शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
3
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
19
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
20
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले

कोरोनातून सावरलेल्या बालकांना एमएसआयसी आजाराचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या आता ६० हजाराकडे जाऊ लागली आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे कोरोनाच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या आता ६० हजाराकडे जाऊ लागली आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बालकेही मोठ्या प्रमाणावर बाधित होऊ लागली आहेत. यापैकी काहींना ‘एमएसआयसी’ (मल्टी सिस्टम इनफ्लेमेंटरी सिंड्रोम) चा धोका वाढला आहे. त्यामुळे यापासून या बालकांना सुरक्षित ठेवण्यासाठी आरोग्य यंत्रणा अधिक सजग झाली असून, अशा बालकांच्या सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे.

पहिल्या लाटेत बालके बाधित होण्याचे प्रमाण कमी होते; मात्र दुसऱ्या लाटेत मोठ्यांबरोबरच बालकांनाही कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत आहे. जी बालके उपचार घेऊन बाहेर पडली आहेत, त्यापैकी काहींना ‘एमएसआयसी’ चा धोका होऊ शकतो, या शक्यतेमुळे आरोग्य विभाग दक्ष होऊन सर्वेक्षण करीत आहे.

अशी घ्या काळजी....

जी बालके कोरोनाबाधित झाली आहेत, अशा बालकांपैकी काहींना ‘एमएसआयसी’चा धोका निर्माण होऊ शकतो. यात काही मुलांना खूप ताप येणे आणि तो पाच दिवसांपर्यंत कमी न होणे अशी लक्षणे आढळतात. बाल रोग तज्ज्ञांच्या मते, कोरोनाबाधित झालेल्या १०० मुलांमागे अगदीच १-२ मुलांना ‘एमएसआयसी’चा त्रास संभवतो.

बालकांना कोरोनापासून सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांना मास्कशिवाय बाहेर पाठवू नये. आवश्यक असेल तरच त्यांना बाहेर पाठवावे. बाहेर गेल्यानंतर त्यांना सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन करण्याविषयी खबरदारी घेण्यास सांगावे, तसेच वारंवार हात धुण्याची सवय लावावी. कोरोना होऊन गेलेल्या मुलांची अधिक काळजी घेणे गरजेचे आहे.

सध्या बालकांमध्येही कोरोनाचा संसर्ग होण्याचे प्रमाण मोठ्या व्यक्ती बाधित झाल्याने वाढले आहे; मात्र सर्वच मुले अगदी पूर्णपणे बरी होऊन बाहेर पडली आहेत. कोरोनामुक्त झाल्यानंतरही काही बालकांना ‘एमएसआयसी’ चा धोका संभवतो. जास्त वजन, दमा असलेल्या बालकांना होण्याची शक्यता असते; मात्र हे प्रमाणही अल्प आहे; मात्र तरीही या बालकांची काळजी घेणे आवश्यक आहे.

- डॉ. संघमित्रा फुले, जिल्हा शल्य चिकित्सक, रत्नागिरी.

मुलांमध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी त्यांना आवश्यक असलेली जीवनसत्वे मिळणे गरजेची आहेत. ती त्यांना अधिकाधिक आहारातून देण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर फास्ट फूड, जंक फूड सद्यस्थितीत मुलांना देऊ नये, मुलांचे अवाजवी वजन वाढणार नाही, याची खबरदारी घ्यावी. महत्त्वाचे म्हणजे मुलांना व्यायामाची सवय करावी. सध्या खेळही थांबला आहे.