शहरं
Join us  
Trending Stories
1
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
2
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
3
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
4
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
5
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
6
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
7
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
8
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
9
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
10
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
11
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
12
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
13
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
14
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
15
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
16
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
17
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
18
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
19
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
20
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...

राजापूर तालुक्यात ग्रामीण भागातील दळणवळण सेवा ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:33 IST

राजापूर : राजापूर शहर आणि तालुका परिसरात गेल्या काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीने ग्रामीण भागाला जोरदार तडाखा बसला आहे. ग्रामीण ...

राजापूर : राजापूर शहर आणि तालुका परिसरात गेल्या काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीने ग्रामीण भागाला जोरदार तडाखा बसला आहे. ग्रामीण भागातील अनेक रस्ते, पूल, साकव, पायवाटा या अतिवृष्टीत वाहून गेल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील गाव आणि वाडी-वस्तीवरील संपर्क तुटला असून, सर्वसामान्य जनतेची आता मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे विकासाच्या पोकळ गप्पा मारणाऱ्या आणि आजपर्यंत केवळ पाखाड्या आणि सरंक्षण भिंती हाच विकास यात अडकून पडलेल्या शिवसेनेच्या आमदार आणि खासदारांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन या सुविधा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

दरवर्षीच अतिवृष्टीत वाहून जाणारे रस्ते, पूल, साकव आणि पायवाटा पाहिल्यावर या कामांच्या दर्जाबाबतही आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. कार्यकर्त्यांची सोय लावण्यासाठी केल्या जाणाऱ्या या कामांचा दर्जा चांगला नसल्यानेच आज ग्रामीण भागातील जनतेच्या पदरी अशी उपेक्षा येत असल्याचेही यातून उघड झाले आहे. अर्जुना आणि जामदा नदीच्या पुराच्या पाण्यात या भागातील अनेक रस्ते, साकव वाहून गेले आहेत. तालुक्यातील पाचल-तळवडे रस्त्यावरील पूल वाहून गेला आहे; तर राजापूर, हर्डी, रानतळे, धारतळे मार्ग सुमारे पाच ते सात फूट खचला आहे. त्यामुळे या दोन्ही मार्गावरील अवजड वाहतूक बंद करण्यात आली आहे. ओणी - शिवणे, पाचल - काजिर्डा, डोंगर - जैतापूर या मार्गावर दरडी कोसळण्याचे प्रकार घडत आहेत. या ठिकाणी भविष्यात संरक्षण भिंती बांधणे आवश्यक आहे; तर रायपाटण-बागवेवाडी, मिळंद-हातदे, सावडाव-नेर्ले मार्गावर नदीवरील साकव या पुरात वाहून गेल्याने या भागातील जनतेचा संपर्क तुटला आहे.

राजापूर, शीळ, गोठणेदोनिवडे चिखलगाव रस्ता तर गेली दहा ते बारा दिवस पाण्याखाली होता. त्यामुळे या भागातील जनतेला यावर्षीही यातायात सहन करावी लागली आहे. अनेक भागात पाखाड्या, संरक्षण भिंती ढासळल्या आहेत. राजापूर-ओणी-पाचल-अणुस्कुरा मार्गावरील दरडी काढणे, रस्ता डांबरीकरण करणे, रूंदीकरण करणे यासाठी कोटयवधी रुपये खर्चूनही या पावसाळ्यात या घाटात पाच ते सहा ठिकाणी दरडी कोसळल्या व हा मार्ग वाहतुकीला बंद झाला होता. मात्र या ठिकाणी कोसळणाऱ्या दरडींवर कायमस्वरूपी उपाययोजना करणे आवश्यक आहे.

--------------------------

दुरूस्तीसाठी हवेत ३११ काेटी

सार्वजनिक बांधकाम आणि जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अखत्यारित अनेक रस्ते, साकव व पुलांची हानी झाली आहे. जिल्हा परिषद बांधकाम उपविभागअंतर्गत ८१ रस्ते, १० साकव आणि कॉजवे, तर दोन शासकीय इमारती यामध्ये बाधित झाल्या आहेत. त्यासाठी ३११ कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे.