शहरं
Join us  
Trending Stories
1
"भाजपाशी अनैतिक संबंध तोडावेत, जसं 'वर्षा'वर हक्कानं जाता, तसं 'मातोश्री'वर यावं" 
2
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
3
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
4
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
5
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
6
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
7
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
8
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
9
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
10
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
11
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
12
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
13
“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय
14
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई
15
राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू
16
...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी
17
तिन्ही मार्गावर मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’; पश्चिम, मध्य, हार्बरवरील वेळापत्रक कसे असेल?
18
मुंबई सेंट्रल स्थानकावर पहिले डिजिटल लाउंज; केवळ प्रवासी नाही तर नागरिकांनाही लाभ मिळणार
19
दारूच्या नशेत बेभान कंटेनर चालकाने वाहनांसह २० नागरिकांना उडविले; बीडमधील थरार, महिला ठार
20
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर

राजापुरातील ग्रामीण भागातील वाढता कोरोना संसर्ग चिंताजनक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:40 IST

राजापूर : तालुक्यात कडक लॉकडाऊन असतानाही ग्रामीण भागातील वाढता कोरोना संसर्ग चिंतेची बाब ठरली आहे. ग्रामीण भागातील जनतेने अधिक ...

राजापूर : तालुक्यात कडक लॉकडाऊन असतानाही ग्रामीण भागातील वाढता कोरोना संसर्ग चिंतेची बाब ठरली आहे. ग्रामीण भागातील जनतेने अधिक सतर्कता बाळगताना सर्दी, ताप, खोकला यासारखी लक्षणे दिसून येताच कोरोना चाचणीसाठी पुढे यावे, असे आवाहन तहसीलदार प्रतिभा वराळे यांनी केले आहे.

राजापूर तालुक्यातील ग्रामीण भागात गेल्या काही दिवसात कोरोना संसर्गाची झपाट्याने वाढ झाली आहे. कडक लॉकडाऊनच्या काळात कोरोना संसर्गाचे रूग्ण कमी होणे आवश्यक होते. मात्र, ग्रामीण भागात सध्या कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. यामध्ये काही रूग्णांना प्राथमिक लक्षणे दिसूनही औषध उपचाराकडे दुर्लक्ष होत आहे. काहीजण जाणीवपूर्वक डॉक्टरकडे तपासणीसाठी जाणे टाळत आहेत. यातून मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. खास करून महिला कुटुंबात काम करताना असे आजार लपविण्याचा प्रयत्न करतात. यासाठी आता ग्रामीण भागातील जनतेने अधिक सतर्क होणे आवश्यक असून, अशाप्रकारची कोणतीही लक्षणे आढळल्यास प्राधान्याने तपासणी करून घ्यावी. तसेच आवश्यकता भासल्यास तत्काळ कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन वराळे यांनी केले आहे.

------------------------

ग्रामपंचायत पातळीवर विलगीकरण कक्ष

तालुक्याच्या ग्रामीण भागातील वाढता संसर्ग लक्षात घेता, पंधराशे ते दोन हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात स्थानिक आरोग्य प्रशासनाच्या सहकार्यातून विलगीकरण कक्ष सुरू करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार वराळे यांनी दिली. सद्यपरिस्थितीत कोंडसर बुद्रुक व कुंभवडे येथे असे विलगीकरण कक्ष सुरू झाले आहेत. जेणेकरून गावपातळीवरच अशा रूग्णांना उपचार देणे शक्य होणार आहे.