शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

राजापूरच्या सर्वांगीण विकासासाठी रिफायनरीचे स्वागत करायला हवे : प्रभाकर शिर्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:21 IST

राजापूर : महाराष्ट्रातील इतर शहरांचा विकास झपाट्याने होत असताना राजापूर शहर तसेच तालुक्यातील ग्रामीण भागातील गावांचा विकास का झाला ...

राजापूर : महाराष्ट्रातील इतर शहरांचा विकास झपाट्याने होत असताना राजापूर शहर तसेच तालुक्यातील ग्रामीण भागातील गावांचा विकास का झाला नाही याचा विचार होणे गरजेचे आहे. राजापूर शहर आणि तालुक्याला आलेली अवकळा दूर करायची असेल तर तालुक्यातील प्रस्तावित प्रकल्प मार्गी लागणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्व राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मतभेद विसरून संघटितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे मत बारसू येथील ज्येष्ठ ग्रामस्थ प्रभाकर शिर्के यांनी व्यक्त केले.

प्रसारमाध्यमांशी बाेलताना ते म्हणाले की, सागरी महामार्ग झाल्यापासून राजापुरातील नाटे, जैतापूर पंचक्रोशीतील सर्व रहिवासी आपल्या गरजा भागविण्यासाठी रत्नागिरी शहरात जात आवश्यक सामान खरेदी करीत आहेत. राजापुरात फक्त शासकीय कामासाठीच त्यांचे येणे-जाणे सुरू आहे. हेच पूर्वी राजापूरच्या बाजारपेठेत यायचे आज येत नसल्याने याचा राजापूर बाजारपेठेला आर्थिक फटका बसला आहे. दुसरीकडे कोकण रेल्वे शहरातून जाण्याऐवजी १६ किलाेमीटर दूरवरून जात आहे. सध्या असलेले रेल्वे स्टेशन शहरात किंवा जवळ नसल्यामुळे प्रवासीच नव्हे तर मालवाहतुकीसाठी गैरसोयीचे झाले आहे. मुंबई-गोवा महामार्ग जो शहराच्या वेशीवरून जातो. त्याचा बाजारपेठेला फायदा होत नाही. पूर्वी जैतापूरचे मुसाकाझी ते राजापूर बाजारपेठ असा जलमार्ग होता. प्रवासी व मालवाहतूक या मार्गे होत असे ती बंद झाल्यामुळे व्यापार उदिमास उतरती कळा आली.

अलीकडच्या काळात राजापुरात एकही नवा प्रकल्प झालेला नाही. त्यामुळे वस्ती तर वाढली नाहीच; पण येथील तरुण रोजगारासाठी मुंबईला व अन्य शहरांत धाव घेत आहेत. अशा परिस्थितीत राजापूर शहराचा विकास होणे शक्यच नाही. मनापासून राजापूरचा विकास व्हावा, असे वाटत असल्यास या सर्व बाबींवर मात करण्यासाठी एकच पर्याय आहे. तो म्हणजे बारसू, सोलगाव भागातील प्रकल्प मार्गी लावणे. हा प्रकल्प झाल्यास राजापूर शहराचाच नव्हे तर संपूर्ण तालुक्याचा विकास होणे शक्य होईल व राजापूरचा स्मार्ट सिटीच्या कक्षेत समावेश होईल. प्रकल्पामुळे रस्ते, आरोग्यसेवा, विद्यालये, अखंड वीजपुरवठा, रोजगार, ग्रीन बेल्टसाठी होणारी अतिरिक्त लागवड अशा अनेक सुविधा उपलब्ध होतील, असे शिर्के यांनी म्हटले आहे.