शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
3
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
4
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
5
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
6
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
7
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
8
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
9
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
10
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
11
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
12
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
13
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
14
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
15
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
16
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
17
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
18
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
19
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
20
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार

सायबाच्या धरणाचा अहवाल शासनाला सादर

By admin | Updated: September 11, 2016 23:18 IST

राजापूरची पाणीटंचाई मिटणार : दहा कोटींचा खर्च अपेक्षित

 राजापूर : गेली १३८ वर्षे राजापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सायबाच्या धरणाची पाहणी करून तयार केलेला संयुक्त अहवाल राज्याच्या नगरविकास मंत्रालयाकडे पाठवण्यात आला असून, त्यानुसार सध्याच्या धरणाच्या जागी पंधरा हेक्टर जमीन क्षेत्रात दीडशे मीटर लांब व पंधरा मीटर उंच मातीचे धरण आवश्यक असल्याची नोंद करण्यात आली आहे, त्यासाठी दहा कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. गेली अनेक वर्षे राजापूर शहराला ब्रिटिशकालीन धरणातून नैसर्गिक दाबाने पाणीपुरवठा होत आहे. सायबाचे धरण अशीही त्याची ओळख आहे. धरणाला गळती लागल्याने कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. दरवर्षी साधारणपणे दहा महिने शहराला पाणीपुरवठा करताना अडचणी येत नाहीत. सन २०११च्या जनगणनेनुसार राजापूर शहराची लोकसंख्या नऊ हजार सातशे त्रेपन्न एवढी आहे. पुढील पंधरा वर्षांचे नियोजन करता या शहराची लोकसंख्या पंधरा हजारच्या घरात जाऊन पोहोचण्याची शक्यता गृहीत धरता १३५ लीटर प्रतिव्यक्ती व प्रकल्पातील लिकेजीस आणि लॉसेस लक्षात घेता २.४० दशलक्ष लीटर पाण्याची आवश्यकता लागेल. पावसाळावगळता दोनशे सत्तर दिवसांसाठी सहाशे छप्पन दशलक्ष लीटर एवढी पाण्याची गरज लागेल, याचा अंदाज घेऊनच धरणाबाबतचा तसा अहवाल सादर करण्यात आला आहे. शासनाच्या लघुपाटबंधारे व जीवन प्राधिकरण विभागाच्या वतीने संयुक्त अहवाल शासनाला सादर करण्यात आला आहे. नवीन धरणासाठी दहा कोटींचा निधी आवश्यक आहे. त्यामुळे भविष्यात राजापूर शहराला मुबलक प्रमाणात पाणी पुरवठा करणे शक्य होणार आहे. (प्रतिनिधी)