शहरं
Join us  
Trending Stories
1
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
2
Election 2025: प्रभाग रचनेचा प्रस्ताव देणार आता निवडणूक आयोगाला, सरकारचा सुधारित आदेश
3
रतन टाटा यांचे उरलेले शेअर्स 'त्या' दोन संस्थांनाच; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
4
MSRTC: एसटी गेली 'खड्ड्यात'; ३७ वर्षे तोट्याचा प्रवास, एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर
5
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
6
स्पर्धा परीक्षेप्रमाणे सरळसेवा भरती परीक्षेसाठीही 'पर्सेटाइल' पद्धत; 'क' गट नोकर भरतीसाठी एमपीएससीचा निर्णय
7
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
8
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
9
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
10
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
11
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
12
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
13
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
14
Iran strikes US air base: इराणचे प्रत्युत्तर; कतारमधील अमेरिकन लष्करी तळांवर जोरदार मिसाईल हल्ला
15
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
16
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
17
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
18
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
19
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
20
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?

कोरोनातून सावरलेल्या बालकांना एमएसआयसी आजाराचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या आता ६० हजाराकडे जाऊ लागली आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे कोरोनाच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या आता ६० हजाराकडे जाऊ लागली आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बालकेही मोठ्या प्रमाणावर बाधित होऊ लागली आहेत. यापैकी काहींना ‘एमएसआयसी’ (मल्टी सिस्टम इनफ्लेमेंटरी सिंड्रोम) चा धोका वाढला आहे. त्यामुळे यापासून या बालकांना सुरक्षित ठेवण्यासाठी आरोग्य यंत्रणा अधिक सजग झाली असून, अशा बालकांच्या सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे.

पहिल्या लाटेत बालके बाधित होण्याचे प्रमाण कमी होते; मात्र दुसऱ्या लाटेत मोठ्यांबरोबरच बालकांनाही कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत आहे. जी बालके उपचार घेऊन बाहेर पडली आहेत, त्यापैकी काहींना ‘एमएसआयसी’ चा धोका होऊ शकतो, या शक्यतेमुळे आरोग्य विभाग दक्ष होऊन सर्वेक्षण करीत आहे.

अशी घ्या काळजी....

जी बालके कोरोनाबाधित झाली आहेत, अशा बालकांपैकी काहींना ‘एमएसआयसी’चा धोका निर्माण होऊ शकतो. यात काही मुलांना खूप ताप येणे आणि तो पाच दिवसांपर्यंत कमी न होणे अशी लक्षणे आढळतात. बाल रोग तज्ज्ञांच्या मते, कोरोनाबाधित झालेल्या १०० मुलांमागे अगदीच १-२ मुलांना ‘एमएसआयसी’चा त्रास संभवतो.

बालकांना कोरोनापासून सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांना मास्कशिवाय बाहेर पाठवू नये. आवश्यक असेल तरच त्यांना बाहेर पाठवावे. बाहेर गेल्यानंतर त्यांना सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन करण्याविषयी खबरदारी घेण्यास सांगावे, तसेच वारंवार हात धुण्याची सवय लावावी. कोरोना होऊन गेलेल्या मुलांची अधिक काळजी घेणे गरजेचे आहे.

सध्या बालकांमध्येही कोरोनाचा संसर्ग होण्याचे प्रमाण मोठ्या व्यक्ती बाधित झाल्याने वाढले आहे; मात्र सर्वच मुले अगदी पूर्णपणे बरी होऊन बाहेर पडली आहेत. कोरोनामुक्त झाल्यानंतरही काही बालकांना ‘एमएसआयसी’ चा धोका संभवतो. जास्त वजन, दमा असलेल्या बालकांना होण्याची शक्यता असते; मात्र हे प्रमाणही अल्प आहे; मात्र तरीही या बालकांची काळजी घेणे आवश्यक आहे.

- डॉ. संघमित्रा फुले, जिल्हा शल्य चिकित्सक, रत्नागिरी.

मुलांमध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी त्यांना आवश्यक असलेली जीवनसत्वे मिळणे गरजेची आहेत. ती त्यांना अधिकाधिक आहारातून देण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर फास्ट फूड, जंक फूड सद्यस्थितीत मुलांना देऊ नये, मुलांचे अवाजवी वजन वाढणार नाही, याची खबरदारी घ्यावी. महत्त्वाचे म्हणजे मुलांना व्यायामाची सवय करावी. सध्या खेळही थांबला आहे.