शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

सात महिन्यांत ४९ कोटी ४४ लाखांचा महसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : शासनाने जाहीर केलेल्या मुद्रांक सवलत योजनेचा लाभ जिल्ह्यातील हजारो नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर घेतल्याने सप्टेंबर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : शासनाने जाहीर केलेल्या मुद्रांक सवलत योजनेचा लाभ जिल्ह्यातील हजारो नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर घेतल्याने सप्टेंबर २०२० ते मार्च २०२१ या कालावधीत २२,०११ दस्तांची नोंदणी झाली. यातून तब्बल ४९ कोटी ४२ लाख रुपयांचा महसूल शासनाला मिळाला आहे. केवळ मार्च महिन्यातच ९ कोटी ६७ लाखांचा महसूल जमा झाला आहे, अशी माहिती मुद्रांक जिल्हाधिकारी वाय.बी. जंगम यांनी दिली.

कोरोनामुळे सुरू झालेल्या लाॅकडाऊनकाळात बांधकाम क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर मंदीचे सावट होते. त्यामुळे गतवर्षी एप्रिल ते सप्टेंबरदरम्यान दस्तांची नोंदणी झालीच नाही. जूननंतर दस्तनोंदणीला हळूहळू प्रतिसाद मिळू लागला. बांधकाम क्षेत्रावरील मंदी दूर व्हावी, तसेच सामान्य नागरिकांचे घराचे स्वप्न पूर्ण करता यावे, या उद्देशाने शासनाने मुद्रांक शुल्कात सवलत योजना दोन टप्प्यांत जाहीर केली. १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर २०२० पर्यंत शासनाने तीन टक्के मुद्रांक शुल्क सवलत योजना जाहीर केली होती. तर १ जानेवारी ते ३१ मार्च २०२१ पर्यंत दोन टक्‍क्‍यांची सवलत होती.

सप्टेंबर महिन्यात शासनाने मुद्रांक शुल्कात सवलत योजना जाहीर करताच लाॅकडाऊन काही अंशी शिथिल झाल्याने नागरिक घरखरेदीसाठी बाहेर पडू लागले. त्यामुळे १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर या पहिल्या टप्प्यात १०,४३६ दस्तांची नोंदणी झाली असून शासनाला २६ कोटी ८४ लाख ९४ हजार ३ रुपये इतका महसूल मिळाला आहे. तसेच १ जानेवारी ते ३१ मार्च २०२१ या कालावधीत ८२७२ दस्तांची नोंद करण्यात आली. त्यातून २२ कोटी ५७ लाख ३९ हजार ८८० रुपयांचा महसूल शासनाच्या तिजोरीत जमा झाला आहे.

१ एप्रिल २०२१ पासून मुद्रांक शुल्क पुन्हा ५ टक्के होणार असल्याने नागरिकांनी मार्च महिन्यात या योजनेचा लाभ मोठ्या प्रमाणावर घेतला. ३१ मार्च रोजी रात्री दीड वाजेपर्यंत दस्तनोंदणीसाठी या कार्यालयाबाहेर माेठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. त्यामुळे केवळ मार्च महिन्यातच या कार्यालयाचा महसूल ९ कोटी ६७ लाख २८ हजार ७६ रुपये इतका झाला. या महिन्यात ३३०३ दस्तांची नोंदणी करण्यात आली.

चौकट

कालावधी दस्तनोंदणी जमा महसूल

१ सप्टेंबर २० ते मार्च २१ २२,०११ ४९,४२,३३,८८३

१ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर २० १०,४३६ २६,८४,९४,००३

१ जानेवारी ते ३१ मार्च २१ ८,२७२ २२,५७,३९,८८०

१ ते ३१ मार्च २१ ३३०३ ९,६७,२८,०७६.