शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

राहिलेले पंचनामे तत्काळ पूर्ण करण्यात येतील : डाॅ. बी. एन. पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:28 IST

रत्नागिरी : खेड व चिपळूण शहर तसेच चिपळूणच्या ग्रामीण भागात निर्माण झालेल्या पूरस्थितीच्या अनुषंगाने बाधित मालमत्तांचे पंचनामे पूर्ण करण्यात ...

रत्नागिरी : खेड व चिपळूण शहर तसेच चिपळूणच्या ग्रामीण भागात निर्माण झालेल्या पूरस्थितीच्या अनुषंगाने बाधित मालमत्तांचे पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत. ज्यांचे पंचनामे अद्यापही चुकून राहिले असतील, त्यांनी उपविभागीय अधिकारी चिपळूण व खेड, तहसीलदार चिपळूण व खेड, मुख्याधिकारी नगर परिषद, चिपळूण व खेड यांच्याशी संपर्क साधून त्याबाबतची माहिती कळवावी. त्यांचे पंचनामे तत्काळ पूर्ण करण्यात येतील, असे आवाहन जिल्हाधिकारी डाॅ. बी. एन. पाटील यांनी केले आहे.

ज्या नागरिकांचे पुरामध्ये आधारकार्ड, पॅनकार्ड, बँक पासबुक गहाळ झाले असेल, अशा नागरिकांनी आपले खाते असलेल्या बँकेशी संपर्क साधून बँक खाते क्रमांक, पॅनकार्ड, आधारकार्ड क्रमांक उपलब्ध करुन द्यावा तसेच त्याच्या छायाप्रती उपलब्ध झाल्यास त्या प्राप्त करुन घेत संबंधित तहसीलदार यांच्याकडे जमा कराव्यात, जेणेकरुन त्यांना तत्काळ मदत करणे सोयीचे होईल तसेच ई-आधारकार्ड मिळवणे सुलभ होईल. सर्व बाधित नागरिकांना उपलब्ध मदत पुरविण्यात आली आहे तथापि कोणतेही नागरिक मदतीपासून वंचित असल्यास खालील क्रमांकावर अथवा याठिकाणी संपर्क साधल्यास त्यांना तत्काळ मदत पोहोच करण्याची व्यवस्था करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी डाॅ. बी. एन. पाटील यांनी कळविले आहे.

यासाठी श्रीमती लक्ष्मीबाई माटे सभागृह, कापसाळ, ता. चिपळूण (संजय कांबळे, नायब तहसीलदार ०९४०३५६५२९४, अक्षय कारंडे ८६००६५३५१८), पाटीदार भवन, कापसाळ, ता. चिपळूण (चंदन जाधव ९२७३०१८८६८, मिलिंद नानल ८०८७३३३८६४) यांच्याकडे संपर्क करावा.

तसेच सर्व विमा कंपन्यांनी बाधित नागरिकांच्या विम्याचे दावे संबंधित पंचनामे पूर्ण करुन विम्याची रक्कम तत्काळ अदा करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी दिल्या आहेत.