शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदाराचे बनावट लेटरहेड, सही वापरून ३ काेटींचा निधी पळवला
2
गरीब अन् मध्यमवर्गीयांना दिलासा; ‘जीएसटी’त बदलाचा केंद्राचा विचार; आवश्यक वस्तूंवरील १२% कर रद्द करण्याची शक्यता
3
‘घड्याळ’बाबत जसा आदेश, तसाच ‘धनुष्यबाण’बाबतही द्या; उद्धवसेना सुप्रीम कोर्टात; १४ जुलै रोजी सुनावणी
4
ठाकरे - भाऊबंदकी ते भावबंधन; मागचे सर्व विसरून नवीन सुरुवात करावी लागेल
5
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विधानसभेत रणकंदन, विरोधकांनी सरकारला धरले धारेवर; तत्काळ चर्चेची मागणी फेटाळली
6
मनसे-उद्धवसेनेकडून मेळावा स्थळाची पाहणी; सर्वच राजकीय नेत्यांना आमंत्रण
7
१.३५ लाख कोटींचे गुंतवणूक प्रस्ताव मंजूर; १ लाख रोजगारनिर्मिती होणार
8
वाहतूकदारांचा संप सुरूच, परिवहनमंत्र्यांसोबतच्या बैठकीत तोडगा निघाला नाही
9
त्यांचा २,००० कोटींच्या मालमत्तेवर हाेता डाेळा; साेनिया, राहुल गांधींनी कट रचल्याचा ईडीचा आरोप
10
लिंगाची पुनर्रचना करून रुग्णाला दिले नवे आयुष्य; नागपुरात मध्य भारतातील पहिल्या शस्त्रक्रियेचा दावा
11
काेराेना लस अन् हृदयविकाराचा संबंध नाही; जीवनशैली, आनुवंशिक दाेष हेच कारणीभूत
12
गळके छत, ओल्या भिंती... सांगा आता शिकायचं कसं; अंबरनाथ नगरपालिकेच्या शाळेची दुरवस्था; विद्यार्थ्यांचे हाल
13
कल्याणमधील पाणीपुरी विकणाऱ्याच्या मुलाने मारली ‘आयआयटी’पर्यंत मजल; रुरकी येथील आयआयटीत मिळाला प्रवेश
14
पदवी प्रमाणपत्रावर ‘मुंबई’चे स्पेलिंग चुकले; कंत्राटदाराला ठेक्याच्या २०% दंड; मुंबई विद्यापीठाच्या समितीच्या अहवालानंतर कारवाई
15
परिवहन मंत्र्यांनीच पकडली रॅपिडो बाइक टॅक्सी; ॲप नसल्याची परिवहन विभागाकडून खोटी माहिती
16
विदेशी विद्यापीठांचा उपयोग ‘इंडिया’ला होईल की ‘भारता’ला?
17
शशी थरूर, आप खुश तो बहोत होंगे!
18
मायक्रोसॉफ्टमध्ये मोठी कपात होणार! ९००० हून अधिक कर्मचाऱ्यांना फटका बसणार?
19
यशस्वी जैस्वालची सेंच्युरी हुकली! पण एका डावात अनेक विक्रम; हिटमॅन रोहित शर्मालाही टाकले मागे
20
खतरनाक इनस्विंग! स्टायलिश अंदाजात बॉल सोडला अन् 'क्लीन बोल्ड' होऊन तंबूत परतला (VIDEO)

रत्नागिरीला रात्रभर पावसाने झोडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:41 IST

रत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात वादळी पावसाला सुरुवात झाली असून रविवारी सायंकाळनंतर सुरू झालेल्या मुसळधार पावसाने रात्रभर रत्नागिरी ...

रत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात वादळी पावसाला सुरुवात झाली असून रविवारी सायंकाळनंतर सुरू झालेल्या मुसळधार पावसाने रात्रभर रत्नागिरी जिल्ह्याला झोडपले. या पावसामुळे रत्नागिरी, लांजा, संगमेश्वर तालुक्यातील अनेक भागांमध्ये दरड कोसळण्याचे प्रकार घडले. तर काही भागात रस्ते खचले. जिल्ह्यात गेल्या २४ तासात ८८८.२० मिलीमीटर (८८.६९ मिलीमीटर) पावसाची नोंद झाली आहे. रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक १९३.३० मिलीमीटर तर त्याखालोखाल संगमेश्वर १२३.९० आणि राजापूर तालुक्यात ११४.८० मिलीमीटर पाऊस पडला.

जिल्ह्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून मुसळधार वादळी पावसाला सुरुवात झाली आहे. सायंकाळनंतर मुसळधार पाऊस सुरू होतो. जोडीला वादळी वारे, मेघगर्जना आणि विजांचा चमचमाट. रात्रभर झालेल्या पर्जन्यवृष्टीमुळे जिल्ह्यात दरड कोसळणे, रस्ता खचणे आदी प्रकार मोठ्या प्रमाणावर घडले. जिल्हा नियंत्रण कक्षाकडून सकाळी १० वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या माहितीनुसार संगमेश्वर तालुक्यात वायंगणी येथे दरड कोसळली. या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दरड हटविण्याचे काम सुरू आहे. कांटे येथील रस्त्यावरील मोरी खचल्याने रस्ता बंद झाला आहे. संगमेश्वर रस्त्यावर झाडे कोसळल्याने हा रस्ता बंद होता. या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून झाडे हटविण्याचे काम सुरू आहे.

रत्नागिरी तालुक्यात उक्षी येथे १२ रोजी स्वप्नाली कांबळे यांच्या घराच्या शेजारी दरड कोसळली. या कुटुंबाला सुरक्षित ठिकाणी हलविले. पोमेंडी येथील सुरेश पवार यांच्या घरात पावसाचे पाणी शिरल्याने अंशत: नुकसान झाले. पोमेंडी येथील (टेंभे पूल) एम.एच.एएफ ४२१६ ही मोटारसायकल वाहून गेली. तसेच हरचिरी येथे रात्री साडेअकरा वाजता दरड कोसळली तसेच शिरगांव शिवरेवाडी येथे रस्ता खचल्याची घटना घडली. लांजा तालुक्यात लांजा-वेरळ रस्त्यावर दरड कोसळल्याने हा रस्ता बंद बंद ठेवण्यात आला. या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दरड हटविण्याचे काम सुरू आहे. या तालुक्यांमध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

सोमवारी सकाळीही काही काळ पावसाने उघडीप दिली होती. अधूनमधून जोरदार सरी येत होत्या. पुन्हा सायंकाळी पावसाचा जोर वाढला. हवामान खात्याने १५ जूनपर्यंत जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यादृष्टीने पूरप्रवण तसेच दरडप्रवण गावांमध्ये आपत्ती आल्यास अशा ठिकाणी मदतकार्य करण्यासाठी जिल्ह्यात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल दाखल झाले आहे.

हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिल्याने नागरिकांना खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.