शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
2
Donald Trump Tariffs: 'चीनवरील टॅरिफ कमी करण्यास तयार, कारण...'; डोनाल्ड ट्रम्प यांची अचानक नरमाईची भूमिका
3
Mumbai Fire: मुंबईत कपड्याच्या शोरुममध्ये अग्नितांडव! पाच मजली इमारतीत अडकलेले लहान मुलांसह १९ लोक
4
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी
5
पाकिस्तान सुधारत नाही! सलग ११ व्या दिवशी युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय सैनिकांनी धडा शिकवला
6
Video: चिनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
7
FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील
8
मिचमिच डोळे, रडारचे कान...! एमजी अ‍ॅस्टरमधून पुण्यात आणि गावखेड्यात भटकंती, कशी वाटली एसयुव्ही...
9
"२ वर्ष अख्खं जग थांबलं होतं तेव्हा माझं घर यांच्यामुळे चाललं", प्रसाद ओकने कोणाला दिलं श्रेय?
10
'पाकिस्तान भारताविरुद्ध ४ दिवसही टीकू शकत नाही, कराची अन् लाहोरमध्ये गुरुकुल उघडणार'; बाबा रामदेव यांनी सुनावले
11
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
12
अनैतिक संबंधातून वाद, जळगावात भररस्त्यात घडला थरार; पाठलाग करत युवकाला कायमचं संपवलं
13
...म्हणून बाबिलने अर्जुन कपूर, अनन्या पांडेचं नाव घेतलं; अभिनेत्याच्या 'त्या' व्हिडिओनंतर टीमकडून स्पष्टीकरण
14
दूत पाठवले म्हणून अजितदादांची शिंदेंवर नाराजी, पुढे काय?
15
India Pakistan: युद्धाचे ढग गडद होताच मध्यस्थीसाठी मुस्लिम देश आला पुढे, 'हा' नेता येणार भारत दौऱ्यावर
16
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
17
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
18
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
19
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
20
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...

मान्यता नसल्याने प्रश्न

By admin | Updated: August 11, 2014 00:13 IST

औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय : प्राचार्यांना देणार निवेदन

रत्नागिरी : शहरात सुरू असलेल्या शासकीय औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाला फार्मसी कौन्सिल आॅफ इंडियाची परवानगी नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात आहे. आतापर्यंत केवळ आश्वासनांचीच खैरात करण्यात आली आहे. त्यामुळे जोपर्यंत ठोस कारवाई करण्यात येत नाही, तोपर्यंत महाविद्यालयात न जाण्याचा निर्णय विद्यार्थ्यांनी घेतला आहे. प्राचार्यांना यासंदर्भात उद्या (दि. ११) निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती विद्यार्थ्यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. यावर्षी संबंधित अभ्यासक्रमाच्या चारही शाखांचे विद्यार्थी उपस्थित होते.शासकीय तंत्रनिकेतन संस्थेच्या मुलांच्या वसतिगृहामध्ये शासकीय औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय २००९ पासून सुरू करण्यात आले आहे. या इमारतीमध्ये गेली सहा वर्षे शैक्षणिक कामकाज सुरू आहे. मात्र, औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाच्या इमारतीचे कामकाज अद्याप अपूर्ण आहे. वास्तविक इमारत ३० जून २0१३पर्यंत पूर्ण करून ताब्यात देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, सध्या कार्यरत असलेल्या दोन-चार कामगारांच्या कामाचा आवाका लक्षात घेता बांधकाम पूर्ण होण्यास अद्याप काही वर्षे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबत विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागितली होती. त्याबाबत सार्वजनिक बांधकाम मंडळाच्या अधीक्षक अभियंत्यांना कार्यवाहीचे निर्देश देण्यात आल्याचे पत्र देण्यात आले. परंतु इमारत मात्र ‘जैसे थे’ स्थितीत आहे. इमारत पूर्ण नसल्यामुळे फार्मसी कौन्सील आॅफ इंडियाकडून महाविद्यालयाला मान्यता मिळणे अवघड असल्याने विद्यार्थ्यांच्या समोर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.संबंधित महाविद्यालयात अध्यापन करणाऱ्या शिक्षकांना जर शासनाकडून वेतन दरमहा नियमित देण्यात येते, आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया होऊ शकते तर महाविद्यालय असण्याबाबत तंत्रशिक्षण विभागाला कल्पना नसणे म्हणजे हास्यास्पद आहे. विद्यार्थ्यांनी तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे यांची भेट घेऊन संबंधित प्रकाराची माहिती दिली असता त्यांनी महाविद्यालय रत्नागिरीत आहे, याबाबत माहीत नसल्याचे सांगून लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते, असे विद्यार्थ्यांनी सांगितले. तसेच पालकमंत्री उदय सामंत, सेनेचे खासदार विनायक राऊत यांना भेटून समस्या मांडली होती. त्यांनीही विद्यार्थ्यांना केवळ आश्वासन देण्यापलिकडे काहीही केलेले नाही.अभ्यासक्रम २००९ पासून सुरू झाला. चार वर्षांचा अभ्यासक्रम रितसर पूर्ण करून दोन बॅच बाहेर पडल्या आहेत. एका बॅचमध्ये ४० विद्यार्थी आहेत. परंतु चार वर्षांचे शिक्षण पूर्ण करूनही त्यांना फार्मासिस्ट म्हणून रजिस्ट्रेशन करता येत नाही. त्यामुळे रितसर व्यवसाय सुरू करता येत नाहीच शिवाय शासकीय सेवेसाठीही पात्र ठरत नाहीत. केवळ दोन-तीन हजारांची नोकरी करावी लागते. आॅनलाईन प्रवेशामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी खर्च करूनसुध्दा पदरी मात्र निराशा येत आहे. (प्रतिनिधी)