शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
2
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
3
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
4
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
5
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
6
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
7
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
8
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
9
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
10
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
11
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
12
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
13
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
14
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
15
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
16
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
17
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
18
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
19
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
20
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!

ॲव्हरेज गुणांचा फटका बसण्याचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:20 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोरोनामुळे प्रत्यक्ष परीक्षा घेणे शक्य नसल्याने बारावीची परीक्षा अखेर रद्द करण्यात आली. मात्र, या ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : कोरोनामुळे प्रत्यक्ष परीक्षा घेणे शक्य नसल्याने बारावीची परीक्षा अखेर रद्द करण्यात आली. मात्र, या परीक्षेचा निकाल लावत असताना दहावी, अकरावी व बारावीचे गुण एकत्रित करत विद्यार्थ्यांचे ॲव्हरेज गुण काढण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांची झोप उडाली आहे.

दहावीचे ३० टक्के, अकरावीचे ३० टक्के व बारावीचे ४० टक्के गुण घेऊन तिन्हीचे मिळून विद्यार्थ्यांना ॲव्हरेज गुण दिले जाणार आहेत. मात्र, याचा फटका मुलांना बसण्याची शक्यता आहे. अनेक मुलांना दहावीला चांगले गुण असतात, मात्र अकरावीत प्रवेश घेतल्यानंतर ते बारावीच्या तयारीमुळे अकरावीचे वर्ष ‘रेस्ट इअर’ मानले जाते. त्यामुळे अकरावीत फारसे अभ्यासावर लक्ष न देता, पास होण्यापुरते गुण मिळवले जातात. त्यामुळे अकरावीला जर कमी गुण मिळालेले असतील, अशा मुलांना अकरावीचे ३० टक्के गुण धरताना नुकसान होणार आहे. एकूणच दहावीत चांगली गुणवत्ता आहे, मात्र अकरावीचे गुण कमी आहेत. बारावीची परीक्षाच झालेली नसल्याने वर्षभरातील एकूण कामगिरीबद्दल ४० टक्के गुण ग्राह्य धरले जाणार आहेत. त्यामुळे दहावीला विशेष गुणवत्ता असली तरी अकरावीचे कमी गुण व बारावीत तर एकूण सादरीकरणावरून गुण ग्राह्य धरले जाणार असले तरी मुलांना यामुळे कमी गुण प्राप्त होऊन गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळेच विद्यार्थी, पालकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी शासनाकडून निकषात बदल करण्याची मागणी होत आहे.

कोरोनामुळे ऑनलाईन अध्यापनाचा प्रकार नवीन होता. बारावीच्या परीक्षेची तयारी करण्यात आली होती, परंतु प्रत्यक्ष परीक्षा घेणे शक्य न झाल्याने परीक्षा रद्द करून निकालासाठी दहावी, अकरावी व बारावीच्या गुणांवरून सूत्र ठरविण्यात आले आहे. ॲव्हरेज गुणांमुळे आमचे नुकसान होणार आहे.

- श्रावणी पाटील, विद्यार्थिनी

दहावीला चांगले गुण मिळवले होते. मात्र, पुढील बारावीचे वर्ष असल्याने अकरावीच्या वर्षात अभ्यासाकडे फारसे लक्ष दिले नव्हते, परंतु बारावीच्या वर्षात सुरूवातीपासून अभ्यास करत होतो. शासनाने प्रत्यक्ष परीक्षा घेणे शक्य नसल्याचे कारण देत परीक्षा रद्द केली. परंतु, सरासरी गुणात घसरण होण्याचा धोका आहे

- आर्य देसाई, विद्यार्थी

दहावीला, अकरावीला कमी गुण मिळविणारे विद्यार्थी बारावीला चांगले गुण मिळवू शकतात. त्यामुळे तीन वर्षांचे गुण एकत्रित करून ॲव्हरेजव्दारे गुण देण्याची पध्दत अयोग्य असून, त्यामध्ये शासनाने बदल करण्याची आवश्यकता आहे.

- ईशानी आंबेकर, विद्यार्थिनी

दहावी, अकरावी बारावीच्या गुणांवरून ॲव्हरेज गुण देण्याच्या पध्दतीचा वापर करताना, गुणांचा डोंगर वाढण्याबरोबर काही मुलांवर अन्यायही होण्याचा धोका आहे. प्रत्यक्ष परीक्षेनंतरचे गुण व ॲव्हरेज गुण यामध्ये फरक आहे. यामध्ये आमचेच नुकसान आहे.

- ऋजुल कुलकर्णी, विद्यार्थी