शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
3
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
4
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
5
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
6
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
7
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
8
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
9
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
10
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
11
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
12
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
13
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
14
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
15
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
16
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
17
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
18
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
19
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
20
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?

रिफायनरी प्रकल्प समर्थनाचा ठराव स्वागतार्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:22 IST

राजापूर : प्रस्तावित ग्रीन रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन करून त्याच्या समर्थनार्थ राजापूर नगर परिषदेने केलेला ठराव आणि घेतलेली भूमिका निश्चितच ...

राजापूर : प्रस्तावित ग्रीन रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन करून त्याच्या समर्थनार्थ राजापूर नगर परिषदेने केलेला ठराव आणि घेतलेली भूमिका निश्चितच स्वागतार्ह आहे. शहर आणि तालुक्याच्या विकासाचा दूरदृष्टिकोन ठेवून नगर परिषदेतील सत्ताधारी काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीने हे उचललेले पाऊल निश्चितच भविष्यातील विकासाला नवी दिशा देणारे ठरेल, अशी प्रतिक्रिया ग्रीन रिफायनरी प्रकल्प समर्थन समन्वय समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. शशिकांत सुतार यांनी ‘लोकमत’ला दिली आहे. या प्रकल्पाच्या समर्थनाच्या ठरावावर रोखठोक मत प्रदर्शन करून ठरावाचे समर्थन करणाऱ्या शिवसेनेच्या त्या दोन्ही नगरसेविकाही तेवढ्याच कौतुकास पात्र असून, त्यांनी घेतलेली भूमिका ही विकासाची भूमिका आहे, त्याचे स्वागतच केले पाहिजे, असेही अ‍ॅड. सुतार यांनी नमूद केले.

राजापूर नगर परिषदेच्या मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत प्रस्तावित ग्रीन रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनार्थ ठराव मंजूर करण्यात आला आहे. याला शिवसेनेच्या प्रतीक्षा खडपे व मनीषा मराठे या दोन नगरसेविकांनी समर्थन दिले आहे. त्यामुळे याचे पडसाद आता उमटू लागले आहेत. या समर्थनाच्या भूमिकेचे सर्वत्र स्वागत होत असून, सुमारे ५० सामाजिक संस्था व प्रतिनिधींच्या ग्रीन रिफायनरी प्रकल्प समर्थन समन्वय समितीच्या वतीने समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. सुतार यांनी स्वागत केले आहे.

या प्रकल्पामुळे होणारे फायदे, विकासात्मक प्रगती आणि भविष्यातील दिशा ओळखून नगराध्यक्ष अ‍ॅड. जमीर खलिफे आणि त्यांच्या सहकारी नगरसेवकांनी घेतलेली भूमिका ही कौतुकास्पद आहे. शहर आणि तालुक्याचा विकास हाच दृष्टिकोन ठेवून त्यांनी हे पाऊल उचलले असून, हेच खरे लोकप्रतिनिधींचे काम आहे. विरोधाला विरोध आणि सोयीच्या भूमिका न घेता प्रत्यक्षात एखाद्या प्रकल्पाबाबत परिपूर्ण माहिती घेऊन त्यापासून होणाऱ्या क्रांतिकारी बदलाला आणि जनतेच्या मताला महत्त्व देऊन लोकप्रतिनिधींनी निर्णय घ्यावयाचे असतात, हेच या कृतीतून नगराध्यक्ष व सर्व नगरसेवकांनी दाखवून दिले आहे, असे ते म्हणाले.

आम्ही कपाळकरंटेच

लोकप्रतिनिधींनी जनतेचे प्रतिनिधी म्हणून काम करताना चांगले काय आणि वाईट काय, हे जनतेला समजावून सांगितले पाहिजे. राजापुरात मात्र ते होताना दिसत नाही, हे राजापूरकरांचे दुर्दैव असल्याचे अ‍ॅड. सुतार यांनी सांगितले. अनेक लोकप्रतिनिधी उद्योगधंदे आपल्या भागात नेण्यासाठी प्रयत्न करतात. त्यासाठी त्यांची चढाओढ असते, पण आमच्याकडे मात्र आलेला जगातील सर्वांत मोठा उद्योग, तालुका, जिल्हाच नव्हे तर राज्य आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला दिशा देणारा रिफायनरीसारखा प्रकल्प होऊ नये, तो आमच्या भागात येऊ नये, यासाठी आमचे लोकप्रतिनिधी प्रयत्न करतात यासारखे कपाळकरंटे आम्हीच, अशी टीकाही त्यांनी केली आहे.