शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
2
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
3
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
4
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
5
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
6
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
7
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
8
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
9
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
10
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
11
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
12
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
13
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
14
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
15
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
17
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
18
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
19
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
20
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

राजापूर तालुक्यात ग्रामीण भागातील दळणवळण सेवा ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:33 IST

राजापूर : राजापूर शहर आणि तालुका परिसरात गेल्या काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीने ग्रामीण भागाला जोरदार तडाखा बसला आहे. ग्रामीण ...

राजापूर : राजापूर शहर आणि तालुका परिसरात गेल्या काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीने ग्रामीण भागाला जोरदार तडाखा बसला आहे. ग्रामीण भागातील अनेक रस्ते, पूल, साकव, पायवाटा या अतिवृष्टीत वाहून गेल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील गाव आणि वाडी-वस्तीवरील संपर्क तुटला असून, सर्वसामान्य जनतेची आता मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे विकासाच्या पोकळ गप्पा मारणाऱ्या आणि आजपर्यंत केवळ पाखाड्या आणि सरंक्षण भिंती हाच विकास यात अडकून पडलेल्या शिवसेनेच्या आमदार आणि खासदारांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन या सुविधा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

दरवर्षीच अतिवृष्टीत वाहून जाणारे रस्ते, पूल, साकव आणि पायवाटा पाहिल्यावर या कामांच्या दर्जाबाबतही आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. कार्यकर्त्यांची सोय लावण्यासाठी केल्या जाणाऱ्या या कामांचा दर्जा चांगला नसल्यानेच आज ग्रामीण भागातील जनतेच्या पदरी अशी उपेक्षा येत असल्याचेही यातून उघड झाले आहे. अर्जुना आणि जामदा नदीच्या पुराच्या पाण्यात या भागातील अनेक रस्ते, साकव वाहून गेले आहेत. तालुक्यातील पाचल-तळवडे रस्त्यावरील पूल वाहून गेला आहे; तर राजापूर, हर्डी, रानतळे, धारतळे मार्ग सुमारे पाच ते सात फूट खचला आहे. त्यामुळे या दोन्ही मार्गावरील अवजड वाहतूक बंद करण्यात आली आहे. ओणी - शिवणे, पाचल - काजिर्डा, डोंगर - जैतापूर या मार्गावर दरडी कोसळण्याचे प्रकार घडत आहेत. या ठिकाणी भविष्यात संरक्षण भिंती बांधणे आवश्यक आहे; तर रायपाटण-बागवेवाडी, मिळंद-हातदे, सावडाव-नेर्ले मार्गावर नदीवरील साकव या पुरात वाहून गेल्याने या भागातील जनतेचा संपर्क तुटला आहे.

राजापूर, शीळ, गोठणेदोनिवडे चिखलगाव रस्ता तर गेली दहा ते बारा दिवस पाण्याखाली होता. त्यामुळे या भागातील जनतेला यावर्षीही यातायात सहन करावी लागली आहे. अनेक भागात पाखाड्या, संरक्षण भिंती ढासळल्या आहेत. राजापूर-ओणी-पाचल-अणुस्कुरा मार्गावरील दरडी काढणे, रस्ता डांबरीकरण करणे, रूंदीकरण करणे यासाठी कोटयवधी रुपये खर्चूनही या पावसाळ्यात या घाटात पाच ते सहा ठिकाणी दरडी कोसळल्या व हा मार्ग वाहतुकीला बंद झाला होता. मात्र या ठिकाणी कोसळणाऱ्या दरडींवर कायमस्वरूपी उपाययोजना करणे आवश्यक आहे.

--------------------------

दुरूस्तीसाठी हवेत ३११ काेटी

सार्वजनिक बांधकाम आणि जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अखत्यारित अनेक रस्ते, साकव व पुलांची हानी झाली आहे. जिल्हा परिषद बांधकाम उपविभागअंतर्गत ८१ रस्ते, १० साकव आणि कॉजवे, तर दोन शासकीय इमारती यामध्ये बाधित झाल्या आहेत. त्यासाठी ३११ कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे.