शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'
2
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
3
कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ होणार! पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी सरकारचा मास्टरप्लॅन
4
Axar Patel: विराट कोहली, ख्रिस गेलनंतर फक्त अक्षर पटेलच करू शकला 'अशी' कामगिरी!
5
Wife सोबत मिळून Post Office च्या या स्कीममध्ये ₹४ लाख जमा करा, पाहा महिन्याला किती मिळेल व्याज?
6
अजित पवारांचा घूमजाव, आधी म्हणाले कल्पना होती, आता म्हणतात, "पार्थच्या जमीन व्यवहाराची माहिती नाही"
7
‘तू बघत राहा, मी खोलीत गुदमरून मरेन’, पत्नीला  मेसेज पाठवून पतीने दरवाजा केला बंद, त्यानंतर...
8
महामार्गांवरून भटक्या कुत्र्यांना हटवा, त्यांचे लसीकरण आणि नसबंदी करून...; सर्वोच्च न्यायालयाचे तीन आदेश
9
Larissa Nery : "मी राहुल गांधींना ओळखत नाही, भारतात..."; ब्राझिलियन महिलेला वाटली भीती, केला मोठा खुलासा
10
दुकानातून हळूहळू कमी होत होता दारूचा स्टॉक; कपल करत होतं भरलेल्या बाटल्यांची चोरी! कसं पकडलं?
11
२५ लाख ते ६० लाख... गृहकर्जावर महिन्याचा खर्च किती? तुमचा EMI कमी करण्यासाठी 'हा' कालावधी निवडा
12
मारुतीने व्हिक्टोरिस लाँच केली अन् या कारवर बंपर सूट दिली; ऑक्टोबरपेक्षा आणखी ५४,००० रुपयांनी स्वस्त केली...
13
पहिल्याच दिवशी जमिनीवर आला 'हा' आयपीओ; गुंतवणूकदारांना मोठं नुकसान, GMP नं केला 'विश्वासघात'
14
Jasprit Bumrah Record : बुमराहचा मोठा पराक्रम! पाकिस्तानी गोलंदाजाला धोबीपछाड देत बनला 'नंबर वन'
15
Astro Tips: काही जातकांच्या पत्रिकेत विवाह योगच नसतो; त्यांनी कोणता उपाय करावा? पाहू 
16
२०२६ हे पाकिस्तानसाठी 'प्रलयाचे वर्ष'? ज्योतिषांचा धक्कादायक अंदाज; भारतासोबत मोठ्या युद्धाचे संकेत...
17
शनिवारी संकष्ट चतुर्थी, ३ राशींना साडेसाती; ‘हे’ ५ उपाय नक्की करा, शनिदोषातून मुक्तता मिळवा!
18
Video - बॅकबेंचर ते चार्टर्ड अकाउंटंट... लेक CA होताच बापाने मारली घट्ट मिठी, डोळ्यांत आनंदाश्रू
19
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
20
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल

केवळ सामान्यांना नियम?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:21 IST

रत्नागिरी जिल्ह्याची लोकसंख्या २०११ सालच्या जनगणनेनुसार १६ लाख १५ हजार इतकी आहे. मात्र, या लोकसंख्येच्या तुलनेने जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ...

रत्नागिरी जिल्ह्याची लोकसंख्या २०११ सालच्या जनगणनेनुसार १६ लाख १५ हजार इतकी आहे. मात्र, या लोकसंख्येच्या तुलनेने जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या जवळपास ५० हजारांपर्यंत पोहोचली आहे. एखादा दिवस वगळता दर दिवशीच ५०० पेक्षा अधिक नागरिक कोरोनाबाधित होऊ लागले आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणा हे सर्व निस्तरताना मेटाकुटीस येत आहे. सारी उपाययोजना करूनही काहीच उपयोग होत नसल्याने आता जिल्हा प्रशासनासमोर मोठाच पेच निर्माण झाला आहे. काही गावांनी स्वत:हूनच आता निर्बंध घालून घेतले आहेत.

कोरोनाची तिसरी लाट जिल्ह्याच्या उंबरठ्यावर उभी आहे. नागरिकांसाठी आता अनेक निर्बंध घातले जात आहेत. ते मोडणाऱ्यांना दंड केला जात आहे. मास्क, सोशल डिस्टन्सिंग, संचारबंदी, जमावबंदी हे नियम केवळ नागरिकांसाठी अमलात आणले जात आहेत. मात्र, कोरोनाला हरवायचे आहे, तर मग ही नियमावली केवळ नागरिकांसाठीच का, लोकप्रतिनिधी त्याचे पालन का करीत नाहीत?

सद्य:स्थिती पाहता, काेरोनाचा विस्फोट जिल्हाभर झाला आहे. त्यामुळे प्रत्येक घटकानेच आता कोरोनाच्या अनुषंगाने खबरदारी घेतली नाही, तर दुसऱ्या लाटेसोबतच हातात हात घालून तिसरी लाट जिल्ह्यात कधी शिरकाव करेल, हे सांगता येत नाही. त्यामुळे आज नागरिकांनी खबरदारी घेतानाच याची खबरदारी सर्व लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार, मंत्री यांनीही घ्यायलाच हवी. नागरिकांना संचारबंदी करताना राजकीय कार्यक्रम कोरोनाच्या नियमांना हरताळ फासून राजरोस होत आहेत. विनामास्क, सोशल डिस्टन्सिंगचा बोजवारा कशा प्रकारे उडालेला असतो, हे तर सांगायलाच नको. सध्या कोरोनाकाळात सर्वच ऑनलाइन सुरू आहे, असे असताना मग यांचेच कार्यक्रम, उद्घाटने, बैठका ऑनलाइन न घेता प्रत्यक्षच घेण्याचा अट्टहास कशासाठी?

सध्या जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढतोय, याचे हेही एक कारण आहे, याचा विचार या मंडळींनी करायला हवा. खरोखर जिल्ह्यातून कोरोनाला हद्दपार करून तिसऱ्या लाटेला थोपविण्याची प्रामाणिक इच्छा आणि तळमळ असेल, तर सगळे कार्यक्रम, दाैरे, बैठका थांबवून त्या ऑनलाइन कराव्यात; अन्यथा जिल्हा कोरोनामुक्त होण्याऐवजी कोरोनामय होण्याचा धोका अधिक आहे. निदान आता उशिरा तरी हे शहाणपण राजकीय व्यक्तींना, लोकप्रतिनिधी म्हणविणाऱ्यांना सुचेल, अशी आशा करूया.