शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
5
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
6
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
7
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
8
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
9
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
10
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
11
नाशिकचे बडगुजर अखेर भाजपमध्ये; बावनकुळे यांनी केले स्वागत!
12
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
13
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
14
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
15
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!
16
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
17
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
18
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
19
पती, सासरच्या लोकांवर निराधार लैंगिक आरोप करणे हे मानसिक क्रौर्य: उच्च न्यायालय
20
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली

राजापूरची नवीन पूरररेषा शहरवासीयांसाठी ठरणार डाेकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:21 IST

राजापूर : प्रतिकूल भौगोलिक रचनेमुळे राजापूर शहराचा विकास रखडला असताना त्यात जाचक पूररेषेची भर पडली आहे. गेली ३८ ...

राजापूर : प्रतिकूल भौगोलिक रचनेमुळे राजापूर शहराचा विकास रखडला असताना त्यात जाचक पूररेषेची भर पडली आहे. गेली ३८ वर्षे राजापूरवासीयांची डोकेदुखी बनलेली ही पूररेषा आणि त्यातील निर्बंध काढून टाकण्यात यावे, अशी मागणी होत असताना शासनाच्या पाटबंधारे विभागाने परस्पर नव्याने बदल करून आखलेल्या पूररेषेत नव्याने अधिकचे क्षेत्र समाविष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे पूररेषेमुळे अगोदरच त्रस्त असलेल्या नागरिकांच्या अडचणीत वाढ होणार असून त्याचा प्रतिकूल परिणाम शहर विकासावर होणार आहे.

सन २००८ साली करण्यात आलेल्या शहर विकास आराखड्यात राजापूर शहराची पूररेषा निश्चित करण्यात आली आहे. परंतु, सहायक अधीक्षक अभियंता रत्नागिरी पाटबंधारे मंडळ रत्नागिरी यांच्यातर्फे नव्याने बदल करून सुधारित पूररेषा वेबसाईटवर प्रसद्ध केली आहे. पूररेषा सुधारित करताना नगर परिषदेला कोणतीही कल्पना देण्यात आलेली नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी आणि नागरिकांना न जुमानता पाटबंधारे विभागाने ही नव्याने पूररेषा आखण्याचे नेमके कारण काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

नव्याने आखण्यात आलेल्या या पूररेषेत ज्या क्षेत्रामध्ये कधीही पूर आलेला नाही असे बरेचसे क्षेत्र प्रत्यक्ष वस्तुस्थितीची पाहणी न करता पूररेषेमध्ये दर्शविण्यात आले आहे. सन २००८ च्या पूररेषेनुसार रहिवास क्षेत्रात समाविष्ट असलेल्या व आता सुधारित पूररेषेनुसार पूररेषेत येत असलेल्या रहिवाशांना विनाकारण त्रासाला सामोरे जावे लागणार आहे. ही पूररेषा निश्चित करताना प्रत्यक्ष साईटवर न येता गुगल मॅपवरून निश्चित केल्याचे सांगितले जात आहे. पूररेषेमुळे अगोदरच शहराचा विकास खुंटलेला असताना या नव्या पूररेषेची अंमलबजावणी झाल्यास शहराच्या विकासावर बंधने येणार असून या पूररेषेच्या जाचक निर्बंधात नागरिक भरडले जाणार आहेत.

या नव्याने आखण्यात आलेल्या पूररेषेत भटाळीतील आयसीआयसीआय बँक परिसर, हॉटेल संतोष, डॉ. खलिफे हॉस्पिटल, कोकण बँक, राजकिरण नॉव्हेल्टी, तर मुन्शी नाका परिसरातून दोस्ती मेडिकलपर्यंतचा भाग या रेषेत नव्याने समाविष्ट करण्यात आला आहे. जाचक निर्बंधामुळे नागरिकांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत असताना त्यात नव्या नागरिकांची भर पडणार आहे, तर या भागात बांधकामांना परवानगी देता येत नसल्याने नगर परिषदेच्या कर उत्पन्नावरही त्याचा परिणाम होत आहे. शहराच्या एकूणच विकास प्रक्रियेतही ही पूररेषा अडचणीची ठरत आहे.