शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

राजापूर तालुक्यात ग्रामीण भागातील दळणवळण सेवा ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:33 IST

राजापूर : राजापूर शहर आणि तालुका परिसरात गेल्या काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीने ग्रामीण भागाला जोरदार तडाखा बसला आहे. ग्रामीण ...

राजापूर : राजापूर शहर आणि तालुका परिसरात गेल्या काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीने ग्रामीण भागाला जोरदार तडाखा बसला आहे. ग्रामीण भागातील अनेक रस्ते, पूल, साकव, पायवाटा या अतिवृष्टीत वाहून गेल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील गाव आणि वाडी-वस्तीवरील संपर्क तुटला असून, सर्वसामान्य जनतेची आता मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे विकासाच्या पोकळ गप्पा मारणाऱ्या आणि आजपर्यंत केवळ पाखाड्या आणि सरंक्षण भिंती हाच विकास यात अडकून पडलेल्या शिवसेनेच्या आमदार आणि खासदारांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन या सुविधा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

दरवर्षीच अतिवृष्टीत वाहून जाणारे रस्ते, पूल, साकव आणि पायवाटा पाहिल्यावर या कामांच्या दर्जाबाबतही आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. कार्यकर्त्यांची सोय लावण्यासाठी केल्या जाणाऱ्या या कामांचा दर्जा चांगला नसल्यानेच आज ग्रामीण भागातील जनतेच्या पदरी अशी उपेक्षा येत असल्याचेही यातून उघड झाले आहे. अर्जुना आणि जामदा नदीच्या पुराच्या पाण्यात या भागातील अनेक रस्ते, साकव वाहून गेले आहेत. तालुक्यातील पाचल-तळवडे रस्त्यावरील पूल वाहून गेला आहे; तर राजापूर, हर्डी, रानतळे, धारतळे मार्ग सुमारे पाच ते सात फूट खचला आहे. त्यामुळे या दोन्ही मार्गावरील अवजड वाहतूक बंद करण्यात आली आहे. ओणी - शिवणे, पाचल - काजिर्डा, डोंगर - जैतापूर या मार्गावर दरडी कोसळण्याचे प्रकार घडत आहेत. या ठिकाणी भविष्यात संरक्षण भिंती बांधणे आवश्यक आहे; तर रायपाटण-बागवेवाडी, मिळंद-हातदे, सावडाव-नेर्ले मार्गावर नदीवरील साकव या पुरात वाहून गेल्याने या भागातील जनतेचा संपर्क तुटला आहे.

राजापूर, शीळ, गोठणेदोनिवडे चिखलगाव रस्ता तर गेली दहा ते बारा दिवस पाण्याखाली होता. त्यामुळे या भागातील जनतेला यावर्षीही यातायात सहन करावी लागली आहे. अनेक भागात पाखाड्या, संरक्षण भिंती ढासळल्या आहेत. राजापूर-ओणी-पाचल-अणुस्कुरा मार्गावरील दरडी काढणे, रस्ता डांबरीकरण करणे, रूंदीकरण करणे यासाठी कोटयवधी रुपये खर्चूनही या पावसाळ्यात या घाटात पाच ते सहा ठिकाणी दरडी कोसळल्या व हा मार्ग वाहतुकीला बंद झाला होता. मात्र या ठिकाणी कोसळणाऱ्या दरडींवर कायमस्वरूपी उपाययोजना करणे आवश्यक आहे.

--------------------------

दुरूस्तीसाठी हवेत ३११ काेटी

सार्वजनिक बांधकाम आणि जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अखत्यारित अनेक रस्ते, साकव व पुलांची हानी झाली आहे. जिल्हा परिषद बांधकाम उपविभागअंतर्गत ८१ रस्ते, १० साकव आणि कॉजवे, तर दोन शासकीय इमारती यामध्ये बाधित झाल्या आहेत. त्यासाठी ३११ कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे.