शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

पाऊस सरींवर; नागरिकांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:21 IST

रत्नागिरी : गेल्या पाच- सहा दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने शुक्रवार रात्रीपासून जोरदार सरींची सुरुवात केली आहे. अधूनमधून चांगल्या सरी ...

रत्नागिरी : गेल्या पाच- सहा दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने शुक्रवार रात्रीपासून जोरदार सरींची सुरुवात केली आहे. अधूनमधून चांगल्या सरी कोसळत आहेत. मात्र, अजूनही पावसाचे सातत्य टिकून राहत नसल्याने जिल्ह्यात काही ठिकाणी लावणीची कामे खोळंबली आहेत. मात्र, पाऊस शांतपणे पडत असल्याने जिल्ह्यात पडझडीच्या घटना कुठे घडल्याची नोंद नाही. मात्र, यंदा पावसाने जून महिन्याची सरासरी ओलांडली असून अधिक पाऊस झाला आहे. दरम्यान, गेल्या २४ तासांत जिल्ह्यात एकूण ५०.४० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

जून महिन्याच्या सुरुवातीला पावसाने दमदार सुरुवात केली. त्यामुळे पेरणीच्या कामांना वेग आला. काही ठिकाणी रोपेही जाेमदार आल्याने लावणीला सुरुवात झाली होती. मात्र, गेल्या आठवड्यापासून पाऊस कमी झाला आहे. ऐन लावणीच्या काळात पावसाने पाठ फिरवल्याने लावणीच्या कामात गुंतलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा पावसाची प्रतीक्षा करावी लागत आहे.

रत्नागिरीत जून महिन्यात सरासरी ८१८ मिलिमीटर पाऊस पडतो; परंतु गेल्या वर्षी सुरुवातीपासूनच पाऊस कमी झाला होता. त्यामुळे जूनअखेर ७२० मिलिमीटर एवढीच पावसाची नोंद झाली होती. मात्र, यावर्षी जूनअखेरपर्यंत ९०० मिलिमीटर पाऊस झाला आहे. त्यामुळे जून महिन्याच्या सरासरीपेक्षाही यंदा पाऊस १८० मिलिमीटरपेक्षा अधिक झाला आहे. जून महिना संपण्यापूर्वीच सरासरी ओलांडल्यानंतर पुन्हा महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे पाच- सहा दिवसांपासून पुन्हा खादी सर वगळता ऊन पडायला सुरुवात झाली होती. पाऊस थांबल्याने उकाड्यालाही सुरुवात होऊ लागली आहे. हवामान खात्याने या आठवड्यात पावसाचे प्रमाण कमी होणार असल्याचा अंदाज वर्तविला हाेता. तसेच ९ जुलैनंतर पावसाचा जोर वाढणार असल्याचेही सांगितले आहे.

शुक्रवारी रात्रीपासून पावसाच्या अधूनमधून जोरदार सरी कोसळत आहेत. शनिवारीही दुपारपर्यंत अधूनमधून जोरदार सरी होत्या. दुपारी काही काळ विश्रांती घेतल्यानंतर सायंकाळी पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता निर्माण झाली.