शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
2
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
3
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
4
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
5
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
6
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
7
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
8
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
9
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
10
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
11
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
13
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
14
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
15
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
16
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
17
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
18
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
19
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
20
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
Daily Top 2Weekly Top 5

राणे यांच्या मंत्रीपदामुळे रत्नागिरीची समीकरणेही बदलणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना केंद्रात मिळालेल्या कॅबिनेट मंत्रीपदामुळे रत्नागिरीतील राजकीय समीकरणांमध्येही बदल होण्याची ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना केंद्रात मिळालेल्या कॅबिनेट मंत्रीपदामुळे रत्नागिरीतील राजकीय समीकरणांमध्येही बदल होण्याची अपेक्षा केली जात आहे. आतापर्यंत तुलनेने मर्यादित असलेल्या रत्नागिरीतील भाजपला आता संघटनात्मक ताकद वाढवण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. सर्वात मोठी आशा रिफायनरी समर्थकांच्या मनात निर्माण झाली आहे.

कोकणाबद्दल आस्था असलेल्या आणि कोकणाची, इथल्या गरजांची पूर्ण ओळख असलेल्या राणे यांना केंद्रात मंत्रीपद मिळणे ही बाब अनेक अर्थांनी महत्त्वाची आहे. कोकणात शिवसेनेचे प्राबल्य आहे. कोकणात आतापर्यंत कोणताही पक्ष शिवसेनेसमोर फारसा वाढलेला नाही. काँग्रेस गेल्या २५ वर्षांत टप्प्याटप्प्याने संपून गेली आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची वाढ मर्यादितच आहे. शिवसेनेकडे जसे तळागाळात कार्यकर्त्यांचे जाळे आहे, तसे कोणत्याही पक्षाकडे नाही. म्हणूनच ग्रामपंचायतीपासून खासदारकीपर्यंत बहुतांश पदे शिवसेनेकडे आहेत.

खासदारकीसाठी इच्छुक असलेल्या माजी खासदार नीलेश राणे यांच्यासाठी नारायण राणे रत्नागिरीकडे विशेष लक्ष देतील, असे अपेक्षित आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील भाजपला नवसंजीवनी मिळेल, असा अंदाज लावला जात आहे. आतापर्यंत भाजपला समर्थ हात देणारा नेता नव्हता. सक्षम आर्थिक, राजकीय पाठबळ न मिळाल्यामुळे भाजपची वाढ मर्यादितच झाली. कोकणात शिवसेना मोठी असल्याने भाजपने आतापर्यंत रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांकडे पक्षवाढीसाठी लक्षच दिलेले नाही. मात्र, आता राणे यांना मंत्रीपद मिळाल्यामुळे कार्यकर्त्यांची कामे होणे, कार्यकर्त्यांना काम मिळणे, कोणीतरी पाठीशी उभे राहणे या गोष्टी शक्य होणार आहेत.

भाजपने आतापर्यंत शिवसेनेचे प्राबल्य मान्य करुन नांगी टाकली आहे. शिवसेनेच्या कार्यपद्धतीला सामोरे जाण्याची मानसिकता भाजपमध्ये नाही. या दोन्ही पक्षांची काम करण्याची पद्धत पूर्ण वेगळी आहे. मात्र, नारायण राणे यांना ही पद्धत माहिती आहे. त्यामुळे शिवसेनेला सामोरे जाण्याची, शिवसेनेला अंगावर घेण्याची भूमिका त्यांनी आतापर्यंत अनेकदा घेतली आहे. त्याचा आधार भाजपला रत्नागिरीत पक्ष वाढवण्यासाठी हाेऊ शकतो.

लोकांमध्ये फिरताना लोकांकडून सुचवली जाणारी कामे कार्यकर्ते पक्षाकडे मांडतात. ही कामे करण्यानेच पक्ष वाढत जातो. पण आतापर्यंत ही कामे करण्यासाठी रत्नागिरी भाजपकडे कोणी हक्काचा माणूस नव्हता. प्रशासकीय यंत्रणेकडून मिळणारा प्रतिसादही अशावेळी कमी असतो. ही यंत्रणाही सत्ताधारी पक्षांनाच झुकते माप देते. आता राणे यांच्या या मंत्रीपदामुळे भाजपची ती अडचणही दूर होणार आहे.

प्रकल्प समर्थकांना मोठी आशा

उद्योगांबाबत नारायण राणे नेहमीच आग्रही राहिले आहेत. त्यांनी प्रकल्पांना कायम समर्थन दिले आहे. लोकांचा विरोध असेल तर प्रकल्प योग्य कसा आहे, त्याचे फायदे काय आहेत, याची साधकबाधक चर्चा त्यांनी घडवून आणली आहे. अणुऊर्जा प्रकल्पाला टोकाचा विरोध असतानाही लोकांचे मन वळविण्यात त्यांना यश आले आहे. लोकांना अधिकाधिक लाभ मिळवून देण्यातही ते पुढे असतात. त्यामुळे रिफायनरी प्रकल्पाबाबतही ते असाच काहीसा पुढाकार घेतील, अशी आशा रिफायनरी प्रकल्प समर्थकांना वाटत आहे.