शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
3
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
4
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
5
सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
6
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
7
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
8
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
9
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
10
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
11
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
12
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
13
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?
14
Video - हॉटेलमध्ये बॉयफ्रेंडसोबत नवऱ्याने रंगेहाथ पकडताच 'ती' झाली स्पायडरमॅन, थेट छतावरुन...
15
एका हाताला लकवा, नीट ऐकताही येत नाही! तरीही ४४ वर्षांपासून अयातुल्ला खामेनेई कसं सांभाळतात इराणचं सरकार?
16
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
17
Fastag New Rules : एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
18
सलमान खानने केली आमिरची चेष्टा, नवीन गर्लफ्रेंडवरुन म्हणाला; "तो परफेक्शनिस्ट..."
19
“पांडुरंग सगळ्यांच्या मनोकामना ऐकतील”; अजितदादा CM होण्याबाबत सुनेत्रा पवारांचे सूचक विधान

ॲव्हरेज गुणांचा फटका बसण्याचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:20 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोरोनामुळे प्रत्यक्ष परीक्षा घेणे शक्य नसल्याने बारावीची परीक्षा अखेर रद्द करण्यात आली. मात्र, या ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : कोरोनामुळे प्रत्यक्ष परीक्षा घेणे शक्य नसल्याने बारावीची परीक्षा अखेर रद्द करण्यात आली. मात्र, या परीक्षेचा निकाल लावत असताना दहावी, अकरावी व बारावीचे गुण एकत्रित करत विद्यार्थ्यांचे ॲव्हरेज गुण काढण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांची झोप उडाली आहे.

दहावीचे ३० टक्के, अकरावीचे ३० टक्के व बारावीचे ४० टक्के गुण घेऊन तिन्हीचे मिळून विद्यार्थ्यांना ॲव्हरेज गुण दिले जाणार आहेत. मात्र, याचा फटका मुलांना बसण्याची शक्यता आहे. अनेक मुलांना दहावीला चांगले गुण असतात, मात्र अकरावीत प्रवेश घेतल्यानंतर ते बारावीच्या तयारीमुळे अकरावीचे वर्ष ‘रेस्ट इअर’ मानले जाते. त्यामुळे अकरावीत फारसे अभ्यासावर लक्ष न देता, पास होण्यापुरते गुण मिळवले जातात. त्यामुळे अकरावीला जर कमी गुण मिळालेले असतील, अशा मुलांना अकरावीचे ३० टक्के गुण धरताना नुकसान होणार आहे. एकूणच दहावीत चांगली गुणवत्ता आहे, मात्र अकरावीचे गुण कमी आहेत. बारावीची परीक्षाच झालेली नसल्याने वर्षभरातील एकूण कामगिरीबद्दल ४० टक्के गुण ग्राह्य धरले जाणार आहेत. त्यामुळे दहावीला विशेष गुणवत्ता असली तरी अकरावीचे कमी गुण व बारावीत तर एकूण सादरीकरणावरून गुण ग्राह्य धरले जाणार असले तरी मुलांना यामुळे कमी गुण प्राप्त होऊन गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळेच विद्यार्थी, पालकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी शासनाकडून निकषात बदल करण्याची मागणी होत आहे.

कोरोनामुळे ऑनलाईन अध्यापनाचा प्रकार नवीन होता. बारावीच्या परीक्षेची तयारी करण्यात आली होती, परंतु प्रत्यक्ष परीक्षा घेणे शक्य न झाल्याने परीक्षा रद्द करून निकालासाठी दहावी, अकरावी व बारावीच्या गुणांवरून सूत्र ठरविण्यात आले आहे. ॲव्हरेज गुणांमुळे आमचे नुकसान होणार आहे.

- श्रावणी पाटील, विद्यार्थिनी

दहावीला चांगले गुण मिळवले होते. मात्र, पुढील बारावीचे वर्ष असल्याने अकरावीच्या वर्षात अभ्यासाकडे फारसे लक्ष दिले नव्हते, परंतु बारावीच्या वर्षात सुरूवातीपासून अभ्यास करत होतो. शासनाने प्रत्यक्ष परीक्षा घेणे शक्य नसल्याचे कारण देत परीक्षा रद्द केली. परंतु, सरासरी गुणात घसरण होण्याचा धोका आहे

- आर्य देसाई, विद्यार्थी

दहावीला, अकरावीला कमी गुण मिळविणारे विद्यार्थी बारावीला चांगले गुण मिळवू शकतात. त्यामुळे तीन वर्षांचे गुण एकत्रित करून ॲव्हरेजव्दारे गुण देण्याची पध्दत अयोग्य असून, त्यामध्ये शासनाने बदल करण्याची आवश्यकता आहे.

- ईशानी आंबेकर, विद्यार्थिनी

दहावी, अकरावी बारावीच्या गुणांवरून ॲव्हरेज गुण देण्याच्या पध्दतीचा वापर करताना, गुणांचा डोंगर वाढण्याबरोबर काही मुलांवर अन्यायही होण्याचा धोका आहे. प्रत्यक्ष परीक्षेनंतरचे गुण व ॲव्हरेज गुण यामध्ये फरक आहे. यामध्ये आमचेच नुकसान आहे.

- ऋजुल कुलकर्णी, विद्यार्थी