शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
4
सुरक्षित गुंतवणुकीसह जबरदस्त रिटर्न! कमाईची उत्तम संधी आहेत या ५ स्कीम; मिळेल ८% पेक्षा जास्त व्याज
5
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
6
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
7
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
8
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
9
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
10
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
11
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
12
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
13
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
14
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
15
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
16
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
17
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
18
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
19
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
20
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले

पावसामुळे राजापूर शहराची पाणीटंचाई दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:32 IST

राजापूर : ताेक्ते वादळामुळे रविवारी दिवसभर पावसाने थैमान घातल्याने राजापूर शहराला भेडसावणारी पाणीटंचाई दूर होणार आहे. राजापूर शहराला पाणीपुरवठा ...

राजापूर : ताेक्ते वादळामुळे रविवारी दिवसभर पावसाने थैमान घातल्याने राजापूर शहराला भेडसावणारी पाणीटंचाई दूर होणार आहे. राजापूर शहराला पाणीपुरवठा करणारे सायबाचे धरण कालच्या पावसामुळे तुडुंब भरले असून, तालुक्यातील अन्य ठिकाणचे पाण्याचे स्रोतही पुनर्जीवित झाले आहेत. त्यामुळे पुढील टंचाईच्या काळातील पाणीटंचाई जवळजवळ संपुष्टात आली आहे.

कडक उन्हाळ्यामुळे राजापूर शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर पाणीटंचाईचे संकट जाणवत होते. राजापूर नगर परिषदेने राजापूर शहरात गेल्या महिन्याभरापासून एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला होता. नुकताच दोन दिवसाआडही करण्यात आला होता. मात्र रविवारी ताेक्ते वादळ तालुक्यात धडकल्यानंतर सर्वत्र पावसाने मुसळधारपणे बरसायला सुरुवात केली होती. सुमारे २४ तासांहून अधिक काळ बरसणाऱ्या पावसामुळे राजापूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या कोदवली येथील सायबाच्या धरणात पाणीसाठा वाढला आहे. धरण तुडुंब भरून वाहू लागले आहे. त्यामुळे पुढील दिवसांत पाणीटंचाईवर मात करता येईल. पावसामुळे शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करता येईल, असे नगराध्यक्ष जमीर खलिफे यांनी स्पष्ट केले, तर तालुक्याच्या टंचाईग्रस्त भागातील पाण्याचे दुर्भिक्षही संपुष्टात येणार आहे.