शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

रत्नागिरीत कोरोना रुग्णांत पुन्हा वाढ, नवे ३२२ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:33 IST

रत्नागिरी : जिल्हा शासकीय रुग्णालयाने दिलेल्या अहवालानुसार, गेल्या २४ तासांत ८ रुग्णांचा काेराेनाने मृत्यू झाला आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित ...

रत्नागिरी : जिल्हा शासकीय रुग्णालयाने दिलेल्या अहवालानुसार, गेल्या २४ तासांत ८ रुग्णांचा काेराेनाने मृत्यू झाला आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित मृतांच्या आकड्याने २ हजारांचा टप्पा पार केला आहे. त्यातच कोरोना चाचण्या वाढवताच रुग्णही वाढले असून, नव्याने ३२२ रुग्ण सापडले आहेत. काेराेनाबाधितांची एकूण संख्या ७०,२२१ झाली आहे. रुग्ण बरे होण्याच्या संख्येत घट झाली असून, केवळ १७६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत एकूण ६५,४९३ रुग्ण बरे झाले आहेत.

आरोग्य विभागाच्या अहवालानुसार, जिल्ह्यात ७,९१५ कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये मंडणगड तालुक्यात केवळ दोन रुग्ण आढळले आहेत तर दापोली, गुहागर, खेड, राजापूर या तालुक्यांमध्ये रुग्णसंख्येत पुन्हा वाढ झाली आहे. दापाेली तालुक्यात ५२, खेडमध्ये २६, गुहागरात ९३, चिपळुणात १८, संगमेश्वरात २६, रत्नागिरीत ६४, लांजात १५ आणि राजापुरात २६ रुग्ण सापडले आहेत.

जिल्ह्यात कोरोनामुुळे खेड तालुक्यात २, चिपळुणात एक आणि रत्नागिरीत ५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत २,००४ रुग्णांचा मृत्यू झाला असून, रुग्णांचा मृत्यूदर २.८५ टक्के तर रुग्ण बरे होण्याचा दर ९३.२७ टक्के आहे. जिल्ह्यात सध्या २,७२४ बाधितांवर उपचार सुरु असून, त्यामध्ये लक्षणे असलेले रुग्ण ७९९ तर लक्षणे नसलेले रुग्ण १,९२५ आहेत. ऑक्सिजनवर १८२ रुग्ण उपचार घेत आहेत.