शहरं
Join us  
Trending Stories
1
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
2
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
3
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
4
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
5
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
6
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
7
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
8
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
9
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
10
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
11
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
12
महामुंबईसाठी पद्मश्री पुरस्कार विजेत्यांचा जाहीरनामा
13
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
14
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
15
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
16
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
17
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
18
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
19
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
20
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया

जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:35 IST

रत्नागिरी : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने, जिल्ह्यात २५ सप्टेंबरपर्यंत पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सोमवारी रात्री ...

रत्नागिरी : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने, जिल्ह्यात २५ सप्टेंबरपर्यंत पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सोमवारी रात्री पावसाचा जोर वाढल्याने मंगळवारी दिवसभर पाऊस राहील, अशी शक्यता वाटत होती. मात्र, सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. बुधवारी जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात २१५.१९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

ऑगस्ट महिन्याप्रमाणेच सप्टेंबर महिन्यातही पावसाचा जोर वाढला आहे. पावसाने सव्वातीन महिन्यांतच वार्षिक सरासरी ओलांडली आहे. अजूनही पावसाची वाटचाल जोरात सुरू आहे. सध्या जोरदार सरी कोसळत आहेत. रविवारीही पावसाचा जोर होता. सोमवारी दिवसभर विश्रांती घेतलेल्या पावसाने रात्री मात्र जोरदार सुरुवात केली. मंगळवारी पहाटेपर्यंत पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे दिवसभर हा जोर राहणार असे वाटत होते.

सकाळी पावसाचे प्रमाण कमी झाले असले, तरी आभाळ भरलेले होते. त्यामुळे पाऊस जोरदार असणार, अशी शक्यता वाटत होती. हवेत गारवाही होता. मात्र, दिवसभर रिपरिपच सुरू होती. पावसाळी वातावरण कायम होते. दिवसभरात उन्हाचे दर्शनही झाले नाही. सायंकाळनंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता निर्माण झाली. सध्या काही दिवस तरी मान्सूनचा पाऊस सक्रिय राहील, असा अंदाज व्यक्त होत आहे.

सध्या सर्वच तालुक्यांमध्ये पाऊस किरकोळ सरींनी पडत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ३६९१,१७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पावसाची चिन्हे पाहता अजूनही काही दिवस पावसाचा मुक्काम राहणार, असे दिसू लागले आहे.