शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

राजापूरची नवीन पूरररेषा शहरवासीयांसाठी ठरणार डाेकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:21 IST

राजापूर : प्रतिकूल भौगोलिक रचनेमुळे राजापूर शहराचा विकास रखडला असताना त्यात जाचक पूररेषेची भर पडली आहे. गेली ३८ ...

राजापूर : प्रतिकूल भौगोलिक रचनेमुळे राजापूर शहराचा विकास रखडला असताना त्यात जाचक पूररेषेची भर पडली आहे. गेली ३८ वर्षे राजापूरवासीयांची डोकेदुखी बनलेली ही पूररेषा आणि त्यातील निर्बंध काढून टाकण्यात यावे, अशी मागणी होत असताना शासनाच्या पाटबंधारे विभागाने परस्पर नव्याने बदल करून आखलेल्या पूररेषेत नव्याने अधिकचे क्षेत्र समाविष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे पूररेषेमुळे अगोदरच त्रस्त असलेल्या नागरिकांच्या अडचणीत वाढ होणार असून त्याचा प्रतिकूल परिणाम शहर विकासावर होणार आहे.

सन २००८ साली करण्यात आलेल्या शहर विकास आराखड्यात राजापूर शहराची पूररेषा निश्चित करण्यात आली आहे. परंतु, सहायक अधीक्षक अभियंता रत्नागिरी पाटबंधारे मंडळ रत्नागिरी यांच्यातर्फे नव्याने बदल करून सुधारित पूररेषा वेबसाईटवर प्रसद्ध केली आहे. पूररेषा सुधारित करताना नगर परिषदेला कोणतीही कल्पना देण्यात आलेली नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी आणि नागरिकांना न जुमानता पाटबंधारे विभागाने ही नव्याने पूररेषा आखण्याचे नेमके कारण काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

नव्याने आखण्यात आलेल्या या पूररेषेत ज्या क्षेत्रामध्ये कधीही पूर आलेला नाही असे बरेचसे क्षेत्र प्रत्यक्ष वस्तुस्थितीची पाहणी न करता पूररेषेमध्ये दर्शविण्यात आले आहे. सन २००८ च्या पूररेषेनुसार रहिवास क्षेत्रात समाविष्ट असलेल्या व आता सुधारित पूररेषेनुसार पूररेषेत येत असलेल्या रहिवाशांना विनाकारण त्रासाला सामोरे जावे लागणार आहे. ही पूररेषा निश्चित करताना प्रत्यक्ष साईटवर न येता गुगल मॅपवरून निश्चित केल्याचे सांगितले जात आहे. पूररेषेमुळे अगोदरच शहराचा विकास खुंटलेला असताना या नव्या पूररेषेची अंमलबजावणी झाल्यास शहराच्या विकासावर बंधने येणार असून या पूररेषेच्या जाचक निर्बंधात नागरिक भरडले जाणार आहेत.

या नव्याने आखण्यात आलेल्या पूररेषेत भटाळीतील आयसीआयसीआय बँक परिसर, हॉटेल संतोष, डॉ. खलिफे हॉस्पिटल, कोकण बँक, राजकिरण नॉव्हेल्टी, तर मुन्शी नाका परिसरातून दोस्ती मेडिकलपर्यंतचा भाग या रेषेत नव्याने समाविष्ट करण्यात आला आहे. जाचक निर्बंधामुळे नागरिकांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत असताना त्यात नव्या नागरिकांची भर पडणार आहे, तर या भागात बांधकामांना परवानगी देता येत नसल्याने नगर परिषदेच्या कर उत्पन्नावरही त्याचा परिणाम होत आहे. शहराच्या एकूणच विकास प्रक्रियेतही ही पूररेषा अडचणीची ठरत आहे.