शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागातील जलस्रोत संकटात

By admin | Updated: April 11, 2016 00:55 IST

खेड तालुका : पाणीटंचाईची दाहकता अधिक; आजही ३२ गावांमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष्य

श्रीकांत चाळके --खेड तालुक्यातील खेड्यापाड्यात आजही पाण्याची चणचण मोठ्या प्रमाणात भासते़ विविध जलस्रोत उपलब्ध असतानाही निम्म्याहून अधिक जलस्रोत पूर्णपणे गाळात रूतले आहेत़ याकडे लक्ष देण्यास प्रशासनासह लोकप्रतिनिधींकडेही वेळ नसल्याने सारे जलस्रोतच संकटात आले आहेत. तालुक्यातील ग्रामीण भागात आणि विशेषत: धनगरवाड्यांमध्ये आजही पाणी दुष्काळाचा सामना करावा लागत आहे़खेड तालुक्यातील ३२ गावांमध्ये आजही पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवते. डोंगरदऱ्यांमध्ये वसलेल्या गावांमध्ये तर ही समस्या अधिकच जटील झाली आहे़ तालुक्यात नदी, ओढे, नाले यासारखे नैसर्गिक जलस्रोत उपलब्ध आहेत़ यातील बरेच जलस्रोत हे गाळांनी भरले आहेत. प्रशासनासह लोकप्रतिनिधिंनीही या जलस्रोतांकडे दुर्लक्ष्य केल्यामुळे ते विकसित झालेले नाहीत़ पाणीटंचाई असलेल्या गावांमध्ये व वाड्यांमध्ये नळ पाणीपुरवठा योजना आणि विहिरींच्या कामासाठी निधी उपलब्ध करून देण्याकडेच लोकप्रतिनिधींचा जास्त कल आहे. जुन्या योजना दुरूस्त करुन वेळ मारून न्यायचे काम प्रशासन व लोकप्रतिनिधी करत आहेत. शासनाकडून तालुक्यात ठिकठिकाणी बंधारे बांधण्यात आले आहेत़ मात्र, या बंधाऱ्यांमध्येही पाण्याचा खडखडाटच आहे. या बंधाऱ्यांचा समावेश टंचाईग्रस्त गावांमध्ये करण्यात आला असल्याने या गावांनाही पाणीपुरवठा करावा लागणार आहे. गेल्या १५ वर्षात इथल्या लोकप्रतिनिधींनी नैसर्गिक जलस्रोत विकसित करण्यासाठी कोणतेही प्रयत्न केलेले नाहीत़ खेड तालुक्यातील जगबुडी नदींसह इतर छोट्या, मोठ्या नद्यांकडेही दुर्लक्षच झाल्याचे दिसून येत आहे़ पाणीटंंचाई काळात जगबुडी नदीवरच मोठा भार पडत आहे़ खेड शहराला पाणीपुरवठा करणारे बोरज धरण आजही आपल्या अस्तित्वासाठी धडपडत आहे़ या धरणात मोठ्या प्रमाणावर गाळ साचला आहे़ हा गाळ काढण्याचा प्रयत्न खेड नगरपालिकेकडून होत आहे़ मात्र, लोकप्रतिनिधींची उदासिनता आणि अपुऱ्या निधीमुळे बोरज धरण अधिकाधिक गाळात रूतत चालले आहे. मागील काही महिन्यांपासून या धरणातील गाळ मोठ्या प्रमाणावर काढण्यात आला आहे़ मात्र, तरीही पुरेसा पाणीसाठा नसल्याने प्रतिवर्षी खेड शहराची तहान पिंपळवाडी धरण भागवित आहे़ याच धरणातून १ एप्रिलपासून खेड शहराला पाणीपुरवठा होत आहे. जगबुडी नदीचा सुकिवलीमध्ये शिरवली धरण व नातूवाडी धरणाच्या पाण्याशी संगम झाला आहे़ या तीन जलस्रोतांचे पाणी खेड शहराला देखील पुरविले जात आहे़ तर उर्वरित पाणी हे खाडीला मिळत असल्याने खाडीपट्टा भागातील जनतेला मार्च महिन्यापासून तात्पुरत्या नैसर्गिक जलस्रोतांंवरच अवलंबून राहावे लागते. तसेच या भागातील जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी टँकरद्वारे उपलब्ध होणाऱ्या पाण्यावर विसंबून राहावे लागत आहे़ नैसर्गिक जलस्रोतांचा विचार करून त्यावर उपाययोजना न केल्याने पाण्याचे संकट दिवसेंदिवस वाढत चालले आहे. या जलस्रोतांचे जतन केल्यास निश्चितच पाणीटंचाई कमी होण्यास मदत होऊ शकते.पाणी खाडीला : जलस्रोतांवर बागायतीतालुक्यातील बहुतांश नद्यांचे पाणी पूर्व पश्चिम उतारामुळे खाडीला मिळते़ यातूनच पारंपरिक जलस्रोतांना पाणी मिळते़ या जलस्रोतांच्या आधारेच गावांमध्ये शेती तसेच बागायती केली जाते़ शेती व बागायतीसाठी या पाण्याचा मोठ्या प्रमाणावर उपसा होत असल्याने या नैसर्गिक जलस्रोतांमधील पाणी हे मार्च महिन्यातच संपुष्टात येत असल्याचे दिसत आहे.नैसर्गिक स्रोतांचे झरे लुप्त...या भागातील प्रदूषणामुळे नैसर्गिक स्रोतांंचे झरे लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत़ नैसर्गिक स्रोत असलेली ठिकाणे वाचविण्यासाठी ग्रामपातळीवर व शासकीय पातळीवर जनजागृती करण्याची गरज आहे.