शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

केवळ सामान्यांना नियम?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:21 IST

रत्नागिरी जिल्ह्याची लोकसंख्या २०११ सालच्या जनगणनेनुसार १६ लाख १५ हजार इतकी आहे. मात्र, या लोकसंख्येच्या तुलनेने जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ...

रत्नागिरी जिल्ह्याची लोकसंख्या २०११ सालच्या जनगणनेनुसार १६ लाख १५ हजार इतकी आहे. मात्र, या लोकसंख्येच्या तुलनेने जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या जवळपास ५० हजारांपर्यंत पोहोचली आहे. एखादा दिवस वगळता दर दिवशीच ५०० पेक्षा अधिक नागरिक कोरोनाबाधित होऊ लागले आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणा हे सर्व निस्तरताना मेटाकुटीस येत आहे. सारी उपाययोजना करूनही काहीच उपयोग होत नसल्याने आता जिल्हा प्रशासनासमोर मोठाच पेच निर्माण झाला आहे. काही गावांनी स्वत:हूनच आता निर्बंध घालून घेतले आहेत.

कोरोनाची तिसरी लाट जिल्ह्याच्या उंबरठ्यावर उभी आहे. नागरिकांसाठी आता अनेक निर्बंध घातले जात आहेत. ते मोडणाऱ्यांना दंड केला जात आहे. मास्क, सोशल डिस्टन्सिंग, संचारबंदी, जमावबंदी हे नियम केवळ नागरिकांसाठी अमलात आणले जात आहेत. मात्र, कोरोनाला हरवायचे आहे, तर मग ही नियमावली केवळ नागरिकांसाठीच का, लोकप्रतिनिधी त्याचे पालन का करीत नाहीत?

सद्य:स्थिती पाहता, काेरोनाचा विस्फोट जिल्हाभर झाला आहे. त्यामुळे प्रत्येक घटकानेच आता कोरोनाच्या अनुषंगाने खबरदारी घेतली नाही, तर दुसऱ्या लाटेसोबतच हातात हात घालून तिसरी लाट जिल्ह्यात कधी शिरकाव करेल, हे सांगता येत नाही. त्यामुळे आज नागरिकांनी खबरदारी घेतानाच याची खबरदारी सर्व लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार, मंत्री यांनीही घ्यायलाच हवी. नागरिकांना संचारबंदी करताना राजकीय कार्यक्रम कोरोनाच्या नियमांना हरताळ फासून राजरोस होत आहेत. विनामास्क, सोशल डिस्टन्सिंगचा बोजवारा कशा प्रकारे उडालेला असतो, हे तर सांगायलाच नको. सध्या कोरोनाकाळात सर्वच ऑनलाइन सुरू आहे, असे असताना मग यांचेच कार्यक्रम, उद्घाटने, बैठका ऑनलाइन न घेता प्रत्यक्षच घेण्याचा अट्टहास कशासाठी?

सध्या जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढतोय, याचे हेही एक कारण आहे, याचा विचार या मंडळींनी करायला हवा. खरोखर जिल्ह्यातून कोरोनाला हद्दपार करून तिसऱ्या लाटेला थोपविण्याची प्रामाणिक इच्छा आणि तळमळ असेल, तर सगळे कार्यक्रम, दाैरे, बैठका थांबवून त्या ऑनलाइन कराव्यात; अन्यथा जिल्हा कोरोनामुक्त होण्याऐवजी कोरोनामय होण्याचा धोका अधिक आहे. निदान आता उशिरा तरी हे शहाणपण राजकीय व्यक्तींना, लोकप्रतिनिधी म्हणविणाऱ्यांना सुचेल, अशी आशा करूया.