १५ वर्षात इथल्या लोकप्रतिनिधींनी नैसर्गिक जलस्रोत विकसित करण्यासाठी कोणतेही प्रयत्न केलेले नाहीत़ खेड तालुक्यातील जगबुडी नदींसह इतर छोट्या, मोठ्या नद्यांकडेही दुर्लक्षच झाल्याचे दिसून येत आहे़ पाणीटंंचाई काळात जगबुडी नदीवरच मोठा भार पडत आहे़ खेड शहराला पाणीपुरवठा करणारे बोरज धरण आजही आपल्या अस्तित्वासाठी धडपडत आहे़ या धरणात मोठ्या प्रमाणावर गाळ साचला आहे़ हा गाळ काढण्याचा प्रयत्न खेड नगरपालिकेकडून होत आहे़ मात्र, लोकप्रतिनिधींची उदासिनता आणि अपुऱ्या निधीमुळे बोरज धरण अधिकाधिक गाळात रूतत चालले आहे. मागील काही महिन्यांपासून या धरणातील गाळ मोठ्या प्रमाणावर काढण्यात आला आहे़ मात्र, तरीही पुरेसा पाणीसाठा नसल्याने प्रतिवर्षी खेड शहराची तहान पिंपळवाडी धरण भागवित आहे़ याच धरणातून १ एप्रिलपासून खेड शहराला पाणीपुरवठा होत आहे. जगबुडी नदीचा सुकिवलीमध्ये शिरवली धरण व नातूवाडी धरणाच्या पाण्याशी संगम झाला आहे़ या तीन जलस्रोतांचे पाणी खेड शहराला देखील पुरविले जात आहे़ तर उर्वरित पाणी हे खाडीला मिळत असल्याने खाडीपट्टा भागातील जनतेला मार्च महिन्यापासून तात्पुरत्या नैसर्गिक जलस्रोतांंवरच अवलंबून राहावे लागते. तसेच या भागातील जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी टँकरद्वारे उपलब्ध होणाऱ्या पाण्यावर विसंबून राहावे लागत आहे़ नैसर्गिक जलस्रोतांचा विचार करून त्यावर उपाययोजना न केल्याने पाण्याचे संकट दिवसेंदिवस वाढत चालले आहे. या जलस्रोतांचे जतन केल्यास निश्चितच पाणीटंचाई कमी होण्यास मदत होऊ शकते.पाणी खाडीला : जलस्रोतांवर बागायतीतालुक्यातील बहुतांश नद्यांचे पाणी पूर्व पश्चिम उतारामुळे खाडीला मिळते़ यातूनच पारंपरिक जलस्रोतांना पाणी मिळते़ या जलस्रोतांच्या आधारेच गावांमध्ये शेती तसेच बागायती केली जाते़ शेती व बागायतीसाठी या पाण्याचा मोठ्या प्रमाणावर उपसा होत असल्याने या नैसर्गिक जलस्रोतांमधील पाणी हे मार्च महिन्यातच संपुष्टात येत असल्याचे दिसत आहे.नैसर्गिक स्रोतांचे झरे लुप्त...या भागातील प्रदूषणामुळे नैसर्गिक स्रोतांंचे झरे लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत़ नैसर्गिक स्रोत असलेली ठिकाणे वाचविण्यासाठी ग्रामपातळीवर व शासकीय पातळीवर जनजागृती करण्याची गरज आहे.