शहरं
Join us  
Trending Stories
1
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
2
कहानी में कुछ तो गडबड हैं! काँग्रेसचे राज ठाकरेंना ‘नो ऑब्जेक्शन’; उद्धवसेनेचा मार्ग मोकळा?
3
Himachal Pradesh Cloudburst : हिमाचलमध्ये पावसाचा कहर, किन्नौरमध्ये ढगफुटी; घरे आणि गाड्या गेल्या वाहून, ३२५ रस्ते बंद
4
मुंबई ते लंडन... लवकरच बोहल्यावर चढणाऱ्या अर्जुन तेंडुलकरची संपत्ती किती? तुमचाही विश्वास नाही बसणार
5
Bitcoin नं तोडले सर्व विक्रम; सोनं-चांदी सोडून क्रिप्टोकडे पळाले गुंतवणुकदार
6
अर्जुन तेंडुुलकरची होणारी बायको सानिया चांडोक काय करते? तिचा व्यवसाय कोणता? जाणून घ्या
7
"पुतिन यांनी युक्रेन युद्ध थांबवलं नाही तर...!"; महत्वाच्या बैठकीपूर्वीच ट्रम्प यांची रशियाला खुली धमकी!
8
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
9
ICICI बँकेचा यु-टर्न; अकाऊंटमध्ये ५० हजार रुपये नाही तर 'इतकी' रक्कम ठेवावी लागणार
10
इन्फोसिसचा ऑस्ट्रेलियात मोठा व्यवहार! १३०० कोटी रुपयांमध्ये खरेदी केली 'ही' कंपनी
11
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताची मिसाईल ताकद पाहून घाबरला पाकिस्तान; आता उचललं 'हे' मोठं पाऊल!
12
७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही...
13
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
14
Viral Video : काय म्हणावं यांना! लाबुबू डॉलची पूजा करू लागली महिला, म्हणाली "ही बाहुली नाही, तर..."
15
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २४,६०० च्या वर, IT-फार्मा शेअर्समध्ये मोठी खरेदी
16
राष्ट्रवादीमध्ये नव्या 'दादां'चा उदय! रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढत आहेत का?
17
'फुले' सिनेमाच्या अपयशावर प्रतीक गांधीने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "जितकी अपेक्षा..."
18
पाकिस्तानचं स्वातंत्र्यदिनी हे कसलं सेलिब्रेशन... हवेत गोळीबार, तिघांचा मृत्यू, ६० जखमी
19
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
20
शिल्पा शिरोडकरच्या कारला बसची धडक, अभिनेत्रीने केली तक्रार; तर बस मालकांनी केली अरेरावी

पंधरामाड ग्रामस्थांचा स्थलांतराला नकार

By admin | Updated: July 10, 2016 01:44 IST

समुद्राला उधाण : स्थलांतर नको, बंधारा बांधून द्या

रत्नागिरी : समुद्राच्या उधाणामुळे भीतीच्या सावटाखाली असलेल्या पंधरामाड येथील १४ कुटुबांनी स्थलांतराच्या नोटीसला केराची टोपली दाखवली आहे. स्थलांतर करणार नाही, असा चंग पंधरामाड येथील या कुटुंबियांनी केला आहे. यावर स्थलांतर हा पर्याय नव्हे तर बंधारा बांधा, अशी मागणी येथील नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे.मुरूगवाडा, पंधरामाड परिसरातील नागरिकांचे प्रशासनाच्या मदतीअभावी हाल होत आहेत. या परिसरातील चौदा कुटुंबांना स्थलांतराची नोटीस बजावण्यात आली होती. परंतु, त्यांना पर्यायी जागा उपलब्ध न करताच स्थलांतरीत होण्याची नोटीस पाठविण्यात आली आहे. अमावस्येचा उधाणाने जिल्ह्यातील किनारपट्टीलगतच्या भागाला समुद्री लाटांचा चांगलाच तडाखा बसला होता. याचा सर्वाधिक फटका मिऱ्या, काळबादेवी, मुरूगवाडा व पंधरामाड या परिसराला बसला. त्यामुळे येथील धूपप्रतिबंधक बंधारा समुद्राच्या लाटांनी पूर्णपणे गिळंकृत केला.समुद्रातील पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने पंधरामाड येथील घरांना सर्वाधिक धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे महसूल अधिकाऱ्यांनी या परिसराची पाहणी करुन मुरूगवाडा व पंधरामाड येथील १४ कुटुंबांना स्थलांतराची नोटीस बजावली आहे.परंतु, या नोटीसला येथील नागरिकांनी केराची टोपली दाखवत स्थलांतराला विरोध केला आहे. यापुढेही दर्श अमावस्या, पोर्णिमेची भरती, आदी उधाणांचा सामना या नागरिकांना करावा लागणार आहे. त्यामुळे स्थलांतर हा यावर पर्याय नसल्याचे येथील नागरिकांचे मत आहे. प्रशासनाने याठिकाणी बंधारा बांधावा, अशी मागणी करण्यात येत आहे. येथील बहुतांशी कुटुंबे ही रापणीतून मिळणाऱ्या मासेमारीवर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यामुळे येथून स्थलांतर करून काय करणार? असा प्रश्न नागरिकांनी प्रशासनाला केला आहे. स्थलांतरासाठी पर्यायी जागाही उपलब्ध करुन दिलेली नाही. त्यामुळे येथून स्थलांतर करणार नाही, असा इशारा आपदग्रस्त १४ कुटुंबांनी दिला आहे. (वार्ताहर)