शहरं
Join us  
Trending Stories
1
खबरदार! समर्थन कराल तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ वसूल करू; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, कारण काय?
2
थोडं थांबा, मोबाईल रिचार्ज १०-१२ टक्क्यांनी महाग होणार; मे महिन्याने कंपन्यांना एवढे भरभरून दिले...
3
Pune: पुणे रेल्वे स्थानकाजवळील महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना, तरुणाला अटक!
4
अलिबागजवळ अरबी समुद्रात संशयित बोट; पोलिसांनी बोटीकडे जाण्याचा प्रयत्न केला, पण...
5
पगार आला की गायब होतोय? महिन्याच्या शेवटी खिसा रिकामा राहतोय? या सवयींनी व्हाल श्रीमंत
6
Viral Video : असं कोण करतं रे... भर मांडवात नवरदेवाला आडवा पाडला; एवढा गदारोळ कशासाठी? बघाच 
7
१० मिनिटांत डिलिव्हरी हाच मोठा स्कॅम! एक्सपायरी झालेले प्रॉडक्ट, तुटलेले बॅडमिंटन रॅकेट; हातात देतात आणि पळतात...
8
IND vs ENG 2nd Test: भारताच्या ऐतिहासिक विजयाचं श्रेय कुणाला? विराट कोहली म्हणाला...
9
"माझी बहीण १६ वर्षांनी लहान आहे, पण मी तिचं..." रश्मिका मंदानाने व्यक्त केली खंत
10
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
11
भारतीयांसाठी आनंदाची बातमी! 'युएई'ने सुरू केला विशेष व्हिसा; काय आहे संपूर्ण प्रक्रिया? जाणून घ्या
12
आणखी एक सोनम रघुवंशी! आसिफच्या प्रेमात पडलेल्या दिशानं नवऱ्याला संपवलं, बेडवरच घेतला जीव
13
FD-RD विसरून जाल, LIC ची ही 'कन्यादान' स्कीम आहे जबरदस्त; मुलीच्या लग्नाच्या वेळी मिळतील २७ लाख
14
"मराठी बोलत नाही, दम असेल तर...", भोजपुरी अभिनेत्याचं थेट राज ठाकरेंना चॅलेंज
15
ढोंगी पाकिस्तान! ज्या सैनिकाला ओळखही दाखवायला तयार नव्हते, त्यालाच दिला शहीदाचा दर्जा; आता म्हणतात... 
16
ट्रम्प ठरवणार आज शेअर बाजारात काय होणार?
17
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
18
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
19
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
20
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...

पावसाचा परतीचा प्रवास आणखी लांबणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:35 IST

रत्नागिरी : गेल्या काही वर्षांत पावसाच्या परतीचा प्रवास विलंबाने हाेत आहे. पावसाचा राजस्थानमधून परतीचा प्रवास सुरू झाल्यानंतर महाराष्ट्रातून परतीचा ...

रत्नागिरी : गेल्या काही वर्षांत पावसाच्या परतीचा प्रवास विलंबाने हाेत आहे. पावसाचा राजस्थानमधून परतीचा प्रवास सुरू झाल्यानंतर महाराष्ट्रातून परतीचा प्रवास सुरू हाेताे. मात्र, राजस्थानमध्ये अद्याप परतीच्या प्रवासासाठी पाेषक स्थिती नसल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील पावसाचा परतीचा प्रवास आणखी लांबण्याची शक्यता आहे.

पावसाचे आगमन आणि परतीच्या वेळा ठरविण्यासाठी गेल्यावर्षीपासून हवामान विभागाने नवीन वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार पावसाची संपूर्ण देशातील परतीची सर्वसाधारण तारीख १५ ऑक्टोबर आहे, तर हवामान विभागाने १७ सप्टेंबर ही पावसाची राजस्थानातून परतीची नवीन सर्वसाधारण तारीख निश्चित केली हाेती. यापूर्वी राजस्थानातून परतीची तारीख १ सप्टेंबर ठरविण्यात आली होती. मात्र, अद्यापही या भागात परतीच्या प्रवासासाठी पाेषक वातावरण तयार झालेले नाही.

गेल्या दहा वर्षांतील राजस्थानमधील पावसाच्या परतीची वाटचाल पाहता, २०११ मध्ये २३ सप्टेंबर रोजी परतीचा प्रवास सुरू झाला हाेता. त्यानंतर २०१२ मध्ये २४ सप्टेंबर, तर २०१४ मध्ये २३ सप्टेंबर राेजी परतीचा प्रवास सुरू झाला हाेता. २०१७ पासून सातत्याने सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस पावसाचा परतीचा प्रवास सुरू हाेत आहे. २०१९ मध्ये आजपर्यंतच्या सर्वात उशिराने म्हणजेच ९ ऑक्टोबर रोजी परतीचा प्रवास सुरू झाला होता.

राजस्थानमधून परतीचा प्रवास सुरू झाल्यानंतर भारतातील इतर भागात परतीच्या प्रवासाला सुरुवात हाेते. चालू माेसमात नैऋत्य मोसमी वाऱ्याच्या राजस्थानातून माघारी परतण्यास अद्यापही पोषक स्थिती नाही. राजस्थान, पंजाब, हरियाणा, चंडीगढ, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश असा परतीचा प्रवास सुरू हाेताे. त्यानंतर महाराष्ट्रातून पावसाच्या परतीला सुरुवात हाेते. मात्र, राजस्थानमधून उशिराने परतीचा प्रवास सुरू हाेणार असल्याने महाराष्ट्रातूनही पावसाचा परतीचा प्रवास उशिराने सुरू हाेणार आहे.

----------------

गेल्या दहा वर्षांतील वायव्य भारतातून परतीचा प्रवास

२०११ : २३ सप्टेंबर

२०१२ : २४ सप्टेंबर

२०१३ : ९ सप्टेंबर

२०१४ : २३ सप्टेंबर

२०१५ : ४ सप्टेंबर

२०१६ : १५ सप्टेंबर

२०१७ : २७ सप्टेंबर

२०१८ : २९ सप्टेंबर

२०१९ : ९ ऑक्टोबर

२०२० : २८ सप्टेंबर