शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

ॲव्हरेज गुणांचा फटका बसण्याचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:20 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोरोनामुळे प्रत्यक्ष परीक्षा घेणे शक्य नसल्याने बारावीची परीक्षा अखेर रद्द करण्यात आली. मात्र, या ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : कोरोनामुळे प्रत्यक्ष परीक्षा घेणे शक्य नसल्याने बारावीची परीक्षा अखेर रद्द करण्यात आली. मात्र, या परीक्षेचा निकाल लावत असताना दहावी, अकरावी व बारावीचे गुण एकत्रित करत विद्यार्थ्यांचे ॲव्हरेज गुण काढण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांची झोप उडाली आहे.

दहावीचे ३० टक्के, अकरावीचे ३० टक्के व बारावीचे ४० टक्के गुण घेऊन तिन्हीचे मिळून विद्यार्थ्यांना ॲव्हरेज गुण दिले जाणार आहेत. मात्र, याचा फटका मुलांना बसण्याची शक्यता आहे. अनेक मुलांना दहावीला चांगले गुण असतात, मात्र अकरावीत प्रवेश घेतल्यानंतर ते बारावीच्या तयारीमुळे अकरावीचे वर्ष ‘रेस्ट इअर’ मानले जाते. त्यामुळे अकरावीत फारसे अभ्यासावर लक्ष न देता, पास होण्यापुरते गुण मिळवले जातात. त्यामुळे अकरावीला जर कमी गुण मिळालेले असतील, अशा मुलांना अकरावीचे ३० टक्के गुण धरताना नुकसान होणार आहे. एकूणच दहावीत चांगली गुणवत्ता आहे, मात्र अकरावीचे गुण कमी आहेत. बारावीची परीक्षाच झालेली नसल्याने वर्षभरातील एकूण कामगिरीबद्दल ४० टक्के गुण ग्राह्य धरले जाणार आहेत. त्यामुळे दहावीला विशेष गुणवत्ता असली तरी अकरावीचे कमी गुण व बारावीत तर एकूण सादरीकरणावरून गुण ग्राह्य धरले जाणार असले तरी मुलांना यामुळे कमी गुण प्राप्त होऊन गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळेच विद्यार्थी, पालकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी शासनाकडून निकषात बदल करण्याची मागणी होत आहे.

कोरोनामुळे ऑनलाईन अध्यापनाचा प्रकार नवीन होता. बारावीच्या परीक्षेची तयारी करण्यात आली होती, परंतु प्रत्यक्ष परीक्षा घेणे शक्य न झाल्याने परीक्षा रद्द करून निकालासाठी दहावी, अकरावी व बारावीच्या गुणांवरून सूत्र ठरविण्यात आले आहे. ॲव्हरेज गुणांमुळे आमचे नुकसान होणार आहे.

- श्रावणी पाटील, विद्यार्थिनी

दहावीला चांगले गुण मिळवले होते. मात्र, पुढील बारावीचे वर्ष असल्याने अकरावीच्या वर्षात अभ्यासाकडे फारसे लक्ष दिले नव्हते, परंतु बारावीच्या वर्षात सुरूवातीपासून अभ्यास करत होतो. शासनाने प्रत्यक्ष परीक्षा घेणे शक्य नसल्याचे कारण देत परीक्षा रद्द केली. परंतु, सरासरी गुणात घसरण होण्याचा धोका आहे

- आर्य देसाई, विद्यार्थी

दहावीला, अकरावीला कमी गुण मिळविणारे विद्यार्थी बारावीला चांगले गुण मिळवू शकतात. त्यामुळे तीन वर्षांचे गुण एकत्रित करून ॲव्हरेजव्दारे गुण देण्याची पध्दत अयोग्य असून, त्यामध्ये शासनाने बदल करण्याची आवश्यकता आहे.

- ईशानी आंबेकर, विद्यार्थिनी

दहावी, अकरावी बारावीच्या गुणांवरून ॲव्हरेज गुण देण्याच्या पध्दतीचा वापर करताना, गुणांचा डोंगर वाढण्याबरोबर काही मुलांवर अन्यायही होण्याचा धोका आहे. प्रत्यक्ष परीक्षेनंतरचे गुण व ॲव्हरेज गुण यामध्ये फरक आहे. यामध्ये आमचेच नुकसान आहे.

- ऋजुल कुलकर्णी, विद्यार्थी