शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
3
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
4
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
5
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
6
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
7
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
8
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
9
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
10
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
11
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
12
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
13
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
14
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
15
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
16
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
17
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
18
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
19
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
20
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गावरील नवीन पुलामुळे राजापूर-चिखलगाव मार्ग धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:32 IST

राजापूर : अर्जुना नदीला आलेल्या पुरामुळे गेले सात ते आठ दिवस बंद असलेला राजापूर-चिखलगाव मार्ग वाहतुकीस खुला झाला आहे. ...

राजापूर : अर्जुना नदीला आलेल्या पुरामुळे गेले सात ते आठ दिवस बंद असलेला राजापूर-चिखलगाव मार्ग वाहतुकीस खुला झाला आहे. मात्र, गेले आठ दिवस सततच्या पुराच्या पाण्यामुळे नव्याने बांधकाम करण्यात आलेल्या पुलाच्या ठिकाणी या मार्गाची मोठ्या प्रमाणावर धूप झाली आहे, तर रस्त्यालगत दरडीची माेठ्या प्रमाणात धूप झाल्याने हा भाग धोकादायक बनला आहे. या ठिकाणाहून एका बाजूने वाहणारी वेगाने वाहणारी नदी तर दुसऱ्या बाजूला दरड कोसळण्याचा दुहेरी धोका निर्माण झाला आहे.

मुंबई-गोवा महामार्गावर अर्जुना नदीवर शीळ-कोंढेतड यादरम्यान महामार्गावरील हा सर्वाधिक उंचीचा पूल उभारला जात आहे. गेले दोन वर्षांपासून या पुलाच्या निर्मितीसाठी नदीपात्रात पिलर उभारणीचे काम हाती घेण्यात आले आहे. मेअखेरीस या पुलाचे नदीपात्रातील पिलर उभे करून करण्यात आले, तर या पुलाला जोडण्यासाठी राजापूर-चिखलगाव मार्गावर शीळ हद्दीवर उंच डोंगरावर पिलर उभारण्यात आला आहे. मात्र, या पुलासाठी उंच डोंगरावर आणि नदीपात्रात या मार्गाच्या लगत उभारण्यात आलेल्या दोन्ही पिलरमुळे या मार्गाला मोठा धोका निर्माण झाला आहे.

नव्याने उभारण्यात येत असलेल्या या पुलासाठी अर्जुना नदीपात्रात तीन पिलर उभारण्यात आले आहेत. त्यामध्ये शीळ-चिखलगावर मार्गाकडील पिलर हा अवघ्या दहा ते पंधरा फुट अंतरावर घालण्यात आला आहे. या पिलरच्या रस्त्याकडील बाजूने नदीचा प्रवाह वेगात येत असल्याने मुळातच अरुंद असलेल्या रस्त्याची मोठ्या प्रमाणात धूप झाली आहे. त्यामुळे या ठिकाणी अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे. या ठिकाणी संरक्षक रेलिंग उभारण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. भविष्यात हा रस्त्याला संरक्षण भिंत बांधणे अत्यावश्यक आहे. मात्र सद्य:स्थितीत मोठ्या प्रमाणात रस्त्याची धूप झाल्याने हा रस्ताच वाहून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे, तर दुसऱ्या बाजूने रस्त्यालगतची दरड कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे.

----------------------------------

मूळ समस्येवर नव्याने भर

राजापूर शीळमार्गे चिखलगाव हा कोल्हापूरकडे जाणारा जवळचा मार्ग आहे. मात्र, गेल्या अनेक वर्षांत या रस्त्याचे रुंदीकरण व उंचीकरण न केल्याने दरवर्षी पावसाळ्यात हा रस्ता पुराच्या पाण्याखाली जातो. त्यामुळे या भागातील जनतेला दहा ते बारा किलोमीटरचा वळसा घालून घर गाठावे लागते. या रस्त्याचे उंचीकरण करावे, अशी या भागातील जनतेची अनेक वर्षांची मागणी आहे. मात्र, त्याकडे शासन प्रशासनाचे पूर्णत: दुर्लक्ष झाले आहे. असे असतानाच महामार्गाचे चौपदरीकणात या ठिकाणी महामार्गावरील सर्वाधिक पूल बांधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे या मार्गाच्या मूळ समस्येत नव्याने भर पडली आहे.