शहरं
Join us  
Trending Stories
1
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
2
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
3
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
4
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
5
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
6
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
7
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
8
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
9
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
10
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
11
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
12
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
13
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
14
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
15
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
16
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
17
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
18
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
19
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
20
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल

रत्नागिरीत बाजी कोणाची?

By admin | Updated: October 19, 2014 00:25 IST

रत्नागिरी : अखेरच्या क्षणापर्यंत गाजत असलेल्या विधानसभा निवडणुकीत कोण

रत्नागिरी : अखेरच्या क्षणापर्यंत गाजत असलेल्या विधानसभा निवडणुकीत कोण उमेदवार निवडून येणार, याची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. उद्या, रविवारी सकाळी ८ वाजल्यापासून जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघांत नियोजित ठिकाणी मतमोजणी होणार आहे. सर्वच ठिकाणी दुपारी १२.३0 वाजेपर्यंत निकाल जाहीर होण्याची अपेक्षा आहे.मतमोजणी प्रक्रियेसाठी नियुक्त केलेल्या सुमारे २५० कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. दापोली, गुहागर, चिपळूण, रत्नागिरी आणि राजापूर या पाच मतदारसंघांत नियोजित ठिकाणी उद्या ८ वाजता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मतमोजणी सुरू होणार आहे. प्रत्येक ठिकाणी १४ टेबल मतमोजणीसाठी ठेवण्यात आले आहेत.प्रत्येक टेबलवर पर्यवेक्षक, सहायक, सूक्ष्म निरीक्षक तसेच आठ राखीव कर्मचारी कार्यरत राहणार आहेत. एकंदरीत पाच विधानसभा मतदारसंघांत प्रत्येकी ५० म्हणजे एकूण २५० कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. दापोली मतदारसंघात सर्वाधिक ३६० मतदानकेंद्रे असून, मतमोजणी २६ फेऱ्यांमध्ये होणार आहे. गुहागर आणि चिपळूणमध्ये प्रत्येकी १७ मतदानकेंद्रे असून, मतमोजणी २३ फेऱ्यांमध्ये होणार आहे. रत्नागिरीमध्ये ३४१ मतदानकेंद्रे असून, मतमोजणी २५ फेऱ्यांमध्ये होणार आहे. राजापुरात ३३२ मतदानकेंद्रे असून, मतमोजणी २४ फेऱ्यांमध्ये होणार आहे. पाचही ठिकाणची मतमोजणी प्रक्रिया दुपारी १२.३० वाजेपर्यंत पूर्ण होईल, असा अंदाज उपजिल्हा निवडणूक अधिकारी नंदकुमार जाधव यांनी व्यक्त केला. रत्नागिरी मतदारसंघात सर्वाधिक अकरा, तर गुहागर मतदारसंघात सर्वांत कमी पाच उमेदवार रिंगणात आहेत. चिपळूण आणि दापोली मतदारसंघात प्रत्येकी दहा, तर राजापूर मतदारसंघांत ८ उमेदवार आपले भवितव्य अजमावत आहेत. (प्रतिनिधी)