शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी - दादर पॅसेंजर चालू करण्यासाठी मनसे आग्रही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:21 IST

रत्नागिरी : दादर - रत्नागिरी - दादर पॅसेंजर रेल्वे चालू करण्यासाठी येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेना आग्रही भूमिकेत असून, या ...

रत्नागिरी : दादर - रत्नागिरी - दादर पॅसेंजर रेल्वे चालू करण्यासाठी येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेना आग्रही भूमिकेत असून, या मागणीचे निवेदन शनिवारी कोकण रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांना देण्यात आले.

हे निवेदन मनसेचे जिल्हा अध्यक्ष जितेंद्र चव्हाण, तालुका अध्यक्ष महेंद्र नागवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपशहरअध्यक्ष अमोल अर्जुन श्रीनाथ यांच्यामार्फत देण्यात आले. या वेळी मनसेचे नाचणे उपविभागअध्यक्ष तथा कुवारबाव ग्रामपंचायत सदस्य गणेश मांडवकर, म.न.वि.से.चे उपतालुका अध्यक्ष अलंकार भोई, राजेश नंदाने, आशिष साळवी तसेच महाराष्ट्र सैनिक व पदाधिकारी उपस्थित होते. या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, रत्नागिरी - दादर पॅसेजर ही रेल्वे गेल्या कित्येक महिन्यांपासून बंद आहे. या रेल्वेचा मार्ग दादर ते रत्नागिरी व रत्नागिरी ते दादर असा होता. परंतु गाडीचा मार्ग बदलून ती गाडी थेट मडगावपर्यंत करण्यात आली. ज्यामुळे कोकणी माणसाची, रत्नागिरीकरांची एकमेव हक्काची गाडीही राहिली नाही. यामुळे प्रथम ही गाडी पहिल्यासारखी दादर-रत्नागिरी-दादर अशी चालू करावी, अशी मागणी यात केली आहे.

मार्च २०२०पासून दादर-रत्नागिरी पॅसेंजर (५०१०३) गाडी बंद आहे. सध्या गणपती सण जवळ येत असून, यासाठी बरेच चाकरमानी कोकणात येत असतात. अन्य गाड्यांमध्ये आरक्षण पटकन मिळत नाही. मिळाले तरी त्यांची तिकिटे सामान्य कोकणी माणसांना परवडणारी नाहीत. सध्या गुजरात, दिल्ली, राजस्थान, केरळ, तमिळनाडू, बंगळुरू आदी राज्यांतील गाड्या चालू आहेत. मग, आमची कोकणातील गाडी बंद का, असा प्रश्नही या निवेदनात करण्यात आला आहे.

रत्नागिरी - दादर पॅसेंजर बंद झाल्याने या गाडीवर उदरनिर्वाह व उपजीविका करणारे अधिकृत मराठी फेरीवाले यांची उपासमार होत आहे. त्यांच्या मुलांचे शिक्षण अडचणीत आले आहे. त्यामुळे ही गाडी चालू झाल्यास त्यांची उपासमार दूर होईल. महाराष्ट्र राज्याच्या बाहेरून येणाऱ्या रेल्वे गाड्यांचे जनरल डबे कोरोनामुळे आरक्षित केले जातात, त्याप्रमाणे या गाडीचेही जनरल डबे आरक्षित करावेत.

कोकणवासीयांच्या या मागणीचा विचार करून ही गाडी मूळ स्थितीत दादर-रत्नागिरी-दादर अशी पुन्हा चालू करावी. चालू न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना रत्नागिरीतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.