शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

सायबाच्या धरणाचा अहवाल शासनाला सादर

By admin | Updated: September 11, 2016 23:18 IST

राजापूरची पाणीटंचाई मिटणार : दहा कोटींचा खर्च अपेक्षित

 राजापूर : गेली १३८ वर्षे राजापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सायबाच्या धरणाची पाहणी करून तयार केलेला संयुक्त अहवाल राज्याच्या नगरविकास मंत्रालयाकडे पाठवण्यात आला असून, त्यानुसार सध्याच्या धरणाच्या जागी पंधरा हेक्टर जमीन क्षेत्रात दीडशे मीटर लांब व पंधरा मीटर उंच मातीचे धरण आवश्यक असल्याची नोंद करण्यात आली आहे, त्यासाठी दहा कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. गेली अनेक वर्षे राजापूर शहराला ब्रिटिशकालीन धरणातून नैसर्गिक दाबाने पाणीपुरवठा होत आहे. सायबाचे धरण अशीही त्याची ओळख आहे. धरणाला गळती लागल्याने कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. दरवर्षी साधारणपणे दहा महिने शहराला पाणीपुरवठा करताना अडचणी येत नाहीत. सन २०११च्या जनगणनेनुसार राजापूर शहराची लोकसंख्या नऊ हजार सातशे त्रेपन्न एवढी आहे. पुढील पंधरा वर्षांचे नियोजन करता या शहराची लोकसंख्या पंधरा हजारच्या घरात जाऊन पोहोचण्याची शक्यता गृहीत धरता १३५ लीटर प्रतिव्यक्ती व प्रकल्पातील लिकेजीस आणि लॉसेस लक्षात घेता २.४० दशलक्ष लीटर पाण्याची आवश्यकता लागेल. पावसाळावगळता दोनशे सत्तर दिवसांसाठी सहाशे छप्पन दशलक्ष लीटर एवढी पाण्याची गरज लागेल, याचा अंदाज घेऊनच धरणाबाबतचा तसा अहवाल सादर करण्यात आला आहे. शासनाच्या लघुपाटबंधारे व जीवन प्राधिकरण विभागाच्या वतीने संयुक्त अहवाल शासनाला सादर करण्यात आला आहे. नवीन धरणासाठी दहा कोटींचा निधी आवश्यक आहे. त्यामुळे भविष्यात राजापूर शहराला मुबलक प्रमाणात पाणी पुरवठा करणे शक्य होणार आहे. (प्रतिनिधी)