शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
3
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
4
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
5
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
6
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
7
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
8
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
9
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
10
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
13
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
14
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
15
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
16
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
17
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
18
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
19
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

रत्नागिरीत बाजी कोणाची?

By admin | Updated: October 19, 2014 00:25 IST

रत्नागिरी : अखेरच्या क्षणापर्यंत गाजत असलेल्या विधानसभा निवडणुकीत कोण

रत्नागिरी : अखेरच्या क्षणापर्यंत गाजत असलेल्या विधानसभा निवडणुकीत कोण उमेदवार निवडून येणार, याची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. उद्या, रविवारी सकाळी ८ वाजल्यापासून जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघांत नियोजित ठिकाणी मतमोजणी होणार आहे. सर्वच ठिकाणी दुपारी १२.३0 वाजेपर्यंत निकाल जाहीर होण्याची अपेक्षा आहे.मतमोजणी प्रक्रियेसाठी नियुक्त केलेल्या सुमारे २५० कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. दापोली, गुहागर, चिपळूण, रत्नागिरी आणि राजापूर या पाच मतदारसंघांत नियोजित ठिकाणी उद्या ८ वाजता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मतमोजणी सुरू होणार आहे. प्रत्येक ठिकाणी १४ टेबल मतमोजणीसाठी ठेवण्यात आले आहेत.प्रत्येक टेबलवर पर्यवेक्षक, सहायक, सूक्ष्म निरीक्षक तसेच आठ राखीव कर्मचारी कार्यरत राहणार आहेत. एकंदरीत पाच विधानसभा मतदारसंघांत प्रत्येकी ५० म्हणजे एकूण २५० कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. दापोली मतदारसंघात सर्वाधिक ३६० मतदानकेंद्रे असून, मतमोजणी २६ फेऱ्यांमध्ये होणार आहे. गुहागर आणि चिपळूणमध्ये प्रत्येकी १७ मतदानकेंद्रे असून, मतमोजणी २३ फेऱ्यांमध्ये होणार आहे. रत्नागिरीमध्ये ३४१ मतदानकेंद्रे असून, मतमोजणी २५ फेऱ्यांमध्ये होणार आहे. राजापुरात ३३२ मतदानकेंद्रे असून, मतमोजणी २४ फेऱ्यांमध्ये होणार आहे. पाचही ठिकाणची मतमोजणी प्रक्रिया दुपारी १२.३० वाजेपर्यंत पूर्ण होईल, असा अंदाज उपजिल्हा निवडणूक अधिकारी नंदकुमार जाधव यांनी व्यक्त केला. रत्नागिरी मतदारसंघात सर्वाधिक अकरा, तर गुहागर मतदारसंघात सर्वांत कमी पाच उमेदवार रिंगणात आहेत. चिपळूण आणि दापोली मतदारसंघात प्रत्येकी दहा, तर राजापूर मतदारसंघांत ८ उमेदवार आपले भवितव्य अजमावत आहेत. (प्रतिनिधी)