शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
3
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
4
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
5
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
6
नाशिकचे बडगुजर अखेर भाजपमध्ये; बावनकुळे यांनी केले स्वागत!
7
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
8
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
9
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
10
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!
11
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
12
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
13
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
14
पती, सासरच्या लोकांवर निराधार लैंगिक आरोप करणे हे मानसिक क्रौर्य: उच्च न्यायालय
15
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
16
आर्थिक कारणांमुळे 'वेलकम टू द जंगल' सिनेमाचं शूट रखडलं? समोर आलं खरं कारण
17
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
18
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
19
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज

राजापूरच्या सर्वांगीण विकासासाठी रिफायनरीचे स्वागत करायला हवे : प्रभाकर शिर्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:21 IST

राजापूर : महाराष्ट्रातील इतर शहरांचा विकास झपाट्याने होत असताना राजापूर शहर तसेच तालुक्यातील ग्रामीण भागातील गावांचा विकास का झाला ...

राजापूर : महाराष्ट्रातील इतर शहरांचा विकास झपाट्याने होत असताना राजापूर शहर तसेच तालुक्यातील ग्रामीण भागातील गावांचा विकास का झाला नाही याचा विचार होणे गरजेचे आहे. राजापूर शहर आणि तालुक्याला आलेली अवकळा दूर करायची असेल तर तालुक्यातील प्रस्तावित प्रकल्प मार्गी लागणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्व राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मतभेद विसरून संघटितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे मत बारसू येथील ज्येष्ठ ग्रामस्थ प्रभाकर शिर्के यांनी व्यक्त केले.

प्रसारमाध्यमांशी बाेलताना ते म्हणाले की, सागरी महामार्ग झाल्यापासून राजापुरातील नाटे, जैतापूर पंचक्रोशीतील सर्व रहिवासी आपल्या गरजा भागविण्यासाठी रत्नागिरी शहरात जात आवश्यक सामान खरेदी करीत आहेत. राजापुरात फक्त शासकीय कामासाठीच त्यांचे येणे-जाणे सुरू आहे. हेच पूर्वी राजापूरच्या बाजारपेठेत यायचे आज येत नसल्याने याचा राजापूर बाजारपेठेला आर्थिक फटका बसला आहे. दुसरीकडे कोकण रेल्वे शहरातून जाण्याऐवजी १६ किलाेमीटर दूरवरून जात आहे. सध्या असलेले रेल्वे स्टेशन शहरात किंवा जवळ नसल्यामुळे प्रवासीच नव्हे तर मालवाहतुकीसाठी गैरसोयीचे झाले आहे. मुंबई-गोवा महामार्ग जो शहराच्या वेशीवरून जातो. त्याचा बाजारपेठेला फायदा होत नाही. पूर्वी जैतापूरचे मुसाकाझी ते राजापूर बाजारपेठ असा जलमार्ग होता. प्रवासी व मालवाहतूक या मार्गे होत असे ती बंद झाल्यामुळे व्यापार उदिमास उतरती कळा आली.

अलीकडच्या काळात राजापुरात एकही नवा प्रकल्प झालेला नाही. त्यामुळे वस्ती तर वाढली नाहीच; पण येथील तरुण रोजगारासाठी मुंबईला व अन्य शहरांत धाव घेत आहेत. अशा परिस्थितीत राजापूर शहराचा विकास होणे शक्यच नाही. मनापासून राजापूरचा विकास व्हावा, असे वाटत असल्यास या सर्व बाबींवर मात करण्यासाठी एकच पर्याय आहे. तो म्हणजे बारसू, सोलगाव भागातील प्रकल्प मार्गी लावणे. हा प्रकल्प झाल्यास राजापूर शहराचाच नव्हे तर संपूर्ण तालुक्याचा विकास होणे शक्य होईल व राजापूरचा स्मार्ट सिटीच्या कक्षेत समावेश होईल. प्रकल्पामुळे रस्ते, आरोग्यसेवा, विद्यालये, अखंड वीजपुरवठा, रोजगार, ग्रीन बेल्टसाठी होणारी अतिरिक्त लागवड अशा अनेक सुविधा उपलब्ध होतील, असे शिर्के यांनी म्हटले आहे.