शहरं
Join us  
Trending Stories
1
'ठाकरे बंधूंचा वचननामा ४ जानेवारीला प्रसिद्ध करणार, नंतर एवढ्या संयुक्त सभा होणार', संजय राऊत यांनी दिली माहिती 
2
Success Story: कपडे धुवून कोट्यधीश बनली 'ही' व्यक्ती, एकेकाळी रिक्षाचं भाडं देण्यासही नव्हते पैसे, कसा होता आजवरचा प्रवास
3
तो काळ परत येणार नाही...! PCO चा बुथ ते 3G डोंगलचा वेग; स्मार्टफोन आणि ५जीच्या स्पीडने तुम्ही विसरलात का...?
4
अर्ज छाननीचाही ‘रात्रीस खेळ चाले’; मुंबईत १६७ अर्ज बाद, भाईंदरमध्ये ६०० अर्ज वैध
5
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका, एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी वाढ
6
प्रवाशांनो… २४ ट्रेनची वेळ बदलली, ६२ ट्रेनचा वेग वाढला; पुणे, मुंबईतील अनेक ट्रेनचा समावेश!
7
घरातील दागिन्यांतून कमवा दरमहा पैसे; नेमके कसे मिळतात? जाणून घ्या...
8
सोने व्यापारी, पत्नी आणि तो...! एकाकडे पिस्तूल, दुसऱ्याकडे चाकू, तिघांचाही मृत्यू; कोणी कोणाला मारले? शेजारी, पोलिसही चक्रावले...
9
Astrology: १००० वर्षांनंतर 'त्रिवेणी योग' पुढची ३ वर्षे मिळेल नशीबाची साथ; आजच करा 'ही' भाग्यसिद्धी मुद्रा
10
Stock Market Today: शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स १५० अंकांनी वधारला, निफ्टीत ५० अंकांची तेजी; FMCG, फार्मा शेअर्समध्ये तेजी
11
Ikkis Review: अगस्त्य नंदाचा नव्हे; धर्मेंद्र यांचाच वाटतो 'इक्कीस'; कथा, अभिनय जमेच्या बाजू, पण...; वाचा रिव्ह्यू
12
Mumbai Rains: २०२६ च्या पहिल्याच दिवशी मुंबई चिंब भिजली! थंडीत पावसाच्या सरींनी मुंबईकर चक्रावले
13
Hyundai Cars Price Hike: ह्युंदाई क्रेटा, व्हेन्यू, एक्स्टर... आजपासून ह्युंदाईच्या कार्स महागल्या, किती खिसा रिकामा करावा लागणार?
14
भाजपच्या बंडोबांना थंडोबा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची उडी; अनेक नेत्यांवर जबाबदारी
15
मुंबईत रिपब्लिकन पक्षाला १७ ऐवजी १२ जागा : आठवले
16
९८ लाख कोटींच्या साम्राज्याचा सम्राट निवृत्त! वॉरेन बफे यांचा कंपनीतून ९५ व्या वर्षी राजीनामा
17
आजपासून काय-काय बदलणार? एलपीजी, सीएनजी स्वस्त? कार महागणार, पीएफच्या नियमांतही मोठे बदल होणार अन् बरंच काही...!
18
आजचे राशीभविष्य १ जानेवारी २०२६ : नववर्षाचा पहिला दिवस 'या' राशींसाठी ठरणार लाभदायी; वाचा १२ राशींचे सविस्तर भविष्य
19
'नाराज'कीय वातावरण तापले! निष्ठावंतांचा संताप कायम; मंत्री सावेंच्या कारला काळं फासण्याचा प्रयत्न, कराडांना घेराव, पदाधिकाऱ्याच्या कानशिलात
20
नाशिक-अक्कलकोट कॉरिडॉरला हिरवा कंदील, १७ तासांचा प्रवास आणि २०१ किमीचे अंतर वाचणार
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी थांबली...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:31 IST

रत्नागिरी : ‘वीकेण्ड’ लाॅकडाऊनच्या पहिल्या दिवशी सकाळपासूनच रत्नागिरी शहरात पोलीस यंत्रणेने मजबूत फळी उभारल्याने अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने ...

