शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
4
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
5
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
7
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
8
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
9
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
10
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
11
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
12
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
13
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
14
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
15
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
16
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
17
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
18
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
19
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
20
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...

जिल्ह्यावर पावसाचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:32 IST

रत्नागिरी : जिल्ह्यात पावसाने आठवडाभर विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा शुक्रवारी दिवसभर पावसाळी वातावरण राहिल्याने पावसाचा जोर पुन्हा वाढतो की काय, ...

रत्नागिरी : जिल्ह्यात पावसाने आठवडाभर विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा शुक्रवारी दिवसभर पावसाळी वातावरण राहिल्याने पावसाचा जोर पुन्हा वाढतो की काय, अशी चिंता व्यक्त हाेत आहे.

२१ रोजी मध्यरात्रीपासून जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाने चिपळूण आणि खेडमध्ये प्रलयंकारी परिस्थिती निर्माण केली. राजापूर, रत्नागिरी या दोन शहरांसह तालुक्यांमधील काही गावांमध्येही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्यानंतर दोन-तीन दिवसांनंतर पावसाने हळूहळू विश्रांती घेण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे सूर्यदर्शनही घडत होते.

पावसाने आठवडाभर हळूहळू विश्रांती घेण्यास सुरुवात केली असतानाच शुक्रवारी सकाळपासूनच पुन्हा पावसाची चिन्हे दिसू लागली. दुपारपर्यंत मळभ दाटून आलेले होते. त्यामुळे जोरदार पाऊस कोसळेल, असे वाटत होते.

हवामान खात्याकडून २९ जुलै ते १ ऑगस्ट या कालावधीत जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. शुक्रवारी पावसाची चिन्हे दिसू लागल्याने पाऊस पुन्हा जोर धरणार असे वाटत होते. मात्र, दिवसभर आकाश ढगाळलेलेच होते.

दरम्यान, गेल्या २४ तासांत जिल्ह्यात १४२ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यात कुठेही नुकसान झाल्याची नोंद जिल्हा नियंत्रण कक्षाकडे नाही. पावसाच्या विश्रांतीने जिल्हा प्रशासनाने चिपळूण आणि खेड येथील पूर परिस्थितीवर लक्ष केंद्रित केले असून मदतकार्य वेगात सुरू आहे.