शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

रिफायनरी प्रकल्प समर्थनाचा ठराव स्वागतार्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:22 IST

राजापूर : प्रस्तावित ग्रीन रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन करून त्याच्या समर्थनार्थ राजापूर नगर परिषदेने केलेला ठराव आणि घेतलेली भूमिका निश्चितच ...

राजापूर : प्रस्तावित ग्रीन रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन करून त्याच्या समर्थनार्थ राजापूर नगर परिषदेने केलेला ठराव आणि घेतलेली भूमिका निश्चितच स्वागतार्ह आहे. शहर आणि तालुक्याच्या विकासाचा दूरदृष्टिकोन ठेवून नगर परिषदेतील सत्ताधारी काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीने हे उचललेले पाऊल निश्चितच भविष्यातील विकासाला नवी दिशा देणारे ठरेल, अशी प्रतिक्रिया ग्रीन रिफायनरी प्रकल्प समर्थन समन्वय समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. शशिकांत सुतार यांनी ‘लोकमत’ला दिली आहे. या प्रकल्पाच्या समर्थनाच्या ठरावावर रोखठोक मत प्रदर्शन करून ठरावाचे समर्थन करणाऱ्या शिवसेनेच्या त्या दोन्ही नगरसेविकाही तेवढ्याच कौतुकास पात्र असून, त्यांनी घेतलेली भूमिका ही विकासाची भूमिका आहे, त्याचे स्वागतच केले पाहिजे, असेही अ‍ॅड. सुतार यांनी नमूद केले.

राजापूर नगर परिषदेच्या मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत प्रस्तावित ग्रीन रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनार्थ ठराव मंजूर करण्यात आला आहे. याला शिवसेनेच्या प्रतीक्षा खडपे व मनीषा मराठे या दोन नगरसेविकांनी समर्थन दिले आहे. त्यामुळे याचे पडसाद आता उमटू लागले आहेत. या समर्थनाच्या भूमिकेचे सर्वत्र स्वागत होत असून, सुमारे ५० सामाजिक संस्था व प्रतिनिधींच्या ग्रीन रिफायनरी प्रकल्प समर्थन समन्वय समितीच्या वतीने समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. सुतार यांनी स्वागत केले आहे.

या प्रकल्पामुळे होणारे फायदे, विकासात्मक प्रगती आणि भविष्यातील दिशा ओळखून नगराध्यक्ष अ‍ॅड. जमीर खलिफे आणि त्यांच्या सहकारी नगरसेवकांनी घेतलेली भूमिका ही कौतुकास्पद आहे. शहर आणि तालुक्याचा विकास हाच दृष्टिकोन ठेवून त्यांनी हे पाऊल उचलले असून, हेच खरे लोकप्रतिनिधींचे काम आहे. विरोधाला विरोध आणि सोयीच्या भूमिका न घेता प्रत्यक्षात एखाद्या प्रकल्पाबाबत परिपूर्ण माहिती घेऊन त्यापासून होणाऱ्या क्रांतिकारी बदलाला आणि जनतेच्या मताला महत्त्व देऊन लोकप्रतिनिधींनी निर्णय घ्यावयाचे असतात, हेच या कृतीतून नगराध्यक्ष व सर्व नगरसेवकांनी दाखवून दिले आहे, असे ते म्हणाले.

आम्ही कपाळकरंटेच

लोकप्रतिनिधींनी जनतेचे प्रतिनिधी म्हणून काम करताना चांगले काय आणि वाईट काय, हे जनतेला समजावून सांगितले पाहिजे. राजापुरात मात्र ते होताना दिसत नाही, हे राजापूरकरांचे दुर्दैव असल्याचे अ‍ॅड. सुतार यांनी सांगितले. अनेक लोकप्रतिनिधी उद्योगधंदे आपल्या भागात नेण्यासाठी प्रयत्न करतात. त्यासाठी त्यांची चढाओढ असते, पण आमच्याकडे मात्र आलेला जगातील सर्वांत मोठा उद्योग, तालुका, जिल्हाच नव्हे तर राज्य आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला दिशा देणारा रिफायनरीसारखा प्रकल्प होऊ नये, तो आमच्या भागात येऊ नये, यासाठी आमचे लोकप्रतिनिधी प्रयत्न करतात यासारखे कपाळकरंटे आम्हीच, अशी टीकाही त्यांनी केली आहे.