शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्याने घेतले भाताचे विक्रमी उत्पादन

By admin | Updated: October 24, 2016 00:13 IST

मिलिंद वैद्य : ‘सगुणा’ने दिला त्याच्या शेतीला आधार

 रत्नागिरी : जेएसडब्ल्यू पुरस्कृत रिळ येथील प्रगतशील शेतकरी मिलिंद वैद्य यांनी सगुणा पद्धतीने भात लागवड करुन यार्षीच्या खरीप हंगामात भाताचे हेक्टरी १९.२४ टन इतके विक्रमी उत्पादन घेतले आहे. भात उत्पादनामध्ये जागतिक विक्रमाची नोंद चीनमधील शेतकऱ्याची १९.४० टन हेक्टरी इतकी असून, मिलिंद वैद्य यांनी जागतिक विक्रमाच्या जवळ पोहोचण्यात यश मिळवले आहे. एकीकडे नैसर्गिक आपत्ती आणि मजुरांअभावी कोकणातील भातशेती परवडत नाही, अशी ओरड असताना या शेतकऱ्याने कोकणातील शेतकऱ्यांना एक आदर्श घालून दिला आहे. याअगोदर वैद्य यांनी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागांतर्गत भातपीक स्पर्धेत भाग घेऊन राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. पुढच्या वर्षी जागतिक विक्रम मोडीत काढण्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. मिलिंद वैद्य यांच्या भातशेतीला परिसरातील शेतकरी, विभागीय कृषी सहसंचालक अशोक लोखंडे, एसआरटीचे जनक कृषिभूषण चंद्रशेखर भडसावळे, जेएसडब्ल्यूचे वरिष्ठ अधिकारी यांनी भेटी देऊन पाहणी केली. सगुणा पद्धतीने भात लागवडीमध्ये फक्त पहिल्या वर्षी गादीवाफे बनवण्यासाठी नांगरट करावी लागते. एकदा गादीवाफे बनवल्यानंतर कमीत कमी दहा वर्षेतरी नंतर नांगरणीची गरज नसते. या पद्धतीमध्ये रोप काढणे, भाजावळ करणे, पुनर्लागवड, चिखलणी, फोड, बेर करावी लागत नसल्याने मशागतीवर होणाऱ्या खर्चात ५० टक्के बचत होते. खतामध्ये ५० टक्के बचत होते. पावसाने ओढ दिल्यास उत्पादनावर जास्त परिणाम होत नाही. त्यामुळे कोकणातील शेतकऱ्यांसाठी एसआरटी पद्धत एक वरदान असून, जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मिलिंद वैद्य यांनी केले. भातपिकाबरोबरच शेतकरी ही द्वीपिकी, तीनपिकी शेती घेण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याबरोबरच रब्बीमध्ये शेतकऱ्यांना सुधारित जातीचे भाजीपाला बियाणे पुरवण्यात येते. मिलिंद वैद्य यांनी भाताचे विक्रमी उत्पन्न घेतल्याबद्दल जेएसडब्ल्यू एनर्जीचे युनिट हेड विजय परांजपे, युनिट इनचार्ज यतीश छाब्रा, सीएसआर विभागप्रमुख सुधीर तेलंग, विभागीय कृषी सहसंचालक डॉ. अशोक लोखंडे, कृषिभूषण चंद्रशेखर भडसावळे यांनी अभिनंदन केले. पुढच्या वर्षी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या पद्धतीने भात लागवड करण्यासाठी जेएसडब्ल्यूचे अधिकारी, कृषी विभागाचे अधिकारी व रत्नागिरी पंचायत समितीचे कृषी अधिकारी प्रयत्न करत आहेत. (प्रतिनिधी)