शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान चाचणी करायला गेला...! आपल्याच मिसाईलपासून थोडक्यात वाचला, अणु केंद्राजवळ कोसळली
2
"आम्ही शत्रू नाही..." CM देवेंद्र फडणवीस यांनी मानले उद्धव ठाकरे-शरद पवारांचे आभार, पण का?
3
पुण्यात मध्यरात्री २ तास गावगुंडांचा धुमाकूळ; रिक्षा, कार, स्कूल बससह २० ते २५ वाहनांची तोडफोड
4
छोट्या दुकानदारांनी UPI QR कोड काढले, बंगळुरूतील प्रकारानंतर व्यापारी भयभीत, नेमकं काय घडले?
5
घागर भरुनी, दही दूध लोणी विकून...! ही कंपनी २०३५ कोटी रुपयांचा IPO आणणार, सेबीच्या हातात कागदपत्र सोपविले...
6
२००० रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या UPI व्यवहारांवर किती GST आकारणार? सरकारने संसदेत दिले उत्तर
7
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
8
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Sensex मध्ये २०० अंकांपेक्षा अधिक उसळी, कोणते शेअर्स चमकले?
9
गुरुपुष्यामृतयोग म्हणजे काय? अशुभतेपासून रक्षण, पुण्य फलदायी लक्ष्मी पूजन; सुख-सुबत्ता वृद्धी
10
सीक्रेट मैत्री! 'या' इस्लामिक राष्ट्रानं भारताशी साधली जवळीक; पाकिस्तानसह तुर्कीलाही मोठा धक्का
11
टॅरिफची धमकी देत ट्रम्प यांनी साधली इतिहासातील सर्वात मोठी डील; जगातील मोठी अर्थव्यवस्था झुकली...
12
...तरीही भारत बांगलादेशच्या मदतीला धावला! विमान अपघातातील जखमींवर उपचारासाठी डॉक्टरांचे पथक पाठविणार...
13
ज्या मराठी तरुणीला मारहाण झाली, तिची परिस्थिती गंभीर; डॉक्टर म्हणाले, पॅरालिसीस...'
14
बाजाराचा मोह सोडा! ३ कोटी ९ लाखांचा मालक तर PPF चं बनवेल; फक्त पती-पत्नीला हा फॅार्म्युला वापरावा लागेल
15
दुबईत नोकरी, १० लाखाची ऑफर...; मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी १९ वर्षांनी मोहम्मद शेखची सुटका
16
पाकिस्तानी विमानांना भारतीय हवाई हद्दीत प्रवेश नाहीच; केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय
17
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: १० राशींवर अपार धनलक्ष्मी कृपा, पगारवाढ लाभ, स्वामी शुभच करतील!
18
स्वत:च्या कार घेऊन आता ट्रेनने जाता येणार गोव्याला! कसं? जाणून घ्या...
19
Deep Amavasya 2025: दीप पूजन शास्त्रोक्त विधीने कसे करावे आणि दिव्यांची कोणती आरती म्हणावी जाणून घ्या
20
"आपण भारतात राहतो, बंदूक घेऊन ठेवावी लागेल", प्रेग्नंसीवेळी घाबरलेली रिचा चड्डा; कारण काय?

खाद्यतेलाच्या दरात वाढ सुरूच, सर्वसामान्य चिंतेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:23 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : वाढत्या महागाईचा परिणाम खाद्यतेल, डाळी, कडधान्यांच्या दरावर झाला आहे. दिवसेंदिवस खाद्यतेलाचे दर मात्र भडकत ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : वाढत्या महागाईचा परिणाम खाद्यतेल, डाळी, कडधान्यांच्या दरावर झाला आहे. दिवसेंदिवस खाद्यतेलाचे दर मात्र भडकत असल्याने फोडणी महागली आहे. शासनाचे महागाईवर नियंत्रण नसल्याने दरातील वाढ सातत्याने सुरू आहे. वाढत्या दरामुळे पावसाळ्यासाठी लागणारे साहित्य खरेदीसाठी ग्राहकांनी आखडता हात घेतला आहे.

लाॅकडाऊन सुरू असून, परजिल्ह्यातून येणाऱ्या भाजीपाल्याची आवक मंदावली आहे. कडधान्य, डाळी, तेलाची आवक वाशी (नवी मुंबई) व कोल्हापूर येथून होते. होलसेल मार्केटमध्येच दर वाढल्याने किरकोळ विक्रीवर परिणाम झाला आहे. भाज्यांच्या दराने तर शंभरी गाठली आहे. डाळी व कडधान्यांच्या दरानेही शंभरी ओलांडली आहे. त्यामुळे दैनंदिन स्वयंपाकातील ‘डाळभात’सुध्दा महागला आहे. लाॅकडाऊनमुळे रोजगारावर परिणाम झाल्याने गोरगरिबांना दोनवेळचे पोटभर अन्न मिळणे अवघड झाले आहे.

सूर्यफूल, शेंगदाणा, कापूस, सोयाबीन तेलाच्या दरात सातत्याने वाढ झाली आहे. या तेलांची १२० ते १८५ रूपये लीटर दराने विक्री करण्यात येत आहे. बारा लीटर तेलाचा बाॅक्स २०२० रूपये तर १५ लीटरच्या डब्याची दोन हजार ७७५ रूपये दराने विक्री सुरू आहे. खाद्यतेलांच्या दरातील वाढ खाद्यपदार्थाचे दरावर होण्याची शक्यता आहे.

तांदळाच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. अखंड तांदूळ ४० ते ८५ रूपयांपर्यंत तर तुकडा तांदूळ ३२ ते ३५ रूपये किलाे दराने विकण्यात येत आहे. ३२० ते ३५० रूपये दराने दहा किलोच्या पिशवीची विक्री सुरू आहे.

गेले वर्षभर साखरेचे भाव मात्र स्थिर आहेत. घाऊक ३२ रूपये तर किरकोळ ३५ रूपये किलाे दराने साखर विक्री सुरू आहे. साखरेसह गुळालाही मागणी होत आहे. ६० ते ७० रूपये किलो दराने गूळ विक्री होत असून, सेंद्रिय गुळाला विशेष मागणी होत आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेलाच्या किमती भडकल्याने दरात वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे. भारतातून कच्चा माल निर्यात केला जात असताना, दरावर शासनाचे नियंत्रण असणे गरजेचे आहे.

- राधिका पाटील, गृहिणी

कोरोनामुळे आर्थिक संकट उद्भवले असतानाच वाढत्या महागाईचा सामना करावा लागत आहे. शासनाचे वाढत्या दरावर नियंत्रण असणे गरजेचे आहे. अन्यथा दरवाढ भूकबळीचे कारण ठरू शकते.

- उषा नाईक, गृहिणी