शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

राजापुरात संततधार, पूरस्थिती कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:22 IST

हातिवलेत रस्ता खचला राजापुरात संततधार, चौथ्या दिवशीही पूरस्थिती कायम हातिवलेत रस्ता खचला - हातिवलेत रस्ता खचला - शीळ-सौंदळ मार्ग ...

हातिवलेत रस्ता खचला

राजापुरात संततधार, चौथ्या दिवशीही पूरस्थिती कायम

हातिवलेत रस्ता खचला

- हातिवलेत रस्ता खचला

- शीळ-सौंदळ मार्ग पाच दिवस बंद

- ग्रामीण भागातील एसटी सेवा ठप्प

लाेकमत न्यूज नेटवर्क

राजापूर : गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात संततधार सुरूच असून, गुरुवारी चौथ्या दिवशीही अर्जुना आणि कोदवली नदी दुथडी भरून वाहत आहेत. पुराच्या शक्यतेने शहर बाजारपेठेतील व्यापारी आणि नागरिक सतर्क झाले आहेत. तर अर्जुना नदीला आलेल्या पुरामुळे सलग चौथ्या दिवशी शीळ-चिखलगाव मार्ग पाण्याखाली असून, शहरातील चिंचबांध रस्ताही पाण्याखाली राहिला आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांची मोठी गैरसोय निर्माण झाली आहे.

दरम्यान, अतिवृष्टीमुळे ग्रामीण भागातील सर्व एस. टी. फेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत. तर तालुक्यात किरकोळ पडझडीच्या घटना वगळता मोठे नुकसान झाल्याचे वृत्त नाही. तालुक्यात बुधवारी १०७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर तालुक्यात २२७१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. रविवारी सायंकाळपासून तालुक्यात पावसाने जोर धरला आहे. त्यामुळे अर्जुना आणि कोदवली नद्यांना पूर आला आहे. बुधवारी हातिवले - शिंदेवाडी येथे गावात जाणाऱ्या रस्त्यालगतची जमीन खचली आहे. गोठणे दोनिवडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मागील संरक्षण भिंत कोसळली आहे. या किरकोळ पडझडीच्या घटना वगळता तालुक्यात मोठी हानी झालेली नसल्याची माहिती तहसीलदार प्रतिभा वराळे यांनी दिली आहे.

----------------------

शीळ-चिखलगाव मार्ग पाण्याखाली

सातत्याने मागणी करूनही शीळ-चिखलगाव रस्त्याची उंची वाढविणे आणि नव्या पुलाखालील नदीपात्रातील मातीचा भराव आणि गाळ न काढल्याने गेले चार दिवस शीळ-चिखलगाव रस्त्यावर पुराचे पाणी येऊन हा मार्ग पाण्याखाली राहिला आहे. त्यामुळे या भागातील शीळ, चिखलगाव, गोठणे, दोनिवडे, आंगले, फुफेरे या भागातील नागरिकांना ओणी सोैंदळ मार्गे फेरा घालत घर गाठावे लागत आहे.

--------------------------

ग्रामीण भागातील एस. टी. सेवा बंद

अतिवृष्टीमुळे नदी, नाल्यांना आलेल्या पुरामुळे तालुक्याच्या ग्रामीण भागातील एस. टी. फेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत. केवळ राजापूर-येरडव आणि राजापूर-रत्नागिरी या मार्गावर एस. टी. वाहतूक सुरू ठेवण्यात आल्याची माहिती आगारप्रमुख राजेश पाथरे यांनी दिली आहे.

------------------------------

टपरी व्यावसायिकांना फटका

गेल्या चार दिवसांपासून शहर बाजारपेठेत पूरसदृश स्थिती निर्माण झाल्याने व पुराचे पाणी शहरातील जवाहरचौक व शिवाजी पथ भागात येण्याच्या शक्यतेने या भागातील छोटे व्यावसायिक, पान टपरी व्यावसायिक यांना फटका बसला आहे. गेल्या चार दिवसांपासून ही दुकाने बंद असल्याने त्याचा फटका व्यावसायिकांना बसला आहे.

------------------------

भातपीकाला फटका

पावसामुळे शीळ, गोठणे दोनिवडे, चिखलगाव, आंगले, दोनिवडे, उन्हाळे, कोदवली, खरवते, ओणी, सौंदळ, पाचल, रायपाटण, येळवण, तळवडे व पूर्वभागात अनेक गावांतील तसेच गोवळ, शिवणे, तारळ, उपळे, प्रिंंदावण या परिसरात माेठ्या प्रमाणावर भातशेती पाण्याखाली गेली आहे.