शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

महामार्गावरील नवीन पुलामुळे राजापूर-चिखलगाव मार्ग धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:32 IST

राजापूर : अर्जुना नदीला आलेल्या पुरामुळे गेले सात ते आठ दिवस बंद असलेला राजापूर-चिखलगाव मार्ग वाहतुकीस खुला झाला आहे. ...

राजापूर : अर्जुना नदीला आलेल्या पुरामुळे गेले सात ते आठ दिवस बंद असलेला राजापूर-चिखलगाव मार्ग वाहतुकीस खुला झाला आहे. मात्र, गेले आठ दिवस सततच्या पुराच्या पाण्यामुळे नव्याने बांधकाम करण्यात आलेल्या पुलाच्या ठिकाणी या मार्गाची मोठ्या प्रमाणावर धूप झाली आहे, तर रस्त्यालगत दरडीची माेठ्या प्रमाणात धूप झाल्याने हा भाग धोकादायक बनला आहे. या ठिकाणाहून एका बाजूने वाहणारी वेगाने वाहणारी नदी तर दुसऱ्या बाजूला दरड कोसळण्याचा दुहेरी धोका निर्माण झाला आहे.

मुंबई-गोवा महामार्गावर अर्जुना नदीवर शीळ-कोंढेतड यादरम्यान महामार्गावरील हा सर्वाधिक उंचीचा पूल उभारला जात आहे. गेले दोन वर्षांपासून या पुलाच्या निर्मितीसाठी नदीपात्रात पिलर उभारणीचे काम हाती घेण्यात आले आहे. मेअखेरीस या पुलाचे नदीपात्रातील पिलर उभे करून करण्यात आले, तर या पुलाला जोडण्यासाठी राजापूर-चिखलगाव मार्गावर शीळ हद्दीवर उंच डोंगरावर पिलर उभारण्यात आला आहे. मात्र, या पुलासाठी उंच डोंगरावर आणि नदीपात्रात या मार्गाच्या लगत उभारण्यात आलेल्या दोन्ही पिलरमुळे या मार्गाला मोठा धोका निर्माण झाला आहे.

नव्याने उभारण्यात येत असलेल्या या पुलासाठी अर्जुना नदीपात्रात तीन पिलर उभारण्यात आले आहेत. त्यामध्ये शीळ-चिखलगावर मार्गाकडील पिलर हा अवघ्या दहा ते पंधरा फुट अंतरावर घालण्यात आला आहे. या पिलरच्या रस्त्याकडील बाजूने नदीचा प्रवाह वेगात येत असल्याने मुळातच अरुंद असलेल्या रस्त्याची मोठ्या प्रमाणात धूप झाली आहे. त्यामुळे या ठिकाणी अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे. या ठिकाणी संरक्षक रेलिंग उभारण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. भविष्यात हा रस्त्याला संरक्षण भिंत बांधणे अत्यावश्यक आहे. मात्र सद्य:स्थितीत मोठ्या प्रमाणात रस्त्याची धूप झाल्याने हा रस्ताच वाहून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे, तर दुसऱ्या बाजूने रस्त्यालगतची दरड कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे.

----------------------------------

मूळ समस्येवर नव्याने भर

राजापूर शीळमार्गे चिखलगाव हा कोल्हापूरकडे जाणारा जवळचा मार्ग आहे. मात्र, गेल्या अनेक वर्षांत या रस्त्याचे रुंदीकरण व उंचीकरण न केल्याने दरवर्षी पावसाळ्यात हा रस्ता पुराच्या पाण्याखाली जातो. त्यामुळे या भागातील जनतेला दहा ते बारा किलोमीटरचा वळसा घालून घर गाठावे लागते. या रस्त्याचे उंचीकरण करावे, अशी या भागातील जनतेची अनेक वर्षांची मागणी आहे. मात्र, त्याकडे शासन प्रशासनाचे पूर्णत: दुर्लक्ष झाले आहे. असे असतानाच महामार्गाचे चौपदरीकणात या ठिकाणी महामार्गावरील सर्वाधिक पूल बांधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे या मार्गाच्या मूळ समस्येत नव्याने भर पडली आहे.