शहरं
Join us  
Trending Stories
1
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
2
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
3
“प्रशांत जगतापांनी अनेक पक्षांची ऑफर धुडकावून विचारासाठी काँग्रेस मार्ग पत्करला”: वडेट्टीवार
4
"अल्पसंख्याकांवरील अत्याचार खपवून घेणार नाही" २,९०० हून अधिक हल्ल्यांचा पुरावा; भारताचा बांगलादेशला गंभीर इशारा
5
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
6
भाजपा आमदारांच्या ‘ब्राह्मण भोजना’मुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ, भाजपामध्ये चाललंय काय? 
7
Shehnaaz Gill : "इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा
8
उद्धव ठाकरेंच्या भेटीत काय ठरले? जागावाटपाबाबत बैठकीत चर्चा झाली का?; जयंत पाटील म्हणाले...
9
अडीच वर्षातील काम जनता विसरणार नाही; शिवसेनेत येताच प्रकाश महाजनांचे शिंदेंबाबत कौतुकोद्गार
10
रिपल इफेक्ट : ग्राहकांच्या सवयी बाजाराच्या हालचालींवर कशा परिणाम करतात?
11
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
12
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
13
कन्या राशीसाठी नवीन वर्ष 2026 बदलांचे आणि आत्मशोधाचे वर्ष; संघर्षातून गवसणार यशाचा मार्ग!
14
'लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात, पण जगताप यांनी वैचारिक लढ्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केला', हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं कौतुक 
15
सिंह राशीसाठी नवीन वर्ष 2026 स्वप्नपूर्तीचे वर्ष; आश्चर्याचे धक्के आणि परदेश प्रवासाचे योग!
16
नगरसेविकेच्या पतीच्या हत्येनंतर खोपोलीत पोलीस ठाण्याला घेराव, पोलीस निरीक्षकावर गंभीर आरोप, मागणी काय?
17
अदानी ग्रुपकडून मिळाली ₹3400 कोटींची ऑर्डर, झटक्यात ५% नं वधारला शेअर; आता खरेदीसाठी उडाली लोकांची झुंबड
18
MNS: गणपती बाप्पा सांताक्लॉजच्या वेशात? जाहिरातीवर मनसेचा संताप; केंद्र सरकारवर केली टीका!
19
गृहकर्जाचा हप्ता वाढलाय? 'लोन ट्रान्सफर'ने वाचवा लाखो रुपये; कमी व्याजासाठी बँक कशी बदलावी?
20
ठाकरे-शिंदेंनी प्रयत्न केले, पण अखेर काँग्रेसमध्ये गेले; प्रशांत जगताप यांची राजकीय कारकीर्द
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीला रात्रभर पावसाने झोडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:41 IST

रत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात वादळी पावसाला सुरुवात झाली असून रविवारी सायंकाळनंतर सुरू झालेल्या मुसळधार पावसाने रात्रभर रत्नागिरी ...

रत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात वादळी पावसाला सुरुवात झाली असून रविवारी सायंकाळनंतर सुरू झालेल्या मुसळधार पावसाने रात्रभर रत्नागिरी जिल्ह्याला झोडपले. या पावसामुळे रत्नागिरी, लांजा, संगमेश्वर तालुक्यातील अनेक भागांमध्ये दरड कोसळण्याचे प्रकार घडले. तर काही भागात रस्ते खचले. जिल्ह्यात गेल्या २४ तासात ८८८.२० मिलीमीटर (८८.६९ मिलीमीटर) पावसाची नोंद झाली आहे. रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक १९३.३० मिलीमीटर तर त्याखालोखाल संगमेश्वर १२३.९० आणि राजापूर तालुक्यात ११४.८० मिलीमीटर पाऊस पडला.

जिल्ह्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून मुसळधार वादळी पावसाला सुरुवात झाली आहे. सायंकाळनंतर मुसळधार पाऊस सुरू होतो. जोडीला वादळी वारे, मेघगर्जना आणि विजांचा चमचमाट. रात्रभर झालेल्या पर्जन्यवृष्टीमुळे जिल्ह्यात दरड कोसळणे, रस्ता खचणे आदी प्रकार मोठ्या प्रमाणावर घडले. जिल्हा नियंत्रण कक्षाकडून सकाळी १० वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या माहितीनुसार संगमेश्वर तालुक्यात वायंगणी येथे दरड कोसळली. या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दरड हटविण्याचे काम सुरू आहे. कांटे येथील रस्त्यावरील मोरी खचल्याने रस्ता बंद झाला आहे. संगमेश्वर रस्त्यावर झाडे कोसळल्याने हा रस्ता बंद होता. या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून झाडे हटविण्याचे काम सुरू आहे.

रत्नागिरी तालुक्यात उक्षी येथे १२ रोजी स्वप्नाली कांबळे यांच्या घराच्या शेजारी दरड कोसळली. या कुटुंबाला सुरक्षित ठिकाणी हलविले. पोमेंडी येथील सुरेश पवार यांच्या घरात पावसाचे पाणी शिरल्याने अंशत: नुकसान झाले. पोमेंडी येथील (टेंभे पूल) एम.एच.एएफ ४२१६ ही मोटारसायकल वाहून गेली. तसेच हरचिरी येथे रात्री साडेअकरा वाजता दरड कोसळली तसेच शिरगांव शिवरेवाडी येथे रस्ता खचल्याची घटना घडली. लांजा तालुक्यात लांजा-वेरळ रस्त्यावर दरड कोसळल्याने हा रस्ता बंद बंद ठेवण्यात आला. या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दरड हटविण्याचे काम सुरू आहे. या तालुक्यांमध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

सोमवारी सकाळीही काही काळ पावसाने उघडीप दिली होती. अधूनमधून जोरदार सरी येत होत्या. पुन्हा सायंकाळी पावसाचा जोर वाढला. हवामान खात्याने १५ जूनपर्यंत जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यादृष्टीने पूरप्रवण तसेच दरडप्रवण गावांमध्ये आपत्ती आल्यास अशा ठिकाणी मदतकार्य करण्यासाठी जिल्ह्यात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल दाखल झाले आहे.

हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिल्याने नागरिकांना खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.