शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

राजापूरची नवीन पूरररेषा शहरवासीयांसाठी ठरणार डाेकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:21 IST

राजापूर : प्रतिकूल भौगोलिक रचनेमुळे राजापूर शहराचा विकास रखडला असताना त्यात जाचक पूररेषेची भर पडली आहे. गेली ३८ ...

राजापूर : प्रतिकूल भौगोलिक रचनेमुळे राजापूर शहराचा विकास रखडला असताना त्यात जाचक पूररेषेची भर पडली आहे. गेली ३८ वर्षे राजापूरवासीयांची डोकेदुखी बनलेली ही पूररेषा आणि त्यातील निर्बंध काढून टाकण्यात यावे, अशी मागणी होत असताना शासनाच्या पाटबंधारे विभागाने परस्पर नव्याने बदल करून आखलेल्या पूररेषेत नव्याने अधिकचे क्षेत्र समाविष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे पूररेषेमुळे अगोदरच त्रस्त असलेल्या नागरिकांच्या अडचणीत वाढ होणार असून त्याचा प्रतिकूल परिणाम शहर विकासावर होणार आहे.

सन २००८ साली करण्यात आलेल्या शहर विकास आराखड्यात राजापूर शहराची पूररेषा निश्चित करण्यात आली आहे. परंतु, सहायक अधीक्षक अभियंता रत्नागिरी पाटबंधारे मंडळ रत्नागिरी यांच्यातर्फे नव्याने बदल करून सुधारित पूररेषा वेबसाईटवर प्रसद्ध केली आहे. पूररेषा सुधारित करताना नगर परिषदेला कोणतीही कल्पना देण्यात आलेली नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी आणि नागरिकांना न जुमानता पाटबंधारे विभागाने ही नव्याने पूररेषा आखण्याचे नेमके कारण काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

नव्याने आखण्यात आलेल्या या पूररेषेत ज्या क्षेत्रामध्ये कधीही पूर आलेला नाही असे बरेचसे क्षेत्र प्रत्यक्ष वस्तुस्थितीची पाहणी न करता पूररेषेमध्ये दर्शविण्यात आले आहे. सन २००८ च्या पूररेषेनुसार रहिवास क्षेत्रात समाविष्ट असलेल्या व आता सुधारित पूररेषेनुसार पूररेषेत येत असलेल्या रहिवाशांना विनाकारण त्रासाला सामोरे जावे लागणार आहे. ही पूररेषा निश्चित करताना प्रत्यक्ष साईटवर न येता गुगल मॅपवरून निश्चित केल्याचे सांगितले जात आहे. पूररेषेमुळे अगोदरच शहराचा विकास खुंटलेला असताना या नव्या पूररेषेची अंमलबजावणी झाल्यास शहराच्या विकासावर बंधने येणार असून या पूररेषेच्या जाचक निर्बंधात नागरिक भरडले जाणार आहेत.

या नव्याने आखण्यात आलेल्या पूररेषेत भटाळीतील आयसीआयसीआय बँक परिसर, हॉटेल संतोष, डॉ. खलिफे हॉस्पिटल, कोकण बँक, राजकिरण नॉव्हेल्टी, तर मुन्शी नाका परिसरातून दोस्ती मेडिकलपर्यंतचा भाग या रेषेत नव्याने समाविष्ट करण्यात आला आहे. जाचक निर्बंधामुळे नागरिकांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत असताना त्यात नव्या नागरिकांची भर पडणार आहे, तर या भागात बांधकामांना परवानगी देता येत नसल्याने नगर परिषदेच्या कर उत्पन्नावरही त्याचा परिणाम होत आहे. शहराच्या एकूणच विकास प्रक्रियेतही ही पूररेषा अडचणीची ठरत आहे.