शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना सुनावले खडेबोल  
2
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
3
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
4
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
5
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
6
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
7
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
8
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
9
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
10
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
11
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
12
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
13
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
14
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
15
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
16
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
17
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
18
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
19
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
20
नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात

राजापूर पोलिसांनी मागितली माफी

By admin | Updated: March 3, 2015 00:32 IST

बोगस दाखले प्रकरण : तहसीलदारांना दिले पत्र, ताब्यात घेतलेला दस्तऐवज परत

राजापूर : बोगस दाखले प्रकरणाचा तपास करताना सेतू कार्यालयातील कर्मचाऱ्यांना दमदाटी करत तहसीलदारांची कोणतीही परवानगी न घेता राजापूर पोलिसांनी नेलेला दस्तऐवज अखेर तहसीलदारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करताच रितसर पत्रान्वये पुन्हा राजापूर तहसीलदारांकडे जमा केला आहे. मात्र, या दस्तऐवजात काही बदल झाला असल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी राजापूर पोलिसांचीच राहील, असे तहसीलदार गुरुनाथ हुन्नरे यांनी स्पष्ट केले आहे.प्रांतांचे सील वापरुन खोट्या सह्या करून बोगस दाखले दिल्याचे प्रकरण गेले तीन आठवडे राजापुरात चांगलेच गाजत आहे. मात्र, पोलिसांच्या तपासावर सर्वसामान्यांमधून शंका व्यक्त करण्यात येत होती. या प्रकरणाचा तपास सुरु असताना तालुक्यातील सर्व वृत्तपत्रांच्या कार्यालयात पोस्टाव्दारे अज्ञाताने दोन बोगस दाखले पाठवले होते.या दाखल्यांवर राजापूर सेतू कार्यालयाचा लोगो असल्यामुळे या प्रकरणाचा तपास करताना राजापूर पोलिसांनी आपला मोर्चा सेतू कार्यालयाकडे वळवला होता. अचानकपणे सेतू कार्यालयात तपासासाठी जाताना राजापूर पोलिसांनी याबाबतची कोणतीही कल्पना तहसीलदारांना दिली नव्हती. उलट राजापूर सेतू कार्यालयात विनापरवाना घुसून कर्मचाऱ्यांना दमदाटी करत तेथील काही दस्तऐवज हस्तगत केला गेला होता.या सर्व प्रकारामुळे राजापूरचे तहसीलदार गुरुनाथ हुन्नरे यांनी पोलिसांच्या या कृतीवर नाराजी व्यक्त करत याबाबतची लेखी तक्रार जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली होती. त्यानंतर वरिष्ठ कार्यालयाकडून समज येताच पोलिसांनी नरमाईची भूमिका घेत तहसीलदारांच्या अपरोक्ष गेलेला सेतू कार्यालयातील दस्तऐवज पुन्हा आणून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोणत्याही प्रकारे लेखी न देता तसे दस्तऐवज स्विकारण्यास राजापूर तहसीलदारानी स्पष्ट नकार दिला व अगोदर विनापरवाना गेलेला दस्तऐवज जबाबदार अधिकाऱ्यांच्या लेखी पत्रानिशी सादर करावा, असे फर्मावले. त्यामुळे हतबल झालेल्या राजापूर पोलिसांनी संबंधित दस्तऐवज अखेर लेखी पत्रानिशी राजापूर तहसीलदारांच्या ताब्यात देऊन आपली सुटका करून घेतली.दरम्यान, याप्रकरणी राजापूर पोलिसांना अन्य कोणत्याही प्रकारचे दस्तऐवज हवे असल्यास त्यांना लेखी पत्रानंतर देण्यात येतील, तसेच याप्रकरणी सेतू कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे जबाब राजापूर पोलिसांनी आपल्यासमोर घेण्यात यावेत, असे आदेश देण्यात आल्याची माहिती तहसीलदारांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे. (प्रतिनिधी)