शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

खाद्यतेलाच्या दरात वाढ सुरूच, सर्वसामान्य चिंतेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:23 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : वाढत्या महागाईचा परिणाम खाद्यतेल, डाळी, कडधान्यांच्या दरावर झाला आहे. दिवसेंदिवस खाद्यतेलाचे दर मात्र भडकत ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : वाढत्या महागाईचा परिणाम खाद्यतेल, डाळी, कडधान्यांच्या दरावर झाला आहे. दिवसेंदिवस खाद्यतेलाचे दर मात्र भडकत असल्याने फोडणी महागली आहे. शासनाचे महागाईवर नियंत्रण नसल्याने दरातील वाढ सातत्याने सुरू आहे. वाढत्या दरामुळे पावसाळ्यासाठी लागणारे साहित्य खरेदीसाठी ग्राहकांनी आखडता हात घेतला आहे.

लाॅकडाऊन सुरू असून, परजिल्ह्यातून येणाऱ्या भाजीपाल्याची आवक मंदावली आहे. कडधान्य, डाळी, तेलाची आवक वाशी (नवी मुंबई) व कोल्हापूर येथून होते. होलसेल मार्केटमध्येच दर वाढल्याने किरकोळ विक्रीवर परिणाम झाला आहे. भाज्यांच्या दराने तर शंभरी गाठली आहे. डाळी व कडधान्यांच्या दरानेही शंभरी ओलांडली आहे. त्यामुळे दैनंदिन स्वयंपाकातील ‘डाळभात’सुध्दा महागला आहे. लाॅकडाऊनमुळे रोजगारावर परिणाम झाल्याने गोरगरिबांना दोनवेळचे पोटभर अन्न मिळणे अवघड झाले आहे.

सूर्यफूल, शेंगदाणा, कापूस, सोयाबीन तेलाच्या दरात सातत्याने वाढ झाली आहे. या तेलांची १२० ते १८५ रूपये लीटर दराने विक्री करण्यात येत आहे. बारा लीटर तेलाचा बाॅक्स २०२० रूपये तर १५ लीटरच्या डब्याची दोन हजार ७७५ रूपये दराने विक्री सुरू आहे. खाद्यतेलांच्या दरातील वाढ खाद्यपदार्थाचे दरावर होण्याची शक्यता आहे.

तांदळाच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. अखंड तांदूळ ४० ते ८५ रूपयांपर्यंत तर तुकडा तांदूळ ३२ ते ३५ रूपये किलाे दराने विकण्यात येत आहे. ३२० ते ३५० रूपये दराने दहा किलोच्या पिशवीची विक्री सुरू आहे.

गेले वर्षभर साखरेचे भाव मात्र स्थिर आहेत. घाऊक ३२ रूपये तर किरकोळ ३५ रूपये किलाे दराने साखर विक्री सुरू आहे. साखरेसह गुळालाही मागणी होत आहे. ६० ते ७० रूपये किलो दराने गूळ विक्री होत असून, सेंद्रिय गुळाला विशेष मागणी होत आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेलाच्या किमती भडकल्याने दरात वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे. भारतातून कच्चा माल निर्यात केला जात असताना, दरावर शासनाचे नियंत्रण असणे गरजेचे आहे.

- राधिका पाटील, गृहिणी

कोरोनामुळे आर्थिक संकट उद्भवले असतानाच वाढत्या महागाईचा सामना करावा लागत आहे. शासनाचे वाढत्या दरावर नियंत्रण असणे गरजेचे आहे. अन्यथा दरवाढ भूकबळीचे कारण ठरू शकते.

- उषा नाईक, गृहिणी