शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

वडाने केली ४७ लाखांची हानी

By admin | Updated: July 13, 2014 00:28 IST

पावसाची संततधार : देवरूख बाजारपेठेला धक्का

देवरुख : गेल्या दीड महिन्यांपासून दडी मारलेल्या पावसाने शुक्रवारपासून संततधार बरसायला सुरुवात केली. यामुळे वृक्ष उन्मळून पडण्याचे प्रकार संगमेश्वर तालुक्यात घडून आले. देवरुखमधील भर बाजारपेठेत जुनाट वटवृक्ष कोसळून पडल्याने तब्बल ४७ लाख ९ हजाराचे नुकसान झाले आहे.हा वृक्ष कोसळल्याने दोन मोटरसायकल, एक रिक्षा, १७ दुकानांबरोबर ५ हातगाड्या अशा २४ जणांचे प्रचंड नुकसान झाले आहे. याबाबतचा पंचनामा शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत करण्यात आला. यामध्ये परिसरातील तब्बल ४७ लाख ९ हजार रुपयाचे नुकसान झाल्याचे पंचनामा महसूल यंत्रणेमार्फत करण्यात आला आहे.हा जुनाट वटवृक्ष रस्त्याच्या मध्यभागीच आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या दुकानावर पडल्याने लोकांची वर्दळ थांबली होती. हा वृक्ष तोडून जेसीबीच्या सहाय्याने शुक्रवारी दुपारपासून ते शनिवारी सायंकाळपर्यंत पावसाची तमा न बाळगता देवरुखमधील तरूणांनी, व्यापाऱ्यांनी तसेच पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी हा वटवृक्ष बाजूला करुन मार्ग मोकळा करण्यासाठी प्रयत्न केले. भर पावसात आपला कामधंदा सोडून मदतीचा हात पुढे करणाऱ्या या युवकांचे देवरुख शहरातून कौतुक होत आहे.घटनेचे वृत्त कळताच देवरुखच्या तहसीलदार वैशाली माने, देवरुख पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डॅनियल बेन, उपनिरीक्षक विशाल रुमणे, महावितरणचे उपअभियंता रमेश कदम यांनी घटनास्थळी भेट दिली. संगमेश्वर तालुक्यात शुक्रवारी १४२.९१ मिमी इतका पाऊस पडला. या वादळी पावसाने देवरुख बाजारपेठेतील किशोर खवळे, अनंत सार्दळ, किशोर हेमसिंग, राजेंद्र शेट्ये, फैरोद मणेर, राजेंद्र केदारी, मनोहर देवरुखकर, पल्लवी धामस्कर, अमित चव्हाण, जितेंद्र चरकरी, दिपक देवरुखकर, दत्तात्रय ढवळे, हेमंत चव्हाण, नंदकुमार बोरुकर, अभिजीत चव्हाण, मंगेश चरकरी, संतोष केदारी यांच्या दुकानाचे, मेहबूब फुलारी यांच्या हातगाडीचे, रुपेश लोध यांच्या हातगाडी व मोटरसायकलचे नुकसान झाले आहे. मारुती माळी, अकबर पठाण, विजय कोरे यांच्या हातगाड्यांचे, रमेश गोपाळ यांच्या रिक्षाचे, तर संतोष मांगले यांच्या मोटरसायकलचे नुकसान झाले. (प्रतिनिधी)