शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

राजापूरच्या सर्वांगीण विकासासाठी रिफायनरीचे स्वागत करायला हवे : प्रभाकर शिर्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:21 IST

राजापूर : महाराष्ट्रातील इतर शहरांचा विकास झपाट्याने होत असताना राजापूर शहर तसेच तालुक्यातील ग्रामीण भागातील गावांचा विकास का झाला ...

राजापूर : महाराष्ट्रातील इतर शहरांचा विकास झपाट्याने होत असताना राजापूर शहर तसेच तालुक्यातील ग्रामीण भागातील गावांचा विकास का झाला नाही याचा विचार होणे गरजेचे आहे. राजापूर शहर आणि तालुक्याला आलेली अवकळा दूर करायची असेल तर तालुक्यातील प्रस्तावित प्रकल्प मार्गी लागणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्व राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मतभेद विसरून संघटितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे मत बारसू येथील ज्येष्ठ ग्रामस्थ प्रभाकर शिर्के यांनी व्यक्त केले.

प्रसारमाध्यमांशी बाेलताना ते म्हणाले की, सागरी महामार्ग झाल्यापासून राजापुरातील नाटे, जैतापूर पंचक्रोशीतील सर्व रहिवासी आपल्या गरजा भागविण्यासाठी रत्नागिरी शहरात जात आवश्यक सामान खरेदी करीत आहेत. राजापुरात फक्त शासकीय कामासाठीच त्यांचे येणे-जाणे सुरू आहे. हेच पूर्वी राजापूरच्या बाजारपेठेत यायचे आज येत नसल्याने याचा राजापूर बाजारपेठेला आर्थिक फटका बसला आहे. दुसरीकडे कोकण रेल्वे शहरातून जाण्याऐवजी १६ किलाेमीटर दूरवरून जात आहे. सध्या असलेले रेल्वे स्टेशन शहरात किंवा जवळ नसल्यामुळे प्रवासीच नव्हे तर मालवाहतुकीसाठी गैरसोयीचे झाले आहे. मुंबई-गोवा महामार्ग जो शहराच्या वेशीवरून जातो. त्याचा बाजारपेठेला फायदा होत नाही. पूर्वी जैतापूरचे मुसाकाझी ते राजापूर बाजारपेठ असा जलमार्ग होता. प्रवासी व मालवाहतूक या मार्गे होत असे ती बंद झाल्यामुळे व्यापार उदिमास उतरती कळा आली.

अलीकडच्या काळात राजापुरात एकही नवा प्रकल्प झालेला नाही. त्यामुळे वस्ती तर वाढली नाहीच; पण येथील तरुण रोजगारासाठी मुंबईला व अन्य शहरांत धाव घेत आहेत. अशा परिस्थितीत राजापूर शहराचा विकास होणे शक्यच नाही. मनापासून राजापूरचा विकास व्हावा, असे वाटत असल्यास या सर्व बाबींवर मात करण्यासाठी एकच पर्याय आहे. तो म्हणजे बारसू, सोलगाव भागातील प्रकल्प मार्गी लावणे. हा प्रकल्प झाल्यास राजापूर शहराचाच नव्हे तर संपूर्ण तालुक्याचा विकास होणे शक्य होईल व राजापूरचा स्मार्ट सिटीच्या कक्षेत समावेश होईल. प्रकल्पामुळे रस्ते, आरोग्यसेवा, विद्यालये, अखंड वीजपुरवठा, रोजगार, ग्रीन बेल्टसाठी होणारी अतिरिक्त लागवड अशा अनेक सुविधा उपलब्ध होतील, असे शिर्के यांनी म्हटले आहे.