शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

पंधरामाड ग्रामस्थांचा स्थलांतराला नकार

By admin | Updated: July 10, 2016 01:44 IST

समुद्राला उधाण : स्थलांतर नको, बंधारा बांधून द्या

रत्नागिरी : समुद्राच्या उधाणामुळे भीतीच्या सावटाखाली असलेल्या पंधरामाड येथील १४ कुटुबांनी स्थलांतराच्या नोटीसला केराची टोपली दाखवली आहे. स्थलांतर करणार नाही, असा चंग पंधरामाड येथील या कुटुंबियांनी केला आहे. यावर स्थलांतर हा पर्याय नव्हे तर बंधारा बांधा, अशी मागणी येथील नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे.मुरूगवाडा, पंधरामाड परिसरातील नागरिकांचे प्रशासनाच्या मदतीअभावी हाल होत आहेत. या परिसरातील चौदा कुटुंबांना स्थलांतराची नोटीस बजावण्यात आली होती. परंतु, त्यांना पर्यायी जागा उपलब्ध न करताच स्थलांतरीत होण्याची नोटीस पाठविण्यात आली आहे. अमावस्येचा उधाणाने जिल्ह्यातील किनारपट्टीलगतच्या भागाला समुद्री लाटांचा चांगलाच तडाखा बसला होता. याचा सर्वाधिक फटका मिऱ्या, काळबादेवी, मुरूगवाडा व पंधरामाड या परिसराला बसला. त्यामुळे येथील धूपप्रतिबंधक बंधारा समुद्राच्या लाटांनी पूर्णपणे गिळंकृत केला.समुद्रातील पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने पंधरामाड येथील घरांना सर्वाधिक धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे महसूल अधिकाऱ्यांनी या परिसराची पाहणी करुन मुरूगवाडा व पंधरामाड येथील १४ कुटुंबांना स्थलांतराची नोटीस बजावली आहे.परंतु, या नोटीसला येथील नागरिकांनी केराची टोपली दाखवत स्थलांतराला विरोध केला आहे. यापुढेही दर्श अमावस्या, पोर्णिमेची भरती, आदी उधाणांचा सामना या नागरिकांना करावा लागणार आहे. त्यामुळे स्थलांतर हा यावर पर्याय नसल्याचे येथील नागरिकांचे मत आहे. प्रशासनाने याठिकाणी बंधारा बांधावा, अशी मागणी करण्यात येत आहे. येथील बहुतांशी कुटुंबे ही रापणीतून मिळणाऱ्या मासेमारीवर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यामुळे येथून स्थलांतर करून काय करणार? असा प्रश्न नागरिकांनी प्रशासनाला केला आहे. स्थलांतरासाठी पर्यायी जागाही उपलब्ध करुन दिलेली नाही. त्यामुळे येथून स्थलांतर करणार नाही, असा इशारा आपदग्रस्त १४ कुटुंबांनी दिला आहे. (वार्ताहर)