शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाज वाटू द्या, गिधाडांनो !"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावला, पोलिसांची दडपशाही (video viral)
2
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
3
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
4
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
5
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
6
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
7
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
8
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
9
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
10
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
11
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
12
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
13
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल
14
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
15
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
16
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार
17
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
18
"नवोदित कलाकारांनाही इथे...", मराठी अभिनेत्याची 'चला हवा येऊ द्या'साठी पोस्ट, निलेश साबळेंबद्दल म्हणाला...
19
चमत्कार! पाकिस्तानात हिंदू कुटुंबातील २० जणांचा मृत्यू; ३ महिन्यांची चिमुकली बचावली
20
Vastu Shastra: अंघोळ झाल्यावर करत असाल 'ही' एक चूक तर घरात भरेल नकारात्मक ऊर्जा!

राजापुरातील ग्रामीण भागातील वाढता कोरोना संसर्ग चिंताजनक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:40 IST

राजापूर : तालुक्यात कडक लॉकडाऊन असतानाही ग्रामीण भागातील वाढता कोरोना संसर्ग चिंतेची बाब ठरली आहे. ग्रामीण भागातील जनतेने अधिक ...

राजापूर : तालुक्यात कडक लॉकडाऊन असतानाही ग्रामीण भागातील वाढता कोरोना संसर्ग चिंतेची बाब ठरली आहे. ग्रामीण भागातील जनतेने अधिक सतर्कता बाळगताना सर्दी, ताप, खोकला यासारखी लक्षणे दिसून येताच कोरोना चाचणीसाठी पुढे यावे, असे आवाहन तहसीलदार प्रतिभा वराळे यांनी केले आहे.

राजापूर तालुक्यातील ग्रामीण भागात गेल्या काही दिवसात कोरोना संसर्गाची झपाट्याने वाढ झाली आहे. कडक लॉकडाऊनच्या काळात कोरोना संसर्गाचे रूग्ण कमी होणे आवश्यक होते. मात्र, ग्रामीण भागात सध्या कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. यामध्ये काही रूग्णांना प्राथमिक लक्षणे दिसूनही औषध उपचाराकडे दुर्लक्ष होत आहे. काहीजण जाणीवपूर्वक डॉक्टरकडे तपासणीसाठी जाणे टाळत आहेत. यातून मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. खास करून महिला कुटुंबात काम करताना असे आजार लपविण्याचा प्रयत्न करतात. यासाठी आता ग्रामीण भागातील जनतेने अधिक सतर्क होणे आवश्यक असून, अशाप्रकारची कोणतीही लक्षणे आढळल्यास प्राधान्याने तपासणी करून घ्यावी. तसेच आवश्यकता भासल्यास तत्काळ कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन वराळे यांनी केले आहे.

------------------------

ग्रामपंचायत पातळीवर विलगीकरण कक्ष

तालुक्याच्या ग्रामीण भागातील वाढता संसर्ग लक्षात घेता, पंधराशे ते दोन हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात स्थानिक आरोग्य प्रशासनाच्या सहकार्यातून विलगीकरण कक्ष सुरू करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार वराळे यांनी दिली. सद्यपरिस्थितीत कोंडसर बुद्रुक व कुंभवडे येथे असे विलगीकरण कक्ष सुरू झाले आहेत. जेणेकरून गावपातळीवरच अशा रूग्णांना उपचार देणे शक्य होणार आहे.