शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

राणे यांच्या मंत्रीपदामुळे रत्नागिरीची समीकरणेही बदलणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना केंद्रात मिळालेल्या कॅबिनेट मंत्रीपदामुळे रत्नागिरीतील राजकीय समीकरणांमध्येही बदल होण्याची ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना केंद्रात मिळालेल्या कॅबिनेट मंत्रीपदामुळे रत्नागिरीतील राजकीय समीकरणांमध्येही बदल होण्याची अपेक्षा केली जात आहे. आतापर्यंत तुलनेने मर्यादित असलेल्या रत्नागिरीतील भाजपला आता संघटनात्मक ताकद वाढवण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. सर्वात मोठी आशा रिफायनरी समर्थकांच्या मनात निर्माण झाली आहे.

कोकणाबद्दल आस्था असलेल्या आणि कोकणाची, इथल्या गरजांची पूर्ण ओळख असलेल्या राणे यांना केंद्रात मंत्रीपद मिळणे ही बाब अनेक अर्थांनी महत्त्वाची आहे. कोकणात शिवसेनेचे प्राबल्य आहे. कोकणात आतापर्यंत कोणताही पक्ष शिवसेनेसमोर फारसा वाढलेला नाही. काँग्रेस गेल्या २५ वर्षांत टप्प्याटप्प्याने संपून गेली आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची वाढ मर्यादितच आहे. शिवसेनेकडे जसे तळागाळात कार्यकर्त्यांचे जाळे आहे, तसे कोणत्याही पक्षाकडे नाही. म्हणूनच ग्रामपंचायतीपासून खासदारकीपर्यंत बहुतांश पदे शिवसेनेकडे आहेत.

खासदारकीसाठी इच्छुक असलेल्या माजी खासदार नीलेश राणे यांच्यासाठी नारायण राणे रत्नागिरीकडे विशेष लक्ष देतील, असे अपेक्षित आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील भाजपला नवसंजीवनी मिळेल, असा अंदाज लावला जात आहे. आतापर्यंत भाजपला समर्थ हात देणारा नेता नव्हता. सक्षम आर्थिक, राजकीय पाठबळ न मिळाल्यामुळे भाजपची वाढ मर्यादितच झाली. कोकणात शिवसेना मोठी असल्याने भाजपने आतापर्यंत रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांकडे पक्षवाढीसाठी लक्षच दिलेले नाही. मात्र, आता राणे यांना मंत्रीपद मिळाल्यामुळे कार्यकर्त्यांची कामे होणे, कार्यकर्त्यांना काम मिळणे, कोणीतरी पाठीशी उभे राहणे या गोष्टी शक्य होणार आहेत.

भाजपने आतापर्यंत शिवसेनेचे प्राबल्य मान्य करुन नांगी टाकली आहे. शिवसेनेच्या कार्यपद्धतीला सामोरे जाण्याची मानसिकता भाजपमध्ये नाही. या दोन्ही पक्षांची काम करण्याची पद्धत पूर्ण वेगळी आहे. मात्र, नारायण राणे यांना ही पद्धत माहिती आहे. त्यामुळे शिवसेनेला सामोरे जाण्याची, शिवसेनेला अंगावर घेण्याची भूमिका त्यांनी आतापर्यंत अनेकदा घेतली आहे. त्याचा आधार भाजपला रत्नागिरीत पक्ष वाढवण्यासाठी हाेऊ शकतो.

लोकांमध्ये फिरताना लोकांकडून सुचवली जाणारी कामे कार्यकर्ते पक्षाकडे मांडतात. ही कामे करण्यानेच पक्ष वाढत जातो. पण आतापर्यंत ही कामे करण्यासाठी रत्नागिरी भाजपकडे कोणी हक्काचा माणूस नव्हता. प्रशासकीय यंत्रणेकडून मिळणारा प्रतिसादही अशावेळी कमी असतो. ही यंत्रणाही सत्ताधारी पक्षांनाच झुकते माप देते. आता राणे यांच्या या मंत्रीपदामुळे भाजपची ती अडचणही दूर होणार आहे.

प्रकल्प समर्थकांना मोठी आशा

उद्योगांबाबत नारायण राणे नेहमीच आग्रही राहिले आहेत. त्यांनी प्रकल्पांना कायम समर्थन दिले आहे. लोकांचा विरोध असेल तर प्रकल्प योग्य कसा आहे, त्याचे फायदे काय आहेत, याची साधकबाधक चर्चा त्यांनी घडवून आणली आहे. अणुऊर्जा प्रकल्पाला टोकाचा विरोध असतानाही लोकांचे मन वळविण्यात त्यांना यश आले आहे. लोकांना अधिकाधिक लाभ मिळवून देण्यातही ते पुढे असतात. त्यामुळे रिफायनरी प्रकल्पाबाबतही ते असाच काहीसा पुढाकार घेतील, अशी आशा रिफायनरी प्रकल्प समर्थकांना वाटत आहे.