शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
2
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
5
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
6
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
7
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
8
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
9
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
10
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
11
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
12
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
13
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
14
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
15
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
16
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
17
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
18
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
19
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
20
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!

सुधारित आराखड्यानुसारच रिफायनरी उभारावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:32 IST

राजापूर : रत्नागिरी ग्रीन रिफायनरी प्रकल्प राजापूर तालुक्यातच व्हायला हवा. विरोध करणाऱ्या चार वाड्या वगळून इतर गावांतील शेकडो भूमिपुत्रांनी ...

राजापूर :

रत्नागिरी ग्रीन रिफायनरी प्रकल्प राजापूर तालुक्यातच व्हायला हवा. विरोध करणाऱ्या चार वाड्या वगळून इतर गावांतील शेकडो भूमिपुत्रांनी आपल्या जमिनी या प्रकल्पासाठी देण्याची तयारी दाखवली आहे. प्रकल्पासाठी या परिसरातील स्थानिक शेतकऱ्यांनी सुमारे साडेआठ हजार एकर जमिनीची संमतीपत्रेही दिली आहेत. त्यामुळे शासनाने इतर जागांचा विचार न करता नाणार परिसरातील विरोध करणाऱ्या वाड्या वगळून त्याच ठिकाणी प्रकल्प उभारावा, अशी मागणी राजापूरचे माजी नगरसेवक विलास पेडणेकर यांनी केली आहे.

ज्या ठिकाणी जनतेचा विरोध नसेल त्या ठिकाणी रिफायनरी प्रकल्प उभारला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. त्या पार्श्वभूमीवर राजापूरचे माजी नगरसेवक विलास पेडणेकर पत्रकारांशी बोलत होते. आता या रिफायनरी प्रकल्पाला स्थानिक जनतेचा विरोध राहिलेला नसून, येथील स्थानिकांनी आपल्या जमिनी प्रकल्पाला देण्याची तयारी दर्शवली आहे. येथील जनकल्याण प्रतिष्ठाणच्या माध्यमातून जी साडेआठ हजार एकर जमिनीची संमतीपत्रे जमा करण्यात आली आहेत, त्यामध्ये परप्रांतीय जमीन खरेदीदार नसून, केवळ स्थानिक शेतकरीच आहेत.

खासदार विनायक राऊत हे या प्रकल्पाला स्थानिक जनतेचा विरोध असल्याचे भासवत आहेत. मग याच १४ गावांतील शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीची संमतीपत्रे प्रकल्पासाठी दिली आहेत. त्यामुळे त्या संमतीपत्रांची छाननी का करण्यात येत नाही, असा प्रश्नही त्यांनी केला.

ज्या शेतकऱ्यांनी संमतीपत्रे दिली आहेत, त्यांनी स्वतःचे ओळखपत्र सोबत जोडले व ते या प्रकल्पाच्या गॅझेटमधील सर्व्हे नंबरची आहेत. मग खासदार अशी दिशाभूल का करत आहेत? खरे तर येथील जनतेला हा प्रकल्प हवा आहे. त्यामुळे शासनाने तो याच ठिकाणी उभारावा, असेही ते म्हणाले. सध्या या प्रकल्पाला दत्तवाडी, पाळेकरवाडी अशा काही वाड्यांचा विरोध आहेत. नाणार गावातील काही शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी अगोदरच विकल्या आहेत. तेच या प्रकल्पाला विरोध करत आहेत. नव्याने तयार करण्यात आलेल्या आराखड्यात विरोध करणाऱ्या या वाड्या व गावे वगळण्यात आली आहेत. उर्वरित गावांतील जनतेला हा प्रकल्प हवा आहे. त्यामुळे शासनाने हा प्रकल्प नवीन आराखड्यानुसार उभारावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.