शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

राजापूर पोलिसांनी मागितली माफी

By admin | Updated: March 3, 2015 00:32 IST

बोगस दाखले प्रकरण : तहसीलदारांना दिले पत्र, ताब्यात घेतलेला दस्तऐवज परत

राजापूर : बोगस दाखले प्रकरणाचा तपास करताना सेतू कार्यालयातील कर्मचाऱ्यांना दमदाटी करत तहसीलदारांची कोणतीही परवानगी न घेता राजापूर पोलिसांनी नेलेला दस्तऐवज अखेर तहसीलदारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करताच रितसर पत्रान्वये पुन्हा राजापूर तहसीलदारांकडे जमा केला आहे. मात्र, या दस्तऐवजात काही बदल झाला असल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी राजापूर पोलिसांचीच राहील, असे तहसीलदार गुरुनाथ हुन्नरे यांनी स्पष्ट केले आहे.प्रांतांचे सील वापरुन खोट्या सह्या करून बोगस दाखले दिल्याचे प्रकरण गेले तीन आठवडे राजापुरात चांगलेच गाजत आहे. मात्र, पोलिसांच्या तपासावर सर्वसामान्यांमधून शंका व्यक्त करण्यात येत होती. या प्रकरणाचा तपास सुरु असताना तालुक्यातील सर्व वृत्तपत्रांच्या कार्यालयात पोस्टाव्दारे अज्ञाताने दोन बोगस दाखले पाठवले होते.या दाखल्यांवर राजापूर सेतू कार्यालयाचा लोगो असल्यामुळे या प्रकरणाचा तपास करताना राजापूर पोलिसांनी आपला मोर्चा सेतू कार्यालयाकडे वळवला होता. अचानकपणे सेतू कार्यालयात तपासासाठी जाताना राजापूर पोलिसांनी याबाबतची कोणतीही कल्पना तहसीलदारांना दिली नव्हती. उलट राजापूर सेतू कार्यालयात विनापरवाना घुसून कर्मचाऱ्यांना दमदाटी करत तेथील काही दस्तऐवज हस्तगत केला गेला होता.या सर्व प्रकारामुळे राजापूरचे तहसीलदार गुरुनाथ हुन्नरे यांनी पोलिसांच्या या कृतीवर नाराजी व्यक्त करत याबाबतची लेखी तक्रार जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली होती. त्यानंतर वरिष्ठ कार्यालयाकडून समज येताच पोलिसांनी नरमाईची भूमिका घेत तहसीलदारांच्या अपरोक्ष गेलेला सेतू कार्यालयातील दस्तऐवज पुन्हा आणून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोणत्याही प्रकारे लेखी न देता तसे दस्तऐवज स्विकारण्यास राजापूर तहसीलदारानी स्पष्ट नकार दिला व अगोदर विनापरवाना गेलेला दस्तऐवज जबाबदार अधिकाऱ्यांच्या लेखी पत्रानिशी सादर करावा, असे फर्मावले. त्यामुळे हतबल झालेल्या राजापूर पोलिसांनी संबंधित दस्तऐवज अखेर लेखी पत्रानिशी राजापूर तहसीलदारांच्या ताब्यात देऊन आपली सुटका करून घेतली.दरम्यान, याप्रकरणी राजापूर पोलिसांना अन्य कोणत्याही प्रकारचे दस्तऐवज हवे असल्यास त्यांना लेखी पत्रानंतर देण्यात येतील, तसेच याप्रकरणी सेतू कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे जबाब राजापूर पोलिसांनी आपल्यासमोर घेण्यात यावेत, असे आदेश देण्यात आल्याची माहिती तहसीलदारांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे. (प्रतिनिधी)