शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक भारतीय संतापलाय..."; पंतप्रधान मोदी यांचा CJI गवईंना फोन, हल्ल्याचा केला निषेध
2
अभिनेता विजय देवरकोंडा याच्या कारला अपघात, दुसऱ्या कारने मागून दिली धडक
3
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामना, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
4
हनिट्रॅप, शारीरिक संबंध आणि पैशांची मागणी, निवृत्त अधिकाऱ्यांना जाळ्यात अडकवणारी सुंदरी अशी सापडली
5
न्यूझीलंड विरुद्ध तझमिनची विक्रमी सेंच्युरी; स्मृती पडली मागे! दक्षिण आफ्रिकेचा पहिला विजय
6
तुमचा मित्र कुठे आहे? सहज शोधू शकाल, इन्स्टाग्रामने आणलं खास फिचर, मिळेल अशी माहिती
7
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
8
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
9
‘मेट्रो  ९ मार्गिका १५ डिसेंबरपर्यंत आणि मेट्रो ४ मार्गिका ३१ डिसेंबर पर्यंत सुरू करा’, परिवहन मंत्र्यांचे आदेश 
10
भारताविरूद्ध 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानच्या महिला फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा
11
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
12
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
13
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
14
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
15
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
16
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
17
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
18
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
19
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
20
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम

राजापूरची नवीन पूरररेषा शहरवासीयांसाठी ठरणार डाेकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:21 IST

राजापूर : प्रतिकूल भौगोलिक रचनेमुळे राजापूर शहराचा विकास रखडला असताना त्यात जाचक पूररेषेची भर पडली आहे. गेली ३८ ...

राजापूर : प्रतिकूल भौगोलिक रचनेमुळे राजापूर शहराचा विकास रखडला असताना त्यात जाचक पूररेषेची भर पडली आहे. गेली ३८ वर्षे राजापूरवासीयांची डोकेदुखी बनलेली ही पूररेषा आणि त्यातील निर्बंध काढून टाकण्यात यावे, अशी मागणी होत असताना शासनाच्या पाटबंधारे विभागाने परस्पर नव्याने बदल करून आखलेल्या पूररेषेत नव्याने अधिकचे क्षेत्र समाविष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे पूररेषेमुळे अगोदरच त्रस्त असलेल्या नागरिकांच्या अडचणीत वाढ होणार असून त्याचा प्रतिकूल परिणाम शहर विकासावर होणार आहे.

सन २००८ साली करण्यात आलेल्या शहर विकास आराखड्यात राजापूर शहराची पूररेषा निश्चित करण्यात आली आहे. परंतु, सहायक अधीक्षक अभियंता रत्नागिरी पाटबंधारे मंडळ रत्नागिरी यांच्यातर्फे नव्याने बदल करून सुधारित पूररेषा वेबसाईटवर प्रसद्ध केली आहे. पूररेषा सुधारित करताना नगर परिषदेला कोणतीही कल्पना देण्यात आलेली नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी आणि नागरिकांना न जुमानता पाटबंधारे विभागाने ही नव्याने पूररेषा आखण्याचे नेमके कारण काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

नव्याने आखण्यात आलेल्या या पूररेषेत ज्या क्षेत्रामध्ये कधीही पूर आलेला नाही असे बरेचसे क्षेत्र प्रत्यक्ष वस्तुस्थितीची पाहणी न करता पूररेषेमध्ये दर्शविण्यात आले आहे. सन २००८ च्या पूररेषेनुसार रहिवास क्षेत्रात समाविष्ट असलेल्या व आता सुधारित पूररेषेनुसार पूररेषेत येत असलेल्या रहिवाशांना विनाकारण त्रासाला सामोरे जावे लागणार आहे. ही पूररेषा निश्चित करताना प्रत्यक्ष साईटवर न येता गुगल मॅपवरून निश्चित केल्याचे सांगितले जात आहे. पूररेषेमुळे अगोदरच शहराचा विकास खुंटलेला असताना या नव्या पूररेषेची अंमलबजावणी झाल्यास शहराच्या विकासावर बंधने येणार असून या पूररेषेच्या जाचक निर्बंधात नागरिक भरडले जाणार आहेत.

या नव्याने आखण्यात आलेल्या पूररेषेत भटाळीतील आयसीआयसीआय बँक परिसर, हॉटेल संतोष, डॉ. खलिफे हॉस्पिटल, कोकण बँक, राजकिरण नॉव्हेल्टी, तर मुन्शी नाका परिसरातून दोस्ती मेडिकलपर्यंतचा भाग या रेषेत नव्याने समाविष्ट करण्यात आला आहे. जाचक निर्बंधामुळे नागरिकांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत असताना त्यात नव्या नागरिकांची भर पडणार आहे, तर या भागात बांधकामांना परवानगी देता येत नसल्याने नगर परिषदेच्या कर उत्पन्नावरही त्याचा परिणाम होत आहे. शहराच्या एकूणच विकास प्रक्रियेतही ही पूररेषा अडचणीची ठरत आहे.