शहरं
Join us  
Trending Stories
1
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठ्या पर्वाचा अंत; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
2
अरे देवा! मृताच्या कुटुंबाला ६ लाखांची मदत जाहीर; ६ महिला म्हणतात, "मीच यांची खरी बायको..."
3
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
4
'अमेरिका स्वतः रशियन तेल खरेदीची परवानगी देते; हा ढोंगीपणा...' भारतीय कंपन्यांनी केली पोलखोल
5
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
6
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
7
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
8
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
9
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
10
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
11
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
12
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
13
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
14
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष
15
AUS vs SA: टॉस जिंकून ऑस्ट्रेलियन कर्णधारानं पहिल्यांदाच घेतला 'असा' निर्णय!
16
तुमच्या नोकऱ्यांचा एआय शत्रू आहे का?
17
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
18
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
19
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
20
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?

राजापूरच्या सर्वांगीण विकासासाठी रिफायनरीचे स्वागत करायला हवे : प्रभाकर शिर्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:21 IST

राजापूर : महाराष्ट्रातील इतर शहरांचा विकास झपाट्याने होत असताना राजापूर शहर तसेच तालुक्यातील ग्रामीण भागातील गावांचा विकास का झाला ...

राजापूर : महाराष्ट्रातील इतर शहरांचा विकास झपाट्याने होत असताना राजापूर शहर तसेच तालुक्यातील ग्रामीण भागातील गावांचा विकास का झाला नाही याचा विचार होणे गरजेचे आहे. राजापूर शहर आणि तालुक्याला आलेली अवकळा दूर करायची असेल तर तालुक्यातील प्रस्तावित प्रकल्प मार्गी लागणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्व राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मतभेद विसरून संघटितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे मत बारसू येथील ज्येष्ठ ग्रामस्थ प्रभाकर शिर्के यांनी व्यक्त केले.

प्रसारमाध्यमांशी बाेलताना ते म्हणाले की, सागरी महामार्ग झाल्यापासून राजापुरातील नाटे, जैतापूर पंचक्रोशीतील सर्व रहिवासी आपल्या गरजा भागविण्यासाठी रत्नागिरी शहरात जात आवश्यक सामान खरेदी करीत आहेत. राजापुरात फक्त शासकीय कामासाठीच त्यांचे येणे-जाणे सुरू आहे. हेच पूर्वी राजापूरच्या बाजारपेठेत यायचे आज येत नसल्याने याचा राजापूर बाजारपेठेला आर्थिक फटका बसला आहे. दुसरीकडे कोकण रेल्वे शहरातून जाण्याऐवजी १६ किलाेमीटर दूरवरून जात आहे. सध्या असलेले रेल्वे स्टेशन शहरात किंवा जवळ नसल्यामुळे प्रवासीच नव्हे तर मालवाहतुकीसाठी गैरसोयीचे झाले आहे. मुंबई-गोवा महामार्ग जो शहराच्या वेशीवरून जातो. त्याचा बाजारपेठेला फायदा होत नाही. पूर्वी जैतापूरचे मुसाकाझी ते राजापूर बाजारपेठ असा जलमार्ग होता. प्रवासी व मालवाहतूक या मार्गे होत असे ती बंद झाल्यामुळे व्यापार उदिमास उतरती कळा आली.

अलीकडच्या काळात राजापुरात एकही नवा प्रकल्प झालेला नाही. त्यामुळे वस्ती तर वाढली नाहीच; पण येथील तरुण रोजगारासाठी मुंबईला व अन्य शहरांत धाव घेत आहेत. अशा परिस्थितीत राजापूर शहराचा विकास होणे शक्यच नाही. मनापासून राजापूरचा विकास व्हावा, असे वाटत असल्यास या सर्व बाबींवर मात करण्यासाठी एकच पर्याय आहे. तो म्हणजे बारसू, सोलगाव भागातील प्रकल्प मार्गी लावणे. हा प्रकल्प झाल्यास राजापूर शहराचाच नव्हे तर संपूर्ण तालुक्याचा विकास होणे शक्य होईल व राजापूरचा स्मार्ट सिटीच्या कक्षेत समावेश होईल. प्रकल्पामुळे रस्ते, आरोग्यसेवा, विद्यालये, अखंड वीजपुरवठा, रोजगार, ग्रीन बेल्टसाठी होणारी अतिरिक्त लागवड अशा अनेक सुविधा उपलब्ध होतील, असे शिर्के यांनी म्हटले आहे.