शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
3
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
4
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
5
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
6
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
7
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
8
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
9
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
10
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
11
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
12
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
13
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
14
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
15
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
16
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
17
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
18
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
19
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
20
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   

सायबाच्या धरणाचा अहवाल शासनाला सादर

By admin | Updated: September 11, 2016 23:18 IST

राजापूरची पाणीटंचाई मिटणार : दहा कोटींचा खर्च अपेक्षित

 राजापूर : गेली १३८ वर्षे राजापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सायबाच्या धरणाची पाहणी करून तयार केलेला संयुक्त अहवाल राज्याच्या नगरविकास मंत्रालयाकडे पाठवण्यात आला असून, त्यानुसार सध्याच्या धरणाच्या जागी पंधरा हेक्टर जमीन क्षेत्रात दीडशे मीटर लांब व पंधरा मीटर उंच मातीचे धरण आवश्यक असल्याची नोंद करण्यात आली आहे, त्यासाठी दहा कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. गेली अनेक वर्षे राजापूर शहराला ब्रिटिशकालीन धरणातून नैसर्गिक दाबाने पाणीपुरवठा होत आहे. सायबाचे धरण अशीही त्याची ओळख आहे. धरणाला गळती लागल्याने कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. दरवर्षी साधारणपणे दहा महिने शहराला पाणीपुरवठा करताना अडचणी येत नाहीत. सन २०११च्या जनगणनेनुसार राजापूर शहराची लोकसंख्या नऊ हजार सातशे त्रेपन्न एवढी आहे. पुढील पंधरा वर्षांचे नियोजन करता या शहराची लोकसंख्या पंधरा हजारच्या घरात जाऊन पोहोचण्याची शक्यता गृहीत धरता १३५ लीटर प्रतिव्यक्ती व प्रकल्पातील लिकेजीस आणि लॉसेस लक्षात घेता २.४० दशलक्ष लीटर पाण्याची आवश्यकता लागेल. पावसाळावगळता दोनशे सत्तर दिवसांसाठी सहाशे छप्पन दशलक्ष लीटर एवढी पाण्याची गरज लागेल, याचा अंदाज घेऊनच धरणाबाबतचा तसा अहवाल सादर करण्यात आला आहे. शासनाच्या लघुपाटबंधारे व जीवन प्राधिकरण विभागाच्या वतीने संयुक्त अहवाल शासनाला सादर करण्यात आला आहे. नवीन धरणासाठी दहा कोटींचा निधी आवश्यक आहे. त्यामुळे भविष्यात राजापूर शहराला मुबलक प्रमाणात पाणी पुरवठा करणे शक्य होणार आहे. (प्रतिनिधी)