शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

रिफायनरी राजापूरवासीयांच्या मदतीलाही धावेल : पंढरीनाथ आंबेरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:33 IST

राजापूर : खोट्या पर्यावरणवाद्यांच्या जहरी प्रचाराला भुलून आपण औद्योगिक प्रकल्पांना कायम विरोध करत राहिलो आणि त्यामुळेच आज आपला तालुका ...

राजापूर

: खोट्या पर्यावरणवाद्यांच्या जहरी प्रचाराला भुलून आपण औद्योगिक प्रकल्पांना कायम विरोध करत राहिलो आणि त्यामुळेच आज आपला तालुका अद्ययावत आरोग्य सेवेपासून वंचित राहिला आहे. कोरोना महामारीत वेळेत ऑक्सिजन बेड, आयसीयू सुविधा न मिळाल्याने राजापुरातील अनेकांना जीव गमवावा लागला आहे. तालुक्यातील जनतेने मागणी केल्यास, ग्रामपंचायतींनी पुढाकार घेतल्यास रिफायनरी प्रकल्प कंपन्या आजही तालुक्यात ऑक्सिजन प्लांट, आयसीयू सुविधा पुरवतील, असे आवाहन पंढरीनाथ आंबेरकर यांनी केले आहे.

राजापूर तालुक्यात ९ प्राथमिक आरोग्य केंद्रे, ४२ उपकेंद्रे व २ ग्रामीण रुग्णालये आहेत. मात्र, अनेक ठिकाणी तज्ज्ञ डाॅक्टर, परिचारिका तसेच अन्य कर्मचारी नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागातील केंद्रे बंद अथवा अत्यंत अल्प काळाकरता चालू अवस्थेत आहेत. साधी रक्त तपासणी, एक्स-रे, सोनोग्राफी यासाठी आपल्याला तालुका मुख्यालय गाठावे लागते. हृदयविकाराचा झटका आलेल्या व्यक्तींना सुद्धा वेळेत रुग्णवाहिका मिळत नाही. गंभीर रुग्ण तर जिल्हा रुग्णालयात पोहोचेपर्यंत आपले प्राण गमावतात. आज कोरोना महामारीच्या काळात तर तालुक्याची अवस्था फार बिकट झाली आहे. ऑक्सिजन बेड, आयसीयू नसल्याने अनेकांना जीव गमवावा लागला आहे. कोरोना महामारीत रुग्णांना अत्यावश्यक असणाऱ्या ऑक्सिजनचा पुरवठा आज भारतातील मोठमोठे उद्योग करत आहेत. स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया, टाटा, रिलायन्स व मुख्यत्वे रिफायनरीकडून हा ऑक्सिजनचा पुरवठा रुग्णांना होत आहे. केरळ, गुजरातमधील रिफायनरी तेथील स्थानिक सरकारी इस्पितळांना हा पुरवठा प्राधान्याने करत आहेत.

खोट्या पर्यावरणवाद्यांच्या जहरी प्रचाराला भुलून आपण मात्र अशा औद्योगिक प्रकल्पांना कायम विरोध करत राहिलो. हे पर्यावरणवादी आज या कठीणप्रसंगी लपून बसले आहेत, असे त्यांनी म्हटले आहे़

राजापूर तालुक्यात रत्नागिरी रिफायनरीची घोषणा झाल्यावर जिल्हाधिकारी कार्यालयात सन २०१८च्या अखेरीस झालेल्या एका बैठकीमध्ये तालुक्यातील सर्व ग्रामीण रुग्णालये, आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे येथे संपूर्ण वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याचे रिफायनरीतर्फे मान्य करण्यात आले होते. लगेचच जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांसोबत बैठका होऊन त्यावर कार्यवाही सुरू करण्यात आली. मात्र, आपल्या दुर्दैवाने लगेचच त्याच्या पुढील महिन्यात रिफायनरीची अधिसूचना रद्द झाली व संबंधित सर्व प्रस्ताव बारगळला.

रिफायनरी प्रकल्पाला विरोध केला नसता तर आज ज्या सुविधा आपण रायपाटण कोविड सेंटरकरिता जमवाजमव करीत आहोत, त्या सर्व राजापूर तालुक्यातील सर्व आरोग्य केंद्रांमध्ये उपलब्ध असत्या, असे पंढरीनाथ आंबेरकर यांनी म्हटले आहे.