शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
5
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
6
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
7
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
8
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
9
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
10
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
11
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
12
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
13
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
14
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
15
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
16
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
17
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
18
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
19
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
20
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीचे दातृत्व सर्वदूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:33 IST

मात्र, या नैसर्गिक संकटात अडकलेल्या नागरिकांच्या मदतीला धावून जात येथील सामाजिक संस्थांनी त्यांना जगण्याचे बळ दिले आहे. दोन वर्षांपूर्वी ...

मात्र, या नैसर्गिक संकटात अडकलेल्या नागरिकांच्या मदतीला धावून जात येथील सामाजिक संस्थांनी त्यांना जगण्याचे बळ दिले आहे. दोन वर्षांपूर्वी सांगली येथे असेच महापुराने थैमान घातले हाेते. अशावेळीही रत्नागिरीतील सुमारे ३० संस्थांनी एकत्र येत हेल्पिंग हॅंड फोरम तयार केला आणि त्या माध्यमातून सांगलीसाठी सुमारे ९ ट्रकमधून सर्व जीवनावश्यक वस्तूंची मदत या जिल्ह्यात पोहोच केली होती. आपत्ती काळासाठी एकत्र आलेल्या या सर्व संस्थांनी आपली एकी कायम राखण्याचे शिवधनुष्य आतापर्यंत यशस्वी पेलले आहे.

दोन-तीन संस्था एकत्र येऊन काम करायचे म्हटले तरी कुणाच्या नेतृत्वाखाली करायचे, हा मोठा ‘इगो’ संस्थांमध्ये निर्माण होतो. परंतु, रत्नागिरी आणि परिसरातून एकत्र आलेल्या या ३० सामाजिक संस्थांना गेल्या दोन वर्षांत हा अहंकार कधी शिवलाच नाही, ही अभिमानाची गोष्ट समस्त रत्नागिरीकरांसाठीच समजायला हवी. आपत्ती आली की धावत पुढे जायचे आणि आपत्तीग्रस्तांना त्यातून बाहेर काढायचे, हेच कर्तव्य गेली दोन वर्षे हे सर्व स्वयंसेवक तन, मन, धनाने करीत आहेत आणि उदार मनाने दातेही पुढे येत आहेत. या विविध संस्थांच्या स्वयंसेवकांनी आपल्याच चिपळूणवासीयांसाठी तेवढ्याच ताकदीने पुढे होऊन दात्यांच्या सहकार्याने मदतीचा डोंगर उभा करण्यास सुरुवात केली. कोकणातील दातृत्वाचे हेच मुख्य वैशिष्ट्य मानायला हवे.