शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
4
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
6
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
7
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
8
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
9
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
10
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
11
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
12
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
13
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
15
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
16
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
17
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
18
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
19
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
20
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

सुधारित आराखड्यानुसारच रिफायनरी उभारावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:32 IST

राजापूर : रत्नागिरी ग्रीन रिफायनरी प्रकल्प राजापूर तालुक्यातच व्हायला हवा. विरोध करणाऱ्या चार वाड्या वगळून इतर गावांतील शेकडो भूमिपुत्रांनी ...

राजापूर :

रत्नागिरी ग्रीन रिफायनरी प्रकल्प राजापूर तालुक्यातच व्हायला हवा. विरोध करणाऱ्या चार वाड्या वगळून इतर गावांतील शेकडो भूमिपुत्रांनी आपल्या जमिनी या प्रकल्पासाठी देण्याची तयारी दाखवली आहे. प्रकल्पासाठी या परिसरातील स्थानिक शेतकऱ्यांनी सुमारे साडेआठ हजार एकर जमिनीची संमतीपत्रेही दिली आहेत. त्यामुळे शासनाने इतर जागांचा विचार न करता नाणार परिसरातील विरोध करणाऱ्या वाड्या वगळून त्याच ठिकाणी प्रकल्प उभारावा, अशी मागणी राजापूरचे माजी नगरसेवक विलास पेडणेकर यांनी केली आहे.

ज्या ठिकाणी जनतेचा विरोध नसेल त्या ठिकाणी रिफायनरी प्रकल्प उभारला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. त्या पार्श्वभूमीवर राजापूरचे माजी नगरसेवक विलास पेडणेकर पत्रकारांशी बोलत होते. आता या रिफायनरी प्रकल्पाला स्थानिक जनतेचा विरोध राहिलेला नसून, येथील स्थानिकांनी आपल्या जमिनी प्रकल्पाला देण्याची तयारी दर्शवली आहे. येथील जनकल्याण प्रतिष्ठाणच्या माध्यमातून जी साडेआठ हजार एकर जमिनीची संमतीपत्रे जमा करण्यात आली आहेत, त्यामध्ये परप्रांतीय जमीन खरेदीदार नसून, केवळ स्थानिक शेतकरीच आहेत.

खासदार विनायक राऊत हे या प्रकल्पाला स्थानिक जनतेचा विरोध असल्याचे भासवत आहेत. मग याच १४ गावांतील शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीची संमतीपत्रे प्रकल्पासाठी दिली आहेत. त्यामुळे त्या संमतीपत्रांची छाननी का करण्यात येत नाही, असा प्रश्नही त्यांनी केला.

ज्या शेतकऱ्यांनी संमतीपत्रे दिली आहेत, त्यांनी स्वतःचे ओळखपत्र सोबत जोडले व ते या प्रकल्पाच्या गॅझेटमधील सर्व्हे नंबरची आहेत. मग खासदार अशी दिशाभूल का करत आहेत? खरे तर येथील जनतेला हा प्रकल्प हवा आहे. त्यामुळे शासनाने तो याच ठिकाणी उभारावा, असेही ते म्हणाले. सध्या या प्रकल्पाला दत्तवाडी, पाळेकरवाडी अशा काही वाड्यांचा विरोध आहेत. नाणार गावातील काही शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी अगोदरच विकल्या आहेत. तेच या प्रकल्पाला विरोध करत आहेत. नव्याने तयार करण्यात आलेल्या आराखड्यात विरोध करणाऱ्या या वाड्या व गावे वगळण्यात आली आहेत. उर्वरित गावांतील जनतेला हा प्रकल्प हवा आहे. त्यामुळे शासनाने हा प्रकल्प नवीन आराखड्यानुसार उभारावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.