रत्नागिरी : ‘वीकेण्ड’ लाॅकडाऊनच्या पहिल्या दिवशी सकाळपासूनच रत्नागिरी शहरात पोलीस यंत्रणेने मजबूत फळी उभारल्याने अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद होती. शासनाने दोन दिवसांचा जनता कर्फ्यू आधीच जाहीर केल्याने ठरावीक व्यक्ती वगळता सर्व मार्गांवर शुकशुकाट पसरला होता. अधूनमधून येजा करणाऱ्या दुचाकीस्वारांना तसेच चारचाकींना करडी नजर असलेल्या पोलिसांकडून हटकण्यात येत होते. या वीकेण्ड लाॅकडाऊनला संपूर्ण जिल्ह्यात प्रतिसाद मिळाल्याने सर्वत्र कमालीची शांतता दिसून येत होती.

शनिवारी कडक लाॅकडाऊन जाहीर केल्याने सकाळी रत्नागिरीत तशी उशिराच काहीअंशी वर्दळ सुरू असल्याचे चित्र होते. एरव्ही, विविध वस्तूंच्या खरेदीसाठी बाहेर पडलेले इतरत्र ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी करून गप्पा मारताना दिसायचे. मात्र, शनिवारी सर्वच ठिकाणी शुकशुकाट होता. किराणा दुकाने, दूध सेंटर्स, गॅस एजन्सी, औषधविक्रेते यांची दुकाने सुरू होती. हळूहळू वर्दळ वाढतेय, असे लक्षात येताच उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक शिरीष सासने, ग्रामीणप्रमाणेच शहर पोलीस ठाण्याचा कार्यभार असलेले पोलीस निरीक्षक विनित चौधरी यांनी आपल्या सर्व सहकाऱ्यांसह शहरातील मुख्य भागात जाेरदार फळी उभी केली. सकाळी नेहमीच्या कामावर जाणाऱ्या व्यक्तींना पोलिसांकडून कुठलाच अडसर झाला नाही. नगर परिषदेचे सफाई कामगार आपल्या नियमित वेळेनुसार सर्व ठिकाणी साफसफाई करण्याचे काम करत होते.

जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी या लाॅकडाऊनला विरोध करीत दुकाने सुरू ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे विनंती केली होती. त्यासाठी आंदोलने करून रस्त्यावर उतरण्याचाही इशारा दिला होता. मात्र, जिल्हा प्रशासनाकडून आवाहन करण्यात आल्याने व्यापारी संघटनेने या लाॅकडाऊनला सकारात्मक प्रतिसाद देत दुकाने बंद ठेवली होती. त्यामुळे बाजारपेठांमध्ये दरदिवशी दिसणारी गर्दी नव्हती. बाजारपेठेचे मार्ग निर्मनुष्य झाल्याने बाजारपेठेत सामसूम पसरली होती. जिल्हाभरातील सर्वच बाजारपेठांमध्ये ही स्थिती होती.

दिवसभरात पोलिसांचा चोख बंदोबस्त राहिल्याने सर्वच दुकाने बंद होती. त्याचबरोबर नागरिकही फारसे बाहेर पडताना दिसले नाहीत. अगदी महत्त्वाच्या कामासाठीच नागरिक येजा करत होते. वीकेण्ड लाॅकडाऊनच्या पहिल्या दिवशी नागरिक तसेच व्यापाऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. रविवारी सर्व दुकाने बंद राहणार आहेत.

चाैकट

जिल्हा प्रशासनाने शुक्रवारी रात्री काढलेल्या पुरवणी आदेशानुसार, कृषी उत्पन्न बाजार समितीकडून भाजीपाला, फळे, धान्य, कडधान्ये आदी जीवनावश्यक वस्तूंची खरेदी होत असल्याने कृषी उत्पन्न बाजार समिती सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा म्हणून गॅरेज, सी.ए. यांची कार्यालये, आपले सरकार सेवा केंद्र, सेतू, नागरिक सुविधा केंद्र, पासपोर्ट सेवा केंद्र एक खिडकीचा वापर करून सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. हाॅटेल, बार, रेस्टाॅरंट, ढाबे सुरू राहतील. मात्र, ग्राहकाला बसून सेवा न पुरविता पार्सल सेवा द्यावी लागेल. अत्यावश्यक सेवा म्हणून वृत्तपत्र सेवा, चष्म्याची दुकाने सुरू ठेवता येतील.