शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

रवींद्र साळुंखे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:22 IST

रत्नागिरी : येथील ज्येष्ठ रंगकर्मी आणि रत्नागिरीतील सांस्कृतिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या संकल्प कला मंच या संस्थेचे आधारस्तंभ रवींद्र साळुंखे ...

रत्नागिरी : येथील ज्येष्ठ रंगकर्मी आणि रत्नागिरीतील सांस्कृतिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या संकल्प कला मंच या संस्थेचे आधारस्तंभ रवींद्र साळुंखे यांचे गुरुवार, १५ जुलै रोजी सकाळी पुणे येथे उपचारादरम्यान निधन झाले. ते ५९ वर्षांचे होते.

कोरोना आजारातून बरे होत असतानाच रवींद्र साळुंखे यांना म्युकरमायकोसिसचा संसर्ग झाला. त्यांना पुढील उपचारासाठी पुणे येथे खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, गुरुवारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाबद्दल रत्नागिरीच्या नाट्य व सांस्कृतिक क्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

नाटकासाठी सदैव झटणारा एक अत्यंत प्रामाणिक, सच्चा रंगकर्मी आपल्याला सोडून गेल्याची भावना आज रत्नागिरीतील नाट्यकर्मींमध्ये आहे. संकल्प कला मंचच्या माध्यमातून त्यांनी अनेक नाटकांतून उत्कृष्ट अभिनय केला. राज्य नाट्य स्पर्धेसाठी अनेक नाटकांच्या निर्मितीत त्यांचा मोठा वाटा होता, तसेच कामगार, राज्य नाट्य स्पर्धांमध्ये त्यांना नाटकांतल्या भूमिकांसाठी पारितोषिकेही मिळाली होती. नाटकांबरोबर डॉर्ट फिल्म निर्मितीमध्येही त्यांनी पदार्पण केले होते. कलेबरोबर सामाजिक क्षेत्रातही त्यांचे योगदान होते.

त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, जावई व नातू, असा परिवार आहे